शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

नागपूर पोलीस आयुक्त पोहोचले मजुरांच्या कॅम्पमध्ये : व्यवस्थेचा घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 19:14 IST

परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था कशी आहे, त्यांना खाण्यापिण्याच्या चीजवस्तू सोबत दिल्या की नाही, ते जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज पांजरी टोलनाक्यावरच्या कॅम्पमध्ये जाऊन पाहणी केली.

ठळक मुद्देमजुरांशीही साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था कशी आहे, त्यांना खाण्यापिण्याच्या चीजवस्तू सोबत दिल्या की नाही, ते जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज पांजरी टोलनाक्यावरच्या कॅम्पमध्ये जाऊन पाहणी केली. येथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी येथील मजुरांशी संवाद साधला आणि त्यांची व्यथाही समजून घेतली.नागपुरात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या त्यांच्या गावी पाठविण्यासाठी सेवाभावी संस्था, संघटना आणि नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी शहराला जोडणाऱ्या वेगवेगळ्या सात ठिकाणी व्यवस्था केली आहे. ही व्यवस्था कशी आहे, मजुरांना बाहेरगावी पाठविताना त्यांना खाण्यापिण्याच्या चीजवस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहे की नाही, ते बघण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय आज दुपारी १२ च्या सुमारास पांजरी टोल नाक्यावर उभारण्यात आलेल्या कॅम्पमध्ये पोहोचले. येथे त्यांनी कोणत्या वाहनातून, कोणत्या गावाला पाठविण्यात येत आहे, त्यासाठी कशी व्यवस्था करण्यात आली आहे, त्याची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी मजुरांशी संवाद साधला. त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू सोबत मिळाल्या की नाही, त्याबाबत विचारणा केली. त्याचप्रमाणे त्यांना धीर देऊन सुखरूप परत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मध्ये काही अडचणी आल्यास नागपूरपोलिसांशी संपर्क करण्याचीही सूचना केली. मजुरांनी डॉ. उपाध्याय यांना धन्यवाद दिले. विशेष म्हणजे, लॉकडाऊनमुळे नागपुरात अडकून पडलेल्या हजारो परप्रांतीय मजूर आणि विद्यार्थ्यांना गैरसोय होऊ नये म्हणून त्यांची व्यवस्था २६ शेल्टर होममध्ये करण्यात आली होती. तेथे त्यांना जेवण तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरविल्या जात होत्या. शिवाय त्यांच्या मनोरंजनाची ही व्यवस्था करण्यात आली होती. महापालिका आणि आरोग्य विभागाच्या मदतीने त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष दिले जात होते. सरकारकडून त्यांना त्यांच्या गावात पाठविण्याची सूचना मिळताच पोलिसांनी या मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी सुमारे ५० बसेसची व्यवस्था विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून केली आहे. आजपावेतो ९ ते १० हजार मजूर आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या गावी पोहोचविण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे, हे कार्य नियमित सुरू आहे.अजूनही अनेक ठिकाणचे मजूरमहाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मजुरांसह, यूपी, एमपी, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड आणि बिहारसह अनेक राज्यांतील मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. मात्र, अजूनही असे शेकडो मजूर नागपुरात आहेत. त्यांना त्यांच्या गावी पाठविण्याचे प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी एकूण सात ठिकाणी त्यासाठी तात्पुरते कॅम्प उभारले आहेत. याच ठिकाणी मजुरांची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात येत आहे.

टॅग्स :commissionerआयुक्तPoliceपोलिसnagpurनागपूर