शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नागपूर आरटीओ ; बदलीनंतरच्या पदस्थापनेला अधिकारीच मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 21:10 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर, ग्रामीण व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरचे मिळून नऊ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ते आपल्या ठिकाणी रुजूही झाले. परंतु त्यांच्या ठिकाणी अद्याप कुणीच रुजू झालेले नाही. दोन ते तीन महिन्यावर कालावधी होत असतनाही ही पदे रिक्त असल्याने कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले आहे. विशेषत: रस्त्यावरील वाहन तपासणीची मोहीमही थंडावली आहे.

ठळक मुद्देनऊ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या : वाहन तपासणी व इतरही कामे प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर, ग्रामीण व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरचे मिळून नऊ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ते आपल्या ठिकाणी रुजूही झाले. परंतु त्यांच्या ठिकाणी अद्याप कुणीच रुजू झालेले नाही. दोन ते तीन महिन्यावर कालावधी होत असतनाही ही पदे रिक्त असल्याने कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले आहे. विशेषत: रस्त्यावरील वाहन तपासणीची मोहीमही थंडावली आहे.आरटीओ कार्यालयात ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ वेब बेस प्रणाली सुरू झाल्याने नागरिकांना घरी बसून विविधअर्ज भरणे, ई पेमेंट करणे शक्य झाले आहे. यात आरटीओच्या चकरा मारणेही कमी झाले असले तरी प्रत्यक्ष कामासाठी उमेदवारांना कार्यालय गाठावेच लागते. कार्यालयात वाहन परवाना, परमीट, वाहनांचे पासिंग यासह इतरही कामांसाठी शेकडो लोक येतात. त्यांचा समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि कामाच्या पूर्ततेसाठी सर्वात मोठी जबाबदारी सहायक मोटर वाहन निरीक्षकांची असते. आरटीओ कार्यालयाचे ते ‘कणा’ असल्याचेही बोलले जाते. मात्र या अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे आरटीओत आधीच कामाचा बोजवारा उडाला आहे. यातच सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या करून शासनाने बदलीच्या जागांवर कुणीच पाठविले नसल्याने रोजची कामे प्रभावित झाली आहेत. विशेष म्हणजे, प्रलंबित कामांची संख्या वाढली आहे.शहर कार्यालयात पाच सहायक निरीक्षकांची पदस्थापना नाहीनागपूर शहर आरटीओ कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक सागर पाटील, मंगेश राठोड, अभिजित खरे व संजीवनी चोपडे यांची शासनाच्या विविध आदेशानुसार बदल्या करण्यात आल्या. परंतु त्यांच्या जागेवर कुणीच आले नाही. यातच सहायक मोटार वाहन निरीक्षक मिथुन डोंगरे हे गेल्या महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. यामुळे त्याचेही पद रिक्तआहे.ग्रामीणमधील तीन तर पूर्व आरटीओतील एक पदही रिक्तनागपूर ग्रामीण आरटीओतील सहायक मोटार वाहन निरीक्षक किरण डोंगरे, रवींद्र नराडे व वृद्धी चाऊस यांच्या बदल्या झाल्या, परंतु त्यांच्याही जागी कुणीच आले नाही. या दोन कार्यालयाच्या कामकाजाचा व्याप पाहता तातडीने सहायक निरीक्षक देणे आवश्यक असताना तीन महिन्यावर कालावधी लोटूनही सहायक निरीक्षक नेमण्यात आले नाही. यामुळे आता प्रशासनाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर