शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

नागपुरात आता रविवारीही राहणार वीज पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 20:45 IST

महावितरणने देखभाल व दुरुस्ती (मेंटनन्स) साठी बुधवारचा दिवस निश्चित केला आहे. परंतु आता महावितरणने मेंटनन्सच्या दिवसातही वाढ करण्याची तयारी केली आहे. या अंतर्गत शहरातील काही भागांमध्ये आता रविवारीसुद्धा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येईल.

ठळक मुद्देआठवड्यात दोन दिवस मेन्टेनन्स : नागरिकांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणने देखभाल व दुरुस्ती (मेंटनन्स) साठी बुधवारचा दिवस निश्चित केला आहे. परंतु आता महावितरणने मेंटनन्सच्या दिवसातही वाढ करण्याची तयारी केली आहे. या अंतर्गत शहरातील काही भागांमध्ये आता रविवारीसुद्धा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येईल.नियमानुसार महावितरण आठवड्यातून एक दिवस मेन्टेनन्ससाठी वीज पुरवठा बंद ठेवू शकते. परंतु एकाच ठिकाणी वारंवार वीज बंद ठेवू नये, असाही नियम आहे. परंतु महावितरण आता हा नियम स्वत:च तोडत आहे. यासाठी आठवड्याच्या दुसरा दिवस म्हणून रविवारचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. १ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत गणेशनगर फीडर, जुना बगडगंज फीडरशी जुळलेल्या परिसरात वीज बंद ठेवण्यात येईल. या दरम्यान या परिसरात भूमिगत वीज लाईन टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. याचप्रकारे एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्त्याच्या मध्ये येणारे विजेचे खांब हटविण्यासाठी सुद्धा रविवार १ मार्च रोजी सुभेदार ले-आऊट, आशीर्वादनगर परिसरात सकाळी ८ ते ९.३० वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवण्यात येईल.वीज खांब हटविण्यासाठी वीज पुरवठा बंद ठेवण्याची बाब तर्कसंगत आहे. परंतु यासाठी मनपासोबत समन्वय साधावा लागतो. तसेच हे काम उच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशावर होत आहे. अशा परिस्थितीत महावितरणला नाईलाजास्तव एकापेक्षा जास्त दिवस हे काम करावे लागते. परंतु भूमिगत लाईन टाकण्याचे काम मेंटेनन्स अंतर्गत येते. त्यासाठी बुधवारचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत हे काम रविवारी केल्याने महावितरणमध्येही नाराजी आहे. कंपनीचे अधिकारी म्हणतात की, आता पाच दिवसाचा आठवडा झाला आहे. शनिवार-रविवारी बहुतांश कर्मचाऱ्यांची सुटी राहील.केवळ अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणारे फिल्डमध्ये काम करणारे कर्मचारी तैनात राहतील. अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांना मेंटनन्ससाठी रविवारी सुटीच्या दिवशीही काम करावे लागणार आहे. रविवारी वीज पुरवठा बंद ठेवल्याने नागरिकांनाही सुटीच्या दिवशी विजेविना राहावे लागेल. दुसरीकडे महावितरणने म्हणणे आहे की, उन्हाळ्यात विजेची मागणी प्रचंड वाढते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी नेटवर्क योग्य ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्तीची कामे लवकरात लवकर करण्यावर भर दिला जात आहे.वीज तर जातच आहेमेंटनन्सचा मुख्य उद्देश अखंडित वीज पुरवठा करणे होय. परंतु दर आठवड्यात अनेक तास वीज बंद ठेवल्यानंतरही अधूनमधून वीज जाण्याचे प्रकार बंद झालेले नाही. दहा मिनिटे ते अर्धा तासापर्यंत वीज बंद राहणे ही नेहमीचच बाब झाली आहे. अशा परिस्थितीत मेंटनन्सवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :electricityवीजPower Shutdownभारनियमन