शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा परिवहन विभाग : अडीच वर्षात २१ हजार वेळा बसेस बंद पडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 22:19 IST

रस्त्यांवर महापालिका परिवहन विभागाच्या नादुरुस्त बसेस धावत आहेत. या महिन्यात तब्बल ९४१ वेळा अचानक बसेस बंद पडल्या किंवा 'ब्रेक फेल' झाले. मागील अडीच वर्षात २१ हजार ६२२ ठिकाणी बसेस अचानक बंद पडल्या.

ठळक मुद्देनादुरुस्त बसमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात : मनपाचे देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील रस्त्यांवर महापालिका परिवहन विभागाच्या नादुरुस्त बसेस धावत आहेत. यामुळे शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याने बुधवारी स्कुटीस्वार तरुणी गंभीर जखमी झाली. दैव बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला. परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार या महिन्यात तब्बल ९४१ वेळा अचानक बसेस बंद पडल्या किंवा 'ब्रेक फेल' झाले. मागील अडीच वर्षात २१ हजार ६२२ ठिकाणी बसेस अचानक बंद पडल्या. शहरातील रस्त्यांवरून धावणाऱ्या आपली बसेसची देखभाल, दुरुस्ती होत नसल्याचे स्पष्ट असून यामुळे शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.बस बंद पडण्याच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत असतानाही बसच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे ब्रेक फेल होण्याच्या घटना घडत आहे. यामुळे गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता असूनही परिवहन विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने या विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लागले आहे.महापालिकेने शहर बससेवेसाठी तीन ऑपरेटरची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडेच आपली बसच्या देखभाल व दुरुस्तीचीही जबाबदारी आहे. परंतु त्याकडे ऑपरेटरचे दुर्लक्ष होत असल्याने दररोज अचानक बस बंद पडणे, ब्रेक फेल सारख्या घटना होत आहेत. या महिन्यात महापालिका परिवहन विभागाकडील नोंदीनुसार ९४१ ठिकाणी विविध कारणाने रस्त्यांवरच बस बंद पडली, अर्थात दररोज वेगवेगळ्या मार्गावर ३१ ठिकाणी बस अचानक बंद पडत आहे किंवा ब्रेक फेल होत आहेत. १ एप्रिल ते ३० सप्टेंबर, या सहा महिन्यात ४ हजार ८५४ ठिकाणी बस अचानक बंद पडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.जुनमध्ये ७०९ जुलैमध्ये ८६१ आणि ऑगस्टमध्ये ९१० ठिकाणी विविध रस्त्यांवर बस अचानक बंद पडल्या. त्यामुळे तिकिटसाठी पैसे खर्च करूनही नागरिकांना त्रास सहन करावा लागला. शहरात दररोज दीड लाख प्रवासी 'आपली बस'ने प्रवास करतात. आपली बसची सेवा उत्तम असल्याचा दावा परिवहन विभागाकडून केला जातो. परंतु देखभाल, दुरुस्तीअभावी प्रवाशांच्या सुरक्षेची कुठलीही खात्री नाही. मागील दोन वर्षातील आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.शहरात ३८० बसेस दररोज धावत आहेत. यातील २०० बस दहा वर्षे जुन्या आहेत. या बसमुळे प्रदूषण वाढत असून आतील आसनेही बसण्यास योग्य नाहीत. याशिवाय बसच्या खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांना दुखापत होण्याचा धोका आहे.दंड आकारला जातो पण वसुली नाहीबस फेऱ्या कमी झाल्या, उशिरा बस सुटली, बस बंद ठेवल्यास संबंधित ऑपरेटला दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार अनेकदा दंड आकारला जातो. पण वसुली कुठे दिसत नाही. यात पडद्याआड तडजोड होत असल्याने नादुरुस्त बसची संख्या वाढली आहे. या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे.सभापतींच्या भूमिके वर प्रश्नचिन्हशहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाची बससेवा मिळावी. याची जबाबदारी महापालिकेच्या परिवहन विभागाची आहे. परंतु बसची अवस्था, नादुरूस्त बसमुळे होणारे अपघात याचा विचार करता या विभागावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत. परिवहन सभापती यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बसेस बंद पडल्याच्या घटनावर्ष             घटना२०१७-१८    ९२६०२०१८-१९     ७५०८२०१९-२०(सप्टेंबरपर्यत) ५,८५४

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूक