शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

नागपूर केवळ प्रशिक्षित पायलटच नाही, वैज्ञानिकही जाऊ शकतील अंतरिक्ष केंद्रात: एस. साेमनाथ

By निशांत वानखेडे | Updated: March 21, 2024 20:23 IST

इस्राे व विज्ञान भारतीच्या ‘स्पेस ऑन व्हील’ चा समाराेप

निशांत वानखेडे, नागपूर : भारत येत्या काही वर्षात अंतराळात अनेक पाऊले उचलणार आहे आणि अंतराळ केंद्र (स्पेस स्टेशन) स्थापन करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत अंतराळात वायुसेनेच्या पूर्ण प्रशिक्षित वैमानिकांनाच अंतराळवीर म्हणून पाठविण्यात येते, मात्र अंतराळ केंद्र झाल्यावर शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील वैज्ञानिकांनाही अंतराळात पाठविता येईल, असे मत भारतीय अंतराळ संशाेधन संस्था (इस्राे) चे अध्यक्ष डाॅ. एस. साेमनाथ यांनी व्यक्त केले.

इस्राे आणि विज्ञान भारती विदर्भ प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट २०२३ पासून सुरू झालेल्या ‘स्पेस ऑन व्हील’ च्या समाराेपीय कार्यक्रमात डाॅ. साेमनाथ उपस्थित हाेते. यावेळी विज्ञान भारतीचे अध्यक्ष व सीएसआयआरचे माजी महासंचालक डाॅ. शेखर मांडे, एनआरएससीचे डाॅ. प्रकाश चव्हाण, सीबीबीडीचे सुधीर कुमार, शिवकुमार शर्मा आदी मान्यवर उपस्थित हाेते. डाॅ. साेमनाथ यांनी २०२५ मध्ये गगनयान व २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवतील, असा विश्वास व्यक्त केला. २०२८ पर्यंत अंतराळ केंद्र स्थापन करण्यासाठी इस्राेचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.अंतराळ संशाेधनाच्या कार्यात ४५० अब्ज डाॅलरच्या गुंतवणूकीसह अमेरिका क्रमांकावर आहे. सध्या भारताचे याेगदान केवळ २ टक्क्यावर आहे आणि १० टक्क्यावर नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवनव्या कल्पना, स्टार्टअपसह आणि उद्याेग जगतानेही पुढाकार घेण्याची गरज आहे. १९६० च्या दशकात अमेरिकेने चंद्र माेहिम राबविली तेव्हा, भारतात राॅकेटही बनत नव्हते पण आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाेहचणारा भारत पहिला देश आहे. भारत विकसित राष्ट्र असून प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करीत आहे. सध्या आपण ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पाेहचेल, असा विश्वाश डाॅ. साेमनाथ यांनी व्यक्त केला.

जग झपाट्याने बदलत आहे. आपण डिजिटल क्रांतीच्या युगात राहताे आणि सर्वाधिक ट्रान्झॅक्शनसह भारत डिजिटल क्रांतीचे नेतृत्व करीत आहे. अंतराळ विज्ञानातही आपल्याला वेगाने पुढे जायचे आहे, कारण अंतराळ विज्ञान हा डिजिटल क्रांतीचा कणा आहे. ज्यांनी तंत्रज्ञानाच्या शक्तिचा प्रभाव ओळखला, भविष्य त्यांचे आहे आणि अंतराळ विज्ञान प्रत्येक क्षेत्रात याेगदान देणारे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेपासून भाैतिक विज्ञान, पदार्थ विज्ञान, वैद्यकीय विज्ञान आणि कृषी क्षेत्रातही अमुलाग्र बदल घडविण्यासाठी अंतराळ विज्ञान संशाेधनाचे महत्त्व राहणार असल्याचे मत डाॅ. साेमनाथ यांनी व्यक्त केले. विदर्भाचे कृषी क्षेत्र आणि ग्रामीण दळणवळणात अंतराळ संशाेधन लाभदायक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

५ लाख विद्यार्थ्यांनी पाहिले स्पेस ऑन व्हील

विदर्भातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल रुची आणि अंतराळ संशाेधनाबद्दल जागृतीसाठी इस्राे व विभाच्या पुढाकाराने चंद्रयान व भारतीय अंतराळ माेहिमांची माहिती देण्यासाठी फिरती बस तयार करण्यात आली हाेती. ही बस विदर्भाच्या ११ जिल्ह्यात ५००० किमीचा प्रवास करीत १३५ पेक्षा जास्त शाळांपर्यंत पाेहचली आणि ५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. अंतराळ बस तयार करण्यामागे परिश्रम करणारे सुधीर कुमार यांनी या यशाची ग्वाही दिली. यावेळी अचलपूरचा विद्यार्थी साैरभ वैद्य, हिंगणघाटचे शिक्षक आशिष कुमार आणि मेळघाट परिसरातील शिक्षिका विद्या कुमरेकर यांनी भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :isroइस्रो