शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

नागपूर- रामटेक मार्गावरील  टोल नाका बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:57 IST

नागपूर- रामटेक मार्गावर आमडी फाट्यानजीक असलेला रामटेक टोल नाका बंद करण्यासाठी नागरिकांनी केलेल्या आंदोलनांची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेतली आहे. मंगळवारी दिल्ली येथे गडकरी यांनी याबाबत बैठक घेतली. तीत यावर निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्दे निर्णय घेण्यासाठी नेमली समिती : गडकरींच्या दिल्लीतील बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर- रामटेक मार्गावर आमडी फाट्यानजीक असलेला रामटेक टोल नाका बंद करण्यासाठी नागरिकांनी केलेल्या आंदोलनांची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेतली आहे. मंगळवारी दिल्ली येथे गडकरी यांनी याबाबत बैठक घेतली. तीत यावर निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती अभ्यासानंतर महिनाभरात आपला अहवाल देईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे.बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, एनएचएआयचे सचिव, भाजपा नेते विकास तोतडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. रामटेक पथकर नाका बंद करण्याची रामटेक आणि नागपूरवासीयांची दीर्घ काळापासूनची मागणी आहे. या पथकर नाक्यामुळे रामटेकवरून नागपूरला येणाऱ्या व नागपूरवरून रामटेकला जाताना पथकर द्यावा लागत आहे. या पथकराला नागरिकांनी विरोध केला होता.मध्यंतरीच्या काळात हा पथकर नाका बंद व्हावा म्हणून नागरिकांनी आंदोलनेही केली असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पथकर बंद करण्यासंदर्भात निवेदनेही पाठविण्यात आली होती. नागरिकांची मागणी लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिल्लीत या बैठकीचे आयोजन केले होते.कन्हानचा पूलही बांधणार रामटेक मार्गावरच कन्हान नदीवरील जुना पूल अतिशय जीर्ण झाला असून कधीही कोसळण्याची भीती आहे. या मार्गावर ट्रकची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. जुना पूल इंग्रजांच्या काळातील असून शंभर वर्षापेक्षा अधिक काळ या जुन्या पुलाला झाला आहे. या मार्गावर नवीन चार पदरी पूल लवकरात लवकर उभारला जावा अशी नागरिकांची मागणी असून लवकरच हा पूलही केला जाणार आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाnagpurनागपूर