शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
2
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
3
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
4
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
5
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
6
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
7
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
8
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
9
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
10
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
12
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
13
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
14
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
15
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
16
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
17
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
18
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
19
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
20
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या

नागपूर रेल्वेच्या जनाहार उपहारगृहातून जनता खाना बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:07 IST

महागडे खाद्यपदार्थ विकत न घेऊ शकणाऱ्या प्रवाशांसाठी पूर्वी रेल्वेच्या जनाहार उपहारगृहातून केवळ २० रुपये शुल्क आकारून जनता खाना पुरविण्यात येत होता. परंतु ‘आयआरसीटीसी’ने (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन) सुरू केलेल्या जनाहारमध्ये जनता खाना उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना खिशाला ताण देऊन महागडे भोजन विकत घेण्याची पाळी येत आहे.

ठळक मुद्देगरीब प्रवाशांची गैरसोय२० रुपयात मिळत होते भोजन

ऑनलाईन लोकमत नागपूर : महागडे खाद्यपदार्थ विकत न घेऊ शकणाऱ्या प्रवाशांसाठी पूर्वी रेल्वेच्या जनाहार उपहारगृहातून केवळ २० रुपये शुल्क आकारून जनता खाना पुरविण्यात येत होता. परंतु ‘आयआरसीटीसी’ने (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन) सुरू केलेल्या जनाहारमध्ये जनता खाना उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना खिशाला ताण देऊन महागडे भोजन विकत घेण्याची पाळी येत आहे.रेल्वे बोर्डाने देशातील सर्व रेल्वेस्थानकावरील बेस किचनचा ताबा ‘आयआरसीटीसी’ला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर नागपूर रेल्वेस्थानकावरील बेस किचनही ‘आयआरसीटीसी’कडे सोपविण्यात आले. बेस किचनच्या अंतर्गत नागपूर रेल्वेस्थानकावर जनाहार उपहारगृह चालविण्यात येते. पूर्वी जनाहार रेल्वेच्या अखत्यारित असताना येथे २० रुपयात प्रवाशांना जनता खाना उपलब्ध करून देण्यात येत होता. यात प्रवाशांना आलूची भाजी, लोणचे आणि आठ पुरी देण्यात येत होते. एका प्रवाशाचे भोजन या जनता खानात व्हायचे. परंतु आयआरसीटीसीने जनाहार उपहारगृहाचा ताबा घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी जनाहारमध्ये जनता खाना मागण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना रिकाम्या हाताने परतण्याची पाळी आली. गोरगरीब प्रवाशांसाठी जनता खाना एक मोठा आधार ठरत असताना जनाहारमध्ये पहिल्याच दिवशी जनता खाना न मिळाल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर आपला संताप व्यक्त केला.नाईलाजास्तव घेतले महागडे भोजनमागील १५ दिवसांपासून आयआरसीटीसीने जनाहारचा ताबा घेतल्यानंतर डागडुजीच्या कारणामुळे जनाहार उपहारगृह बंद होते. शुक्रवारी जनाहार सुरु झाल्यानंतर प्रवाशांनी जनता खाना विकत घेण्यासाठी जनाहारकडे धाव घेतली. परंतु तेथे जनता खाना न मिळाल्याने त्यांना नाईलाजास्तव महागडे भोजन विकत घेण्याची पाळी आली. यात त्यांना दुपटीपेक्षा अधिक रक्कम मोजण्याची पाळी आली.‘आयआरसीटीसी’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार‘आयआरसीटीसी’ने जनाहारचा ताबा घेतल्यानंतर रेल्वे बोर्डाने कोणत्या नियम व अटी घालून दिलेल्या आहेत, याची माहिती शनिवारी घेणार आहो. आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्याना बोलावून जनता खाना त्यांच्या यादीत आहे की नाही यावरही चर्चा करण्यात येईल.’-बृजेश कुमार गुप्ताडीआरएम, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीnagpurनागपूर