शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

नागपुरातील ‘प्राण’ वायुला धुराचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 10:17 IST

काही नागरिकांसोबतच, मनपाचे सफाई कर्मचारी सकाळी झाडू मारल्यानंतर निघणारा कचरा तिथेच पेटवून देत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देसफाई कर्मचारीच जाळतात कचरा१६ महिन्यात केवळ ४४ कारवाई

राजीव सिंह।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही नागरिकांसोबतच, मनपाचे सफाई कर्मचारी सकाळी झाडू मारल्यानंतर निघणारा कचरा तिथेच पेटवून देत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. सकाळी ऊर्जा देणाऱ्या प्राणवायुला धुराच्या दुर्गंधीचा विळखा पडत आहे. हे चित्र शहरातील प्रत्येक भागातील आहे. यावर निर्बंध लावण्याची व दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी मनपाच्या आरोग्य विभागाची आहे. परंतु त्यांचेच कर्मचारी यात आघाडीवर असल्याने प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सार्वजनिक ठिकाणी व उघड्यावर कचरा जाळण्याला घेऊन महानगरपालिका कधीच गंभीर राहिलेली नाही. या प्रकरणावर उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर काही दिवस कचरा जाळणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू झाली. तत्कालीन आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी कचरा जाळणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबनही केले होते. त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कारवाईची ही मोहीम जोरात सुरू होती. त्यानंतर स्वच्छता दूत म्हणून माजी सैनिकांवर या कारवाईची जबाबदारी सोपविण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांचे कचरा जाळणे कमी झाले होते. परंतु स्वच्छता दूतवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविताच कारवाईची मोहीम थंडबस्त्यात गेली. परिणामी, मुख्य रस्त्यापासून ते गल्लीबोळात सकाळी धुराचे लोट उठणे सुरू झाले. विशेष म्हणजे, ११ डिसेंबर २०१७ पासून ते २३ मार्च २०१९ दरम्यान स्वच्छता दूतांनी केवळ ४४ प्रकरणांमध्ये ८७०० रुपये दंड वसूल केला आहे. प्रति कारवाई २०० रुपये दंड लावला आहे.

हवा होत आहे विषारीसूर्याेदयावेळी हवेमध्ये ऑक्सिजनची मात्रा सर्वाधिक असते. मोठ्या संख्येत लोक वॉकिंग, जॉगिंगला जातात. परंतु याचवेळी कर्मचारी व नागरिक कचरा जाळतात. हवेतील ऑक्सिजनमध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मानोऑक्साईड मिसळून हवा विषारी होते. हवेमध्ये सूक्ष्म कण (पार्टिकुलेट मॅटर) मिसळतात. यामुळे कॅन्सर, दमा, श्वसन संबंधित आजार होण्याची शक्यता असते.

भंगार व्यवसायिकही जाळतात सर्रास कचराकाही भंगार व्यवसायिक व नागरिक पैशाच्या हव्यासापोटी विद्युत तारेमधील तांबे मिळविण्यासाठी, टायरमधील लोखंड मिळविण्यासाठी सर्रास या वस्तू जाळतात. परंतु यांच्यावर कधीच कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.चार झोनमध्ये एकही प्रकरण नाहीलक्ष्मीनगर, हनुमाननगर, गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये कचरा जाळल्याचे एकही प्रकरण सामोर आले नाही. जेव्हा की या परिसरात कचरा जाळताना मनपाचे कर्मचारी रोज सकाळी दिसून येतात. कचरा जाळण्यात आल्याचे पुरावेही अधिकाऱ्यांना दिसतात. मात्र दुर्लक्ष केले जाते.

टॅग्स :pollutionप्रदूषण