शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
3
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
4
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
5
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
6
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
7
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
8
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
9
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
10
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
11
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
12
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
13
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
14
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
15
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
16
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
17
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
18
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
19
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
20
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं

नागपुरातील ‘प्राण’ वायुला धुराचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 10:17 IST

काही नागरिकांसोबतच, मनपाचे सफाई कर्मचारी सकाळी झाडू मारल्यानंतर निघणारा कचरा तिथेच पेटवून देत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देसफाई कर्मचारीच जाळतात कचरा१६ महिन्यात केवळ ४४ कारवाई

राजीव सिंह।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही नागरिकांसोबतच, मनपाचे सफाई कर्मचारी सकाळी झाडू मारल्यानंतर निघणारा कचरा तिथेच पेटवून देत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. सकाळी ऊर्जा देणाऱ्या प्राणवायुला धुराच्या दुर्गंधीचा विळखा पडत आहे. हे चित्र शहरातील प्रत्येक भागातील आहे. यावर निर्बंध लावण्याची व दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी मनपाच्या आरोग्य विभागाची आहे. परंतु त्यांचेच कर्मचारी यात आघाडीवर असल्याने प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सार्वजनिक ठिकाणी व उघड्यावर कचरा जाळण्याला घेऊन महानगरपालिका कधीच गंभीर राहिलेली नाही. या प्रकरणावर उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर काही दिवस कचरा जाळणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू झाली. तत्कालीन आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी कचरा जाळणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबनही केले होते. त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कारवाईची ही मोहीम जोरात सुरू होती. त्यानंतर स्वच्छता दूत म्हणून माजी सैनिकांवर या कारवाईची जबाबदारी सोपविण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांचे कचरा जाळणे कमी झाले होते. परंतु स्वच्छता दूतवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविताच कारवाईची मोहीम थंडबस्त्यात गेली. परिणामी, मुख्य रस्त्यापासून ते गल्लीबोळात सकाळी धुराचे लोट उठणे सुरू झाले. विशेष म्हणजे, ११ डिसेंबर २०१७ पासून ते २३ मार्च २०१९ दरम्यान स्वच्छता दूतांनी केवळ ४४ प्रकरणांमध्ये ८७०० रुपये दंड वसूल केला आहे. प्रति कारवाई २०० रुपये दंड लावला आहे.

हवा होत आहे विषारीसूर्याेदयावेळी हवेमध्ये ऑक्सिजनची मात्रा सर्वाधिक असते. मोठ्या संख्येत लोक वॉकिंग, जॉगिंगला जातात. परंतु याचवेळी कर्मचारी व नागरिक कचरा जाळतात. हवेतील ऑक्सिजनमध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मानोऑक्साईड मिसळून हवा विषारी होते. हवेमध्ये सूक्ष्म कण (पार्टिकुलेट मॅटर) मिसळतात. यामुळे कॅन्सर, दमा, श्वसन संबंधित आजार होण्याची शक्यता असते.

भंगार व्यवसायिकही जाळतात सर्रास कचराकाही भंगार व्यवसायिक व नागरिक पैशाच्या हव्यासापोटी विद्युत तारेमधील तांबे मिळविण्यासाठी, टायरमधील लोखंड मिळविण्यासाठी सर्रास या वस्तू जाळतात. परंतु यांच्यावर कधीच कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.चार झोनमध्ये एकही प्रकरण नाहीलक्ष्मीनगर, हनुमाननगर, गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये कचरा जाळल्याचे एकही प्रकरण सामोर आले नाही. जेव्हा की या परिसरात कचरा जाळताना मनपाचे कर्मचारी रोज सकाळी दिसून येतात. कचरा जाळण्यात आल्याचे पुरावेही अधिकाऱ्यांना दिसतात. मात्र दुर्लक्ष केले जाते.

टॅग्स :pollutionप्रदूषण