शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नागपुरात टक्केवारी घटली पण प्रत्यक्ष मतदान वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:01 IST

लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही नागपूरसारख्या मेट्रोपॉलिटीन मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत घट झाली. तर विस्ताराने अफाट व दुर्गम भागाचा समावेश असणाऱ्या रामटेक मतदारसंघात मात्र मतदारांनी आपला जोश हायच ठेवला. नागपुरात ५४.७४ टक्के म्हणजेच २०१४ च्या तुलनेत २.३८ टक्के कमी मतदान झाले तर रामटेकमध्ये ६२.१२ टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्यावेळी येथे ६२.६४ टक्के मतदान झाले होते. असे असले तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत प्रत्यक्ष मतदानाच्या आकड्याचा विचार करता नागपुरात ९६ हजार ७४२ व रामटेकमध्ये १ लाख ४२ हजार ७२० एवढे अधिकचे मतदान झाले आहे.

ठळक मुद्देनागपुरात २.३८ टक्कयांनी कमी पण ९६ हजार ७४२ मतांची वाढरामटेकमध्ये ०.५२ टक्क्यांची घट तरीही १ लाख ४२ हजार ७२० मतांची भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही नागपूरसारख्या मेट्रोपॉलिटीन मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत घट झाली. तर विस्ताराने अफाट व दुर्गम भागाचा समावेश असणाऱ्या रामटेक मतदारसंघात मात्र मतदारांनी आपला जोश हायच ठेवला. नागपुरात ५४.७४ टक्के म्हणजेच २०१४ च्या तुलनेत २.३८ टक्के कमी मतदान झाले तर रामटेकमध्ये ६२.१२ टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्यावेळी येथे ६२.६४ टक्के मतदान झाले होते. असे असले तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत प्रत्यक्ष मतदानाच्या आकड्याचा विचार करता नागपुरात ९६ हजार ७४२ व रामटेकमध्ये १ लाख ४२ हजार ७२० एवढे अधिकचे मतदान झाले आहे.नागपुरात भाजपा नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेसकडून माजी खासदार नाना पटोले यांच्यात ‘हायप्रोफाईल’ लढत होती. या लढतीकडे देशाचे लक्ष होते. त्यामुळे येथे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी भाजपा व काँग्रेस हे दोन्ही पक्ष ‘बूथ मॅनेजमेंट’ वरून शत प्रतिशत मतदान होण्यासाठी जोरात कामाला लागले होते. निवडणूक विभागही अधिक सतर्क होता. विशेष म्हणजे यावेळी मतदानाची वेळ तासाभराने वाढविण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही नागपुरातील मतांची टक्केवारी घटल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये १९ लाख ७८४ मतदारांपैकी १० लाख ८५ हजार ७६५ मतदारांनी (५७.१२टक्के ) मतदान केले होेते. यावेळी २१ लाख ६० हजार २१७ मतदारांपैकी ११ लाख ८२ हजार ५०७ मतदारांनी (५४.७४ टक्के ) हक्क बजावला. यावरून २.३८ टक्के मतदान कमी झाले असले तरी झालेल्या मतदार संख्येचा विचार करता ९६ हजार ७४२ मतदानाची प्रत्यक्ष भर पडली आहे. नागपुरात मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ होता. अनेकांची नावेच गहाळ होती. काहींच्या नावात त्रुटी होत्या. तर एकाच कुटुंबातील व्यक्तींचे मतदान वेगवेगळ्या केंद्रांवर देण्यात आले होते. या सर्व बाबींचा मतदानावर परिणाम झाला. यात ४४ अंशांवर गेलेल्या उन्हानेही घाम फोडला.रामटेकमध्ये मात्र उमेदवारांची फारशी चर्चा नसताना, प्रचाराचा तेवढा जोर नसताना मतदारांचा जोश कायम राहिला. २०१४ मध्ये १६ लाख ७७ हजार २६६ मतदारांपैकी १० लाख ५० हजार ६४० मतदारांनी (६२.६४ टक्के ) हक्क बजावला होता. यावेळी १९ लाख २१ हजार ७४ मतदारांपैकी ११ लाख ९३ हजार ३०७ मतदारांनी (६२.१२ टक्के) हक्क बजावला. यावरून मतदानात ०.५२ टक्क्यांची किंचिंतशी घट झाली असली तरी प्रत्यक्ष मतदानात १ लाख ४२ हजार ७२० मतांची भर पडली आहे. यावरून ग्रामीण भागातील मतदार हा मतदानाबाबत शहरी मतदारांपेक्षा अधिक जागरूक असल्याचे दिसून आले आहे.

मतदारसंघ                             २०१४                             २०१९                                      घट        प्रत्यक्ष वाढलेले मतदाननागपूर लोकसभा         १०,८५,७६५ (५७.१२ टक्के)    ११,८२, ५०७ (५४.७४ टक्के)    २.३८ टक्के     ९६ ,७४२रामटेक लोकसभा     १०, ५०, ६४० (६२.६४टक्के)    ११, ९३, ३०७ (६२.१२टक्के)         ०.५२           १, ४२, ७२० 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019