शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नागपुरातील ‘प्राण’ वायुला धुराचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 10:17 IST

काही नागरिकांसोबतच, मनपाचे सफाई कर्मचारी सकाळी झाडू मारल्यानंतर निघणारा कचरा तिथेच पेटवून देत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देसफाई कर्मचारीच जाळतात कचरा१६ महिन्यात केवळ ४४ कारवाई

राजीव सिंह।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही नागरिकांसोबतच, मनपाचे सफाई कर्मचारी सकाळी झाडू मारल्यानंतर निघणारा कचरा तिथेच पेटवून देत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. सकाळी ऊर्जा देणाऱ्या प्राणवायुला धुराच्या दुर्गंधीचा विळखा पडत आहे. हे चित्र शहरातील प्रत्येक भागातील आहे. यावर निर्बंध लावण्याची व दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी मनपाच्या आरोग्य विभागाची आहे. परंतु त्यांचेच कर्मचारी यात आघाडीवर असल्याने प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सार्वजनिक ठिकाणी व उघड्यावर कचरा जाळण्याला घेऊन महानगरपालिका कधीच गंभीर राहिलेली नाही. या प्रकरणावर उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर काही दिवस कचरा जाळणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू झाली. तत्कालीन आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी कचरा जाळणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबनही केले होते. त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कारवाईची ही मोहीम जोरात सुरू होती. त्यानंतर स्वच्छता दूत म्हणून माजी सैनिकांवर या कारवाईची जबाबदारी सोपविण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांचे कचरा जाळणे कमी झाले होते. परंतु स्वच्छता दूतवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविताच कारवाईची मोहीम थंडबस्त्यात गेली. परिणामी, मुख्य रस्त्यापासून ते गल्लीबोळात सकाळी धुराचे लोट उठणे सुरू झाले. विशेष म्हणजे, ११ डिसेंबर २०१७ पासून ते २३ मार्च २०१९ दरम्यान स्वच्छता दूतांनी केवळ ४४ प्रकरणांमध्ये ८७०० रुपये दंड वसूल केला आहे. प्रति कारवाई २०० रुपये दंड लावला आहे.

हवा होत आहे विषारीसूर्याेदयावेळी हवेमध्ये ऑक्सिजनची मात्रा सर्वाधिक असते. मोठ्या संख्येत लोक वॉकिंग, जॉगिंगला जातात. परंतु याचवेळी कर्मचारी व नागरिक कचरा जाळतात. हवेतील ऑक्सिजनमध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मानोऑक्साईड मिसळून हवा विषारी होते. हवेमध्ये सूक्ष्म कण (पार्टिकुलेट मॅटर) मिसळतात. यामुळे कॅन्सर, दमा, श्वसन संबंधित आजार होण्याची शक्यता असते.

भंगार व्यवसायिकही जाळतात सर्रास कचराकाही भंगार व्यवसायिक व नागरिक पैशाच्या हव्यासापोटी विद्युत तारेमधील तांबे मिळविण्यासाठी, टायरमधील लोखंड मिळविण्यासाठी सर्रास या वस्तू जाळतात. परंतु यांच्यावर कधीच कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.चार झोनमध्ये एकही प्रकरण नाहीलक्ष्मीनगर, हनुमाननगर, गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये कचरा जाळल्याचे एकही प्रकरण सामोर आले नाही. जेव्हा की या परिसरात कचरा जाळताना मनपाचे कर्मचारी रोज सकाळी दिसून येतात. कचरा जाळण्यात आल्याचे पुरावेही अधिकाऱ्यांना दिसतात. मात्र दुर्लक्ष केले जाते.

टॅग्स :pollutionप्रदूषण