शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

नागपुरात आता रविवारीही राहणार वीज पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 20:45 IST

महावितरणने देखभाल व दुरुस्ती (मेंटनन्स) साठी बुधवारचा दिवस निश्चित केला आहे. परंतु आता महावितरणने मेंटनन्सच्या दिवसातही वाढ करण्याची तयारी केली आहे. या अंतर्गत शहरातील काही भागांमध्ये आता रविवारीसुद्धा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येईल.

ठळक मुद्देआठवड्यात दोन दिवस मेन्टेनन्स : नागरिकांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणने देखभाल व दुरुस्ती (मेंटनन्स) साठी बुधवारचा दिवस निश्चित केला आहे. परंतु आता महावितरणने मेंटनन्सच्या दिवसातही वाढ करण्याची तयारी केली आहे. या अंतर्गत शहरातील काही भागांमध्ये आता रविवारीसुद्धा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येईल.नियमानुसार महावितरण आठवड्यातून एक दिवस मेन्टेनन्ससाठी वीज पुरवठा बंद ठेवू शकते. परंतु एकाच ठिकाणी वारंवार वीज बंद ठेवू नये, असाही नियम आहे. परंतु महावितरण आता हा नियम स्वत:च तोडत आहे. यासाठी आठवड्याच्या दुसरा दिवस म्हणून रविवारचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. १ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत गणेशनगर फीडर, जुना बगडगंज फीडरशी जुळलेल्या परिसरात वीज बंद ठेवण्यात येईल. या दरम्यान या परिसरात भूमिगत वीज लाईन टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. याचप्रकारे एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्त्याच्या मध्ये येणारे विजेचे खांब हटविण्यासाठी सुद्धा रविवार १ मार्च रोजी सुभेदार ले-आऊट, आशीर्वादनगर परिसरात सकाळी ८ ते ९.३० वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवण्यात येईल.वीज खांब हटविण्यासाठी वीज पुरवठा बंद ठेवण्याची बाब तर्कसंगत आहे. परंतु यासाठी मनपासोबत समन्वय साधावा लागतो. तसेच हे काम उच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशावर होत आहे. अशा परिस्थितीत महावितरणला नाईलाजास्तव एकापेक्षा जास्त दिवस हे काम करावे लागते. परंतु भूमिगत लाईन टाकण्याचे काम मेंटेनन्स अंतर्गत येते. त्यासाठी बुधवारचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत हे काम रविवारी केल्याने महावितरणमध्येही नाराजी आहे. कंपनीचे अधिकारी म्हणतात की, आता पाच दिवसाचा आठवडा झाला आहे. शनिवार-रविवारी बहुतांश कर्मचाऱ्यांची सुटी राहील.केवळ अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणारे फिल्डमध्ये काम करणारे कर्मचारी तैनात राहतील. अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांना मेंटनन्ससाठी रविवारी सुटीच्या दिवशीही काम करावे लागणार आहे. रविवारी वीज पुरवठा बंद ठेवल्याने नागरिकांनाही सुटीच्या दिवशी विजेविना राहावे लागेल. दुसरीकडे महावितरणने म्हणणे आहे की, उन्हाळ्यात विजेची मागणी प्रचंड वाढते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी नेटवर्क योग्य ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्तीची कामे लवकरात लवकर करण्यावर भर दिला जात आहे.वीज तर जातच आहेमेंटनन्सचा मुख्य उद्देश अखंडित वीज पुरवठा करणे होय. परंतु दर आठवड्यात अनेक तास वीज बंद ठेवल्यानंतरही अधूनमधून वीज जाण्याचे प्रकार बंद झालेले नाही. दहा मिनिटे ते अर्धा तासापर्यंत वीज बंद राहणे ही नेहमीचच बाब झाली आहे. अशा परिस्थितीत मेंटनन्सवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :electricityवीजPower Shutdownभारनियमन