शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नागपूर मनपा : १३५ कोटी वाटपाची घोषणा केल्यानंतरही वित्त विभागाचा असहकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:01 IST

महापालिकेच्या कंत्राटदारांचे १३५ कोटींचे थकीत बिल तीन दिवसात देण्यात येईल. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली होती. परंतु पाच दिवसानंतरही वित्त विभाग यादृष्टीने प्रयत्नात असल्याचे दिसत नाही. सत्तापक्षाकडून घोषणा केल्या जातात. पण प्रशासनाकडून त्यात आडकाठी आणण्याचा प्रकार सुरू असल्याने थकीत बिलासाठी कंत्राटदारांच्या वित्त विभागात चकरा सुरू असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देसत्तापक्षाच्या घोषणा; प्रशासनाची आडकाठी !

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या कंत्राटदारांचे १३५ कोटींचे थकीत बिल तीन दिवसात देण्यात येईल. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली होती. परंतु पाच दिवसानंतरही वित्त विभाग यादृष्टीने प्रयत्नात असल्याचे दिसत नाही. सत्तापक्षाकडून घोषणा केल्या जातात. पण प्रशासनाकडून त्यात आडकाठी आणण्याचा प्रकार सुरू असल्याने थकीत बिलासाठी कंत्राटदारांच्या वित्त विभागात चकरा सुरू असल्याचे चित्र आहे.वित्त विभागाला प्रमुख अधिकारी नाही. उपायुक्त नितीन कापडनीस यांच्याकडे या विभागाचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. मार्च महिन्यापासून त्यांच्या टेबलावर शेकडो बिले पडून आहेत. स्वाक्षरी न केल्याने प्रलंबित आहेत. सप्टेबर ते आॅक्टोबर या कालावधीत १०१.७९ कोटींची जीएसटी अनुदानातील थकबाकी प्राप्त झाली. स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा व आयुक्त अभिजित बांगर यांनी जुलैपर्यंतचे बिल देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तीन दिवसात बिल देण्याची घोषणा केली. परंतु कापडणीस यांनी बिलावर सह्या न केल्याने अजूनही बिल पडून आहेत.वित्त विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कापडणीस यांनी सामान्य वर्गातील ६९ कोटींच्या फाईल क्लीअर केलेल्या नाहीत. वास्तविक आयुक्तांनी या संदर्भात कापडणीस यांना विचारणा के ली होती. तसेच प्रलंबित बिलांवर सह्या करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही बिल प्रलंबित आहेत. दुसरीकडे कंत्राटदार बिलासाटी वित्त विभागात चकरा मारत आहेत.वित्त विभागात अडवणूकसत्तापक्षातर्फे प्रलंबित बिल देण्याची घोषणा केली जाते. परंतु वित्त विभागाकडून अडणूक केली जात आहे. प्रभारी वित्त अधिकारी सह्याच करीत नसतील तर बिल क्लीअर कसे होतील. असा सवाल मनपा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष विजय नायडू यांनी केला आहे.विकास कामांना फटकादिवाळीच्या अगोदरपासून शहरातील विकास कामे ठप्प आहेत. प्रलंबित बिलासाठी कंत्राटदारांनी आंदोलन केले . परंतु आश्वासनाशिवाय ठोस असे काही त्यांच्या पदरात पडले नाही. वित्त विभागाच्या कारभारात सुधारणा झाल्याशिवाय कंत्राटदारांना बिल मिळणार नाही. बिल प्रलंबित असल्याने कंत्राटदार काम करायला तयार नाही. लोकसभा निवडणुका विचारात घेता सत्तापक्षाकडून विकास कामाला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु प्रशासनाकडून त्यात अडथळा आणला जात आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfundsनिधी