शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

नागपूर आरटीओतील दलाल गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 01:27 IST

कारची कागदपत्रे हरविल्यामुळे ती नव्याने काढून देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) दलालाने एका वाहनचालकाला ५,७०० रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) गोपाल सावजी वानखेडे (वय ५०, रा. छावणी) नामक दलालाला शनिवारी दुपारी अटक केली.

ठळक मुद्देअधिकारी बचावले, एसीबीची कारवाई : कारच्या कागदपत्रासाठी उकळली रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कारची कागदपत्रे हरविल्यामुळे ती नव्याने काढून देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) दलालाने एका वाहनचालकाला ५,७०० रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) गोपाल सावजी वानखेडे (वय ५०, रा. छावणी) नामक दलालाला शनिवारी दुपारी अटक केली.तक्रारदार वाहनचालक शासकीय नोकरीत असून, ते भानखेडा-टिमकी परिसरात राहतात. त्यांच्या ऑल्टो कारची कागदपत्रे काही दिवसांपूर्वी गहाळ झाली. त्यामुळे त्यांना कागदपत्रांची दुय्यम प्रत काढायची होती. त्यासाठी त्यांनी अमरावती मार्गावरील आरटीओ कार्यालय गाठले. तेथे घुटमळणारा दलाल गोपाल वानखेडे याने त्यांना काय काम आहे, अशी विचारणा केली. तक्रारदाराने काम सांगताच आपली आरटीओमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत सेटिंग असल्याचे सांगून तातडीने काम करून देतो, अशी बतावणी केली. त्यासाठी सहा हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने रक्कम जास्त होते, असे म्हटले असता आरोपी वानखेडेने यातील ८० टक्के रक्कम आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तर केवळ २० टक्के रक्कम आपल्याला मिळते, असे सांगितले. लाच दिल्याशिवाय काम होणे शक्यच नसल्याचेही तो म्हणाला. त्यावरून तक्रारदाराने एसीबीच्या कार्यालयात धाव घेतली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज आरटीओ कार्यालय परिसरात सापळा लावला. तक्रारदाराने वानखेडेला गाठून पैसे देण्याची तयारी दाखवताच त्याने ५,७०० रुपयाची लाच स्वीकारली. त्याचवेळी आजूबाजूला घुटमळणाऱ्या एसीबीच्या पथकाने आरोपी वानखेडेच्या मुसक्या बांधल्या. सीताबर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपअधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.ते दोघे कोण?सूत्रांच्या माहितीनुसार, वानखेडेने ही लाच आरटीओतील दोन व्यक्तींसाठी घेतल्याचे सांगितले जाते. कारवाईची गडबड झाल्याने ते दोघे तूर्त बचावले. वानखेडेला पकडल्यानंतर त्यानेच ही माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते. मात्र ते दोघे कोण होते, त्याबाबत एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून कळू शकले नाही. हे दोघे अधिकारी आहेत की कर्मचारी, त्याबाबतही अधिकाऱ्यांनी बोलण्याचे टाळले. दरम्यान, आरटीओतील एन्ट्री नंतर आता नितीन नामक दलालाने काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुरू केलेली इन्शुरन्स एन्ट्री चर्चेत आली आहे. लवकरच नितीन दलाल आणि त्याच्या साथीदारांवर नाट्यमय कारवाई होण्याचे संकेत आहेत.

 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागRto officeआरटीओ ऑफीस