शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

नागपूर मनपा परिवहन विभाग : अडीच वर्षात २१ हजार वेळा बसेस बंद पडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 22:19 IST

रस्त्यांवर महापालिका परिवहन विभागाच्या नादुरुस्त बसेस धावत आहेत. या महिन्यात तब्बल ९४१ वेळा अचानक बसेस बंद पडल्या किंवा 'ब्रेक फेल' झाले. मागील अडीच वर्षात २१ हजार ६२२ ठिकाणी बसेस अचानक बंद पडल्या.

ठळक मुद्देनादुरुस्त बसमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात : मनपाचे देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील रस्त्यांवर महापालिका परिवहन विभागाच्या नादुरुस्त बसेस धावत आहेत. यामुळे शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याने बुधवारी स्कुटीस्वार तरुणी गंभीर जखमी झाली. दैव बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला. परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार या महिन्यात तब्बल ९४१ वेळा अचानक बसेस बंद पडल्या किंवा 'ब्रेक फेल' झाले. मागील अडीच वर्षात २१ हजार ६२२ ठिकाणी बसेस अचानक बंद पडल्या. शहरातील रस्त्यांवरून धावणाऱ्या आपली बसेसची देखभाल, दुरुस्ती होत नसल्याचे स्पष्ट असून यामुळे शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.बस बंद पडण्याच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत असतानाही बसच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे ब्रेक फेल होण्याच्या घटना घडत आहे. यामुळे गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता असूनही परिवहन विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने या विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लागले आहे.महापालिकेने शहर बससेवेसाठी तीन ऑपरेटरची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडेच आपली बसच्या देखभाल व दुरुस्तीचीही जबाबदारी आहे. परंतु त्याकडे ऑपरेटरचे दुर्लक्ष होत असल्याने दररोज अचानक बस बंद पडणे, ब्रेक फेल सारख्या घटना होत आहेत. या महिन्यात महापालिका परिवहन विभागाकडील नोंदीनुसार ९४१ ठिकाणी विविध कारणाने रस्त्यांवरच बस बंद पडली, अर्थात दररोज वेगवेगळ्या मार्गावर ३१ ठिकाणी बस अचानक बंद पडत आहे किंवा ब्रेक फेल होत आहेत. १ एप्रिल ते ३० सप्टेंबर, या सहा महिन्यात ४ हजार ८५४ ठिकाणी बस अचानक बंद पडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.जुनमध्ये ७०९ जुलैमध्ये ८६१ आणि ऑगस्टमध्ये ९१० ठिकाणी विविध रस्त्यांवर बस अचानक बंद पडल्या. त्यामुळे तिकिटसाठी पैसे खर्च करूनही नागरिकांना त्रास सहन करावा लागला. शहरात दररोज दीड लाख प्रवासी 'आपली बस'ने प्रवास करतात. आपली बसची सेवा उत्तम असल्याचा दावा परिवहन विभागाकडून केला जातो. परंतु देखभाल, दुरुस्तीअभावी प्रवाशांच्या सुरक्षेची कुठलीही खात्री नाही. मागील दोन वर्षातील आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.शहरात ३८० बसेस दररोज धावत आहेत. यातील २०० बस दहा वर्षे जुन्या आहेत. या बसमुळे प्रदूषण वाढत असून आतील आसनेही बसण्यास योग्य नाहीत. याशिवाय बसच्या खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांना दुखापत होण्याचा धोका आहे.दंड आकारला जातो पण वसुली नाहीबस फेऱ्या कमी झाल्या, उशिरा बस सुटली, बस बंद ठेवल्यास संबंधित ऑपरेटला दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार अनेकदा दंड आकारला जातो. पण वसुली कुठे दिसत नाही. यात पडद्याआड तडजोड होत असल्याने नादुरुस्त बसची संख्या वाढली आहे. या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे.सभापतींच्या भूमिके वर प्रश्नचिन्हशहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाची बससेवा मिळावी. याची जबाबदारी महापालिकेच्या परिवहन विभागाची आहे. परंतु बसची अवस्था, नादुरूस्त बसमुळे होणारे अपघात याचा विचार करता या विभागावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत. परिवहन सभापती यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बसेस बंद पडल्याच्या घटनावर्ष             घटना२०१७-१८    ९२६०२०१८-१९     ७५०८२०१९-२०(सप्टेंबरपर्यत) ५,८५४

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूक