शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

नागपूर पोलीस आयुक्त पोहोचले मजुरांच्या कॅम्पमध्ये : व्यवस्थेचा घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 19:14 IST

परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था कशी आहे, त्यांना खाण्यापिण्याच्या चीजवस्तू सोबत दिल्या की नाही, ते जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज पांजरी टोलनाक्यावरच्या कॅम्पमध्ये जाऊन पाहणी केली.

ठळक मुद्देमजुरांशीही साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था कशी आहे, त्यांना खाण्यापिण्याच्या चीजवस्तू सोबत दिल्या की नाही, ते जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज पांजरी टोलनाक्यावरच्या कॅम्पमध्ये जाऊन पाहणी केली. येथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी येथील मजुरांशी संवाद साधला आणि त्यांची व्यथाही समजून घेतली.नागपुरात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या त्यांच्या गावी पाठविण्यासाठी सेवाभावी संस्था, संघटना आणि नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी शहराला जोडणाऱ्या वेगवेगळ्या सात ठिकाणी व्यवस्था केली आहे. ही व्यवस्था कशी आहे, मजुरांना बाहेरगावी पाठविताना त्यांना खाण्यापिण्याच्या चीजवस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहे की नाही, ते बघण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय आज दुपारी १२ च्या सुमारास पांजरी टोल नाक्यावर उभारण्यात आलेल्या कॅम्पमध्ये पोहोचले. येथे त्यांनी कोणत्या वाहनातून, कोणत्या गावाला पाठविण्यात येत आहे, त्यासाठी कशी व्यवस्था करण्यात आली आहे, त्याची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी मजुरांशी संवाद साधला. त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू सोबत मिळाल्या की नाही, त्याबाबत विचारणा केली. त्याचप्रमाणे त्यांना धीर देऊन सुखरूप परत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मध्ये काही अडचणी आल्यास नागपूरपोलिसांशी संपर्क करण्याचीही सूचना केली. मजुरांनी डॉ. उपाध्याय यांना धन्यवाद दिले. विशेष म्हणजे, लॉकडाऊनमुळे नागपुरात अडकून पडलेल्या हजारो परप्रांतीय मजूर आणि विद्यार्थ्यांना गैरसोय होऊ नये म्हणून त्यांची व्यवस्था २६ शेल्टर होममध्ये करण्यात आली होती. तेथे त्यांना जेवण तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरविल्या जात होत्या. शिवाय त्यांच्या मनोरंजनाची ही व्यवस्था करण्यात आली होती. महापालिका आणि आरोग्य विभागाच्या मदतीने त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष दिले जात होते. सरकारकडून त्यांना त्यांच्या गावात पाठविण्याची सूचना मिळताच पोलिसांनी या मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी सुमारे ५० बसेसची व्यवस्था विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून केली आहे. आजपावेतो ९ ते १० हजार मजूर आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या गावी पोहोचविण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे, हे कार्य नियमित सुरू आहे.अजूनही अनेक ठिकाणचे मजूरमहाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मजुरांसह, यूपी, एमपी, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड आणि बिहारसह अनेक राज्यांतील मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. मात्र, अजूनही असे शेकडो मजूर नागपुरात आहेत. त्यांना त्यांच्या गावी पाठविण्याचे प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी एकूण सात ठिकाणी त्यासाठी तात्पुरते कॅम्प उभारले आहेत. याच ठिकाणी मजुरांची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात येत आहे.

टॅग्स :commissionerआयुक्तPoliceपोलिसnagpurनागपूर