शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

‘श्वानदंश’ आकडेवारीत नागपूर मनपाचे ‘गोलमाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 10:39 AM

उपराजधानीत भटक्या श्वानांची प्रचंड दहशत वाढली असून शहराच्या अनेक भागात तर रात्रीच्या वेळी जाणे फारच कठीण झाले आहे. एकीकडे श्वानांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना मनपाने मात्र श्वानदंशाच्या आकडेवारीचाच खेळ सुरू केला आहे.

ठळक मुद्देएकाच कालावधीतील दंशांबाबत वेगवेगळी माहितीदोन माहिती अधिकारांतील आकड्यांमध्ये तफावत

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत भटक्या श्वानांची प्रचंड दहशत वाढली असून शहराच्या अनेक भागात तर रात्रीच्या वेळी जाणे फारच कठीण झाले आहे. एकीकडे श्वानांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना मनपाने मात्र श्वानदंशाच्या आकडेवारीचाच खेळ सुरू केला आहे. मनपाने स्वत:च्याच आकडेवारीत अवघ्या वर्षभरात हेराफेरी केली असून श्वानदंशांची संख्याच कमी दाखविण्याचा प्रताप केला आहे. त्यामुळे शहरात श्वानदंशाची नेमकी आकडेवारी किती असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०१७ व २०१८ मध्ये प्राप्त झालेल्या माहितीच्या अधिकाराच्या आकडेवारीतून मनपाची ही ‘पोलखोल’ झाली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी काही दिवसांअगोदर माहिती अधिकारांतर्गत मनपाकडे विचारणा केली होती. २०११ सालापासून किती नागरिकांना श्वानदंश झाला, किती नागरिकांचा यामुळे मृत्यू झाला, मनपाने किती श्वानांची नसबंदी केली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. याअगोदर याचसंदर्भात त्यांनी २०१५ व २०१७ मध्येदेखील माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. मात्र मनपाने यंदा दिलेली आकडेवारी ही २०१५ व २०१७ च्या आकडेवारीपासून पूर्णत: वेगळी आहे. जुन्या आकडेवारीनुसार एप्रिल २०११ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत नागपुरातील ७२ हजार ८९२ नागरिकांना श्वानांनी दंश केला होता. मात्र माहिती अधिकारातील नवीन आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०११ ते जुलै २०१८ या कालावधीत श्वानदंश झालेल्या नागरिकांची आकडेवारी ही अवघी ३१ हजार २५८ इतकी दाखविण्यात आली आहे. दिवसांचा कालावधी लक्षात घेता सप्टेंबर २०१७ नंतर जुलै २०१८ पर्यंत आकडेवारी वाढणे किंवा तेवढीच राहणे अपेक्षित होते. मात्र मनपाच्या आकडेवारीत चक्क ४१ हजार ६३४ नागरिकांची घट झाली आहे. ही टक्केवारी थोडीथोडकी नसून १३३ टक्के इतकी आहे. मनपाने नेमकी आकडेवारीतील गणित का बिघडविले व श्वानदंश झालेल्या नागरिकांची नेमकी संख्या किती असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

नेमकी खरी माहिती कोणती ?माहितीच्या अधिकाराअंतर्गत नेमकी व अचूक माहिती असणे अपेक्षित असते. मनपाच्या आरोग्य विभागाकडून एकाच कालावधीत संपूर्ण शहरात झालेल्या श्वानदंशाबाबत २०१७ व २०१८ मध्ये वेगवेगळी माहिती देण्यात येत असेल तर हा संभ्रम निर्माण करणारा प्रकार आहे. आता नेमकी खरी माहिती कोणती मानावी, असा प्रश्न अभय कोलारकर यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका