शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपूर मनपाची कचरा प्रक्रिया बंद ; हंजरला बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:51 IST

स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. परंतु भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. या संदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागाला माहिती नव्हती. ‘लोकमत’ ने या संदर्भात वृत्त प्रकाशित करून भांडेवाडीचे वास्तव पुढे आणले. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने मे. हंजर बायोटेक एनर्जीला नोटीस बजावून खुलासा मागितला आहे.

ठळक मुद्देलोकमतचा प्रभाव : प्रभावी उपाययोजना करण्याचे आयुक्तांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. परंतु भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. या संदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागाला माहिती नव्हती. ‘लोकमत’ ने या संदर्भात वृत्त प्रकाशित करून भांडेवाडीचे वास्तव पुढे आणले. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने मे. हंजर बायोटेक एनर्जीला नोटीस बजावून खुलासा मागितला आहे.सध्या शहरातील १२०० मेट्रिक टन कचरा येथे आणला जातो. यातील २०० मेट्रिक टन कचऱ्यावर मे. हंजर बायटेक एनर्जी माध्यमातून प्रक्रिया केली जाते. परंतु सध्या प्रक्रिया न करताच कचरा साठविला जात आहे. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच पेंच प्रकल्प व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी माहिती जाणून घेतली. प्रक्रिया बंद असल्याबाबत विचारणा करून करारानुसार नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी दिले.हंजरच्या कामकाजासंदर्भात तक्रारी आहेत. यापूर्वी कंपनीवर दोन कोटींचा दंडही आकारण्यात आल्याची माहिती आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली. वीज बिल न भरल्याने प्रकल्प बंद असल्याची माहिती आहे. याबाबत कंपनीला खुलासा मागितला आहे. कंपनीचे काम व्यवस्थित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कंपनीवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला.प्रक्रि या बंद असल्याने भांडेवाडी येथे कचऱ्याचा ढीग लागलेला नाही. येथे भरपूर जागा आहे. महिनाभरात कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. यात ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. यातून ११.५ मेगावॅट वीज निर्मिती होईल. या प्रकल्पामुळे कचऱ्याची समस्या मार्गी लागणार आहे. कचऱ्यापासून तयार होणाऱ्या  खताबाबत फर्टिलायजर कार्पोरेशन आॅफ इंडिया यांच्याशी महापालिका व हंजर यांनी त्रिपक्षीय करार केला आहे. हंजरने काम बंद केल्यास निर्माण होणाऱ्या  खताची विक्री करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कचरामुक्त शहराचा संकल्प आहे. बायोमायनिंगचाही प्रस्ताव आहे. लवकरच याचे चांगले परिणाम दिसतील असा विश्वास अश्विन मुदगल यांनी व्यक्त केला.करारानुसार कारवाई करूकचऱ्यावरील प्रक्रिया अचानक बंद ठेवणे चुकीचे आहे. हंजर कंपनीला महापालिकेकडून आवश्यक सहकार्य मिळत आहे. करारानुसार हंजरवर कारवाई केली जाईल. सोबतच एस्सेल कंपनीचा कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाईल. यामुळे ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होईल.नंदा जिचकार, महापौरसहा महिन्यात कचऱ्यातून सुटकाभांडेवाडी येथील कचऱ्याची समस्या कायमस्वरुपी निकाली निघावी. यासाठी कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. महिनाभरात हा प्रकल्प सुरू होईल. तसेच बायोमायनिंगची निविदा प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही प्रकल्प कार्यान्वित होतील. पुढील सहा महिन्यात पूर्व नागपुरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.संदीप जोशी , सत्तापक्षनेते महापालिकास्वच्छ भारत अभियान निव्वळ देखावास्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. परंतु स्वच्छता होताना दिसत नाही. स्वच्छ अभियान हा निव्वळ देखावा आहे. भांडेवाडी डम्पिंगयार्ड येथील कचरा प्रक्रिया दीड महिन्यापासून बंद आहे. परंतु महापालिकेला याची माहिती नाही. स्वच्छता सर्वेक्षणादरम्यान प्रकल्प सुरू होता. नंतर बंद करण्यात आला.तानाजी वनवे, विरोधीपक्षनेता महापालिकाआरक्षणाच्या विरोधात वापरभांडेवाडी येथील जमीन कंपोस्टखत निर्माण करण्यासाठी आरक्षित आहे. परंतु या जागेच्या मागील अनेक वर्षापासून डम्पिंगयार्ड म्हणून वापर केला जात आहे. दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे या भागातील नागरिक त्रस्त आहेत. वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. सर्वसामान्यांना आंदोलनासाठी प्रवृत्त केले जात आहे. महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.दुनेश्वर पेठे, गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाdumpingकचरा