शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur North Election Results : उत्तरच्या गडावर काँग्रेस पुन्हा विराजमान : नितीन राऊत यांचा एकतर्फी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 01:36 IST

Nagpur North Election Results 2019 : Milind Mane Vs Nitin Raut ,Maharashtra Assembly Election 2019

ठळक मुद्देपहिल्याच फेरीपासून बढत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आंबेडकरी चळवळीचा गड असलेल्या नागपूर उत्तर या विधानसभा मतदार संघात एकेकाळी रिपब्लिकन पक्षाची एकाधिकारशाही चालायची. परंतु सलग १५ वर्षे या मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. नितीन राऊत यांच्यामुळे हा काँग्रेसचा गड झाला. परंतु मागच्या निवडणुकीत मात्र त्यांना जबरदस्त धक्का बसला. भाजपचे डॉ. मिलिंद माने यांनी उत्तरच्या या गडावर विजय मिळवला. बसपाने मारलेल्या प्रचंड मुसंडीमुळे राऊत तिसºया क्रमांकावर फेकल्या गेले होते. परंतु पाच वर्षात बरेच पाणी वाहून गेले. काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत यांनी उत्तरचा गड पुन्हा एकदा खेचून आणला. त्यांनी तब्बल ८६८२१ मते घेत भाजपचे डॉ. मिलिंद माने यांचा २०,६९४ मतांनी पराभव केला. डॉ. माने यांना ६६,१२७ मते मिळाली.सिव्हिल लाईन्स येथील सेंट ऊर्सुला गर्ल्स हायस्कूलमध्ये उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघाची मतमोजणी पार पडली. या मतदार संघात एकूण १८ फेऱ्या झाल्या. काँग्रेसचे नितीन राऊत यांनी पहिल्याच फेरीपासून बढत घेतली. पहिल्या फेरीत डॉ. राऊत यांना ५४८४ मते मिळाली. तर भाजपचे डॉ. मिलिंद माने यांना ४२४७ मते पडली. अशाप्रकारे पहिल्याच फेरीत १२३७ मतांची आघाडी घेतली. चौथ्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम होती. चौथ्या फेरीपर्यंत डॉ. नितीन राऊत हे ६३०० मतांनी आघाडीवर होते. पाचव्या फेरीत मात्र भाजपचे डॉ. माने यांनी ११०० मतांची आघाडी घेतली. या फेरीत डॉ. माने यांना ५०६३ तर डॉ. राऊत यांना ३०६३ मते मिळाली. सहाव्या फेरीत पुन्हा डॉ. राऊत यांनी आघाडी घेतली. या फेरीत त्यांना ५१०९ तर डॉ. माने यांना १७२९ मते मिळाली. सहाव्या फेरीअखेर डॉ. राऊत हे ८५८० मतांनी पुढे होते. ही आघाडी दहाव्या फेरीपर्यंत कायम होती. दहाव्या फेरीअखेर डॉ. नितीन राऊत यांनी १७,८५४ मतांची आघाडी घेतली. डॉ. माने यांनी यानंतर ११ व्या, १२ व्या व १३ व्या फेरीत आघाडी घेतली. परंतु डॉ. राऊत यांची आघाडी त्यांना फार कमी करता आली नाही. अकराव्या फेरीत डॉ. माने यांना ४४२४ तर डॉ. राऊत यांना ४३८२ मते मिळाली. बाराव्या फेरीत माने यांनी तब्बल २३०५ मतांची आघाडी घेतली. या फेरीत माने यांना ६४३७ तर डॉ. राऊत यांना ४१३२ मते मिळाली. तेराव्या फेरीत माने यांना ४८८९ तर डॉ. राऊत यांना ४१२३ मते मिळाली. १४ व्या फेरीत डॉ. राऊत यांनी पुन्हा मुसंडी मारली. या फेरीत त्यांना ५१४५ मते मिळाली. तर डॉ. माने यांना २२३५ मते मिळाली. ही आघाडी १७ व्या फेरीपर्यंत कायम होती. या फेरीपर्यंत डॉ. राऊत यांनी २२,५८७ मतांनी आघाडी घेतली होती. शेवटच्या १८ व्या फेरीत डॉ. माने यांनी ६२८२ मते घेऊन आघाडी घेतली. परंतु तेव्हापर्यंत उशीर झाला होता. या फेरीत डॉ. राऊत दोन हजार मतांनी माघारले असले तरी त्यांचा विजय हा झालेला होता. डॉ. नितीन राऊत यांना विजयी घोषित करण्यात आले.पोस्टल बॅलेटमध्येही डॉ. राऊत पुढेपोस्टल बॅलेटमध्येही डॉ. नितीन राऊत हे आघाडीवर राहिले. एकूण ५७५ पोस्टल बॅलेट प्राप्त झाले. काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत यांना २४४ पोस्टल मते मिळाली. भाजपचे डॉ. मिलिंद माने यांना १४३, बसपाचे सुरेश साखरे यांना ६९, वंचित बहुजन आघाडीचे विनय भांगे यांना २९, एमआयएमच्या कीर्ती डोंगरे ४ मते मिळाली. याशिवाय कैलाश वाघमारे यांना ३, अर्चना उके १, विजया बागडे यांना १ पोस्टल मत मिळाले. बसपाला मतदारांनी नाकारलेउत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातून मागच्या वेळी बसपाचा उमेदवार हा दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यांना तब्बल ५५ हजारावर मते मिळाली होती. यंदा बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे हे स्वत: रिंगणात होते. तरीही त्यांना केवळ २३,३३३ मतांपर्यंत मजल मारता आली.वंचित बहुजन आघाडीपेक्षा एमआयएम वरचढउत्तर नागपुरात वंचित बहुजन आघाडी कि ती मते घेणार याकडे लक्ष होते. परंतु उत्तर नागपुरातील मतदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला नाकारले. या पक्षाचे उमेदवार विनय भांगे यांना केवळ ५५९९ मते मिळाली. त्या तुलनेत एमआयएमच्या उमेदवाराने मात्र चांगली मते घेतली. एमआयएमच्या उमेदवार कीर्ती डोंगरे यांनी ९२२२ मते घेतली.जनतेने मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व नाकारले : नितीन राऊत यांचा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधीपासूनच २२० चा नारा दिला होता. परंतु, स्वत:च्या मतदार क्षेत्रात त्यांचे मताधिक्य कमी झाले असून लाखोच्या बाता करणारे मुख्यमंत्री हजारात पुढे आहे. शहरातही त्यांना अपेक्षित मताधिक्य प्राप्त झालेले नाही. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच त्यांचे नेतृत्व जनतेने नाकारले आहे, अशी टीका काँग्रेसचे राज्य कार्यकारी अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी केली.नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघातून ते विजयी झाले. त्यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले, राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर विकास, बेरोगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावर न बोलता सत्ताधाºयांनी भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर इडीची चौकशी लावून दबावाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, राज्यातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. शिवाय बहुजन नेते पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर कोहळे यांची तिकिटं कापली. त्यामुळे बहुजन समाजात असंतोष उफाळून आल्याचे दिसून येते. पाच वर्ष मुख्यमंत्रिपदी असल्याने विदर्भाचा मोठा विकास होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु, विकास तर सोडा, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वाढल्या. त्याचा रोषही निकालात दिसून आल्याचे ते म्हणाले.राज्यात परिवर्तन घडणारराज्यात भाजपला जनादेश मिळाला नसून जनतेने त्यांना नाकारले आहे. त्यांच्या जागाही कमी होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येणार का? या प्रश्नावर त्यांनी राज्यात परिवर्तन होणार असल्याचे सूचक वक्तव्य केले.पराभव आनंदाने स्वीकारतोजनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. माझा पराभव मी आनंदाने स्वीकारतो. माझ्या कार्यकर्त्यांनी सांघिकपणे परिश्रम घेतले. परंतु आमच्या हातून काही चुका झाल्या असेल म्हणूनच माझा पराभव झाला. कुठे चूक झाली याचे मूल्यमापन करूच. परंतु आमचा पराभव आम्ही स्वीकारतो. जनतेने मला केलेले मतदानाचा मी स्वीकार करतो. त्यांच्या ऋणात मी असाच राहू इच्छितो. उत्तर नागपुरातून विजयी झालेले काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत यांना माझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.डॉ. मिलिंद मानेपराभूत उमेदवार, भाजपा

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpur-north-acनागपूर उत्तरNitin Rautनितीन राऊत