शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

नागपूरमधील रस्ते ३१ मेपर्यंत रस्ते दुरुस्त न झाल्यास मनपा करेल कारवाई : आयुक्तांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:13 IST

Nagpur : महिनोनमहिने खोदकाम केलेले रस्ते चार दिवसांत दुरुस्त कसे होणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्यापूर्वी शहरातील खोदकाम केलेले सर्व रस्ते ३१ मेपूर्वी पूर्ववत करण्यात यावेत अन्यथा संबंधित कंत्राटदारांवर दंड ठोठावण्याचे, तसेच फौजदारी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी दिले; परंतु शहरातील चारही भागांत रस्त्याचे मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असून गेल्या अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू असलेले हे काम येत्या चार दिवसांत कसे पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागात सीवर लाइन, पिण्याच्या पाण्याची लाइन आणि इतर कामांसाठी रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. या रस्त्यांचे काम पूर्ण करून त्याला पूर्ववत करण्यासाठी बैठक मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, मुख्य अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, श्रीकांत वाईकर यांच्यासह सर्व झोनचे कार्यकारी अभियंता आणि ही कामे करणारे कंत्राटदार उपस्थित होते. या सर्वांना खोदकाम केलेले रस्ते पुढील चार दिवसांत दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या. तसेच कर्तव्यात कुचराई करणाऱ्या महपालिकेच्या संबंधित अभियंत्यांवरसुद्धा कारवाई करण्याचा इशाराही दिला. 

पावसाळ्यात रस्ते खोदण्यास बंदीपावसाळ्यात नागपूर महानगरपालिकातर्फे आता रस्ते खोदण्याची परवानगी कोणत्याही विभागाला किंवा संस्थांना दिली जाणार नाही. जर कोणत्याही विभागाने खोदकाम सुरू केले तर त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली जाईल, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. 

जलवाहिनी टाकण्याचे ७८ टक्के काम पूर्णबैठकीत अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी सीवर लाइन, तसेच जलवाहिन्या टाकण्यासाठी सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. अमृत योजना टप्पा २ अंतर्गत ७८.९४ टक्के काम पूर्ण झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जलवाहिनी तसेच फिडर लाइन टाकण्यासाठी ४०.९६ किलोमीटरचे काम सुरू आहे. त्यापैकी ३२.३३ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. सध्या ८.६३ किलोमीटरचे काम अपूर्ण आहे. विशेष म्हणजे, यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत खोदकाम झाले आहे. आता हे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सर्व कंत्राटदारांना देण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यात रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यास कंत्राटदारांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही डॉ. चौधरी यांनी दिला आहे. 

मलबा न उचलल्यास दंडशहरात झोपडपट्ट्या किंवा अविकसित भागांमध्ये सीवर लाइन टाकण्याची कामे सुरू आहेत. याबद्दल झोननिहाय माहिती देण्यात आली. रस्त्यावर वाहने घसरून पडणार नाही, अशा स्थितीतमध्ये रस्त्यांची कामे झाले पाहिजेत, यासंदर्भात कोणत्याही नागरिकांकडून तक्रार येता कामा नये, रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा मलबा किंवा कचऱ्याचे ढिगारे दिसता कामे नये, हा मलबा उचलण्याची जबाबदारीसुद्धा कंत्राटदारांची आहे, ही कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याचा सूचनाही आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिला. हा मलबा उचलला किंवा नाही, याची पाहणी महापालिकेच्या स्वच्छता विभागाने करावी व दोषी आढळून आलेल्या कंत्राटदारांवर मोठा दंड ठोठाविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

टॅग्स :nagpurनागपूरroad safetyरस्ते सुरक्षा