शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

नागपूर मनपाकडे दमडी नाही; खैरात मात्र कोट्यवधींच्या प्रकल्पांची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 10:44 IST

महापालिका आर्थिक संकटात आहे. कंत्राटदार व बस आॅपरेटर यांची थकबाकी ५०० कोटींच्या पुढे गेली आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीचा अजब कारभार ५०० कोटींची थकबाकी, शेकडो कोटींची नवीन कामे

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आर्थिक संकटात आहे. कंत्राटदार व बस आॅपरेटर यांची थकबाकी ५०० कोटींच्या पुढे गेली आहे. अत्यावश्यक खर्च, ५०० कोटींच्या कर्जाचा हप्ता, केंद्र व राज्य सरकारच्या विविध प्रकल्पांतील महापालिकेचा वाटा व दर महिन्याला तिजोरीत जमा होणारा महसूल विचारात घेता नवीन विकास कामांसाठी पैसा शिल्लक राहणे शक्यच नाही. थकबाकी द्यायला पैसा नसतानाही स्थायी समितीने मात्र कोट्यवधीच्या विकास कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला आहे.कंत्राटदारांना आठ महिन्यांपासून बिल मिळालेले नाही. पाच-दहा लाखांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आल्याने गेल्या दोन महिन्यापासून कंत्राटदारांचे आंदोलन सुरू आहे. महिनाभरापासून विकास कामे बंद आहेत. आपली बस आॅपरेटरची थकबाकी ६० कोटीवर गेली आहे. कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग व महागाई भत्त्याची थकबाकी ७० ते ८० कोटी आहे. हक्काचा पैसा मिळत नसल्याने कर्मचारी संपाच्या तयारीत आहेत. कंत्राटदारांची बिले प्रलंबित आहेत. वित्त विभागात सादर केलेल्या बिलाच्या फाईल्सचे ढिगारे लागले आहेत. प्रशासन हतबल झाले आहे. यावर तोडगा न काढता स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी नवीन कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला आहे. २०१८-१९ या वर्षात तिजोरीत २,९४६ कोटींचा महसूल जमा होईल, असे गृहित धरून कारभार सुरू आहे. प्रत्यक्ष उत्पन्नातून १२०० कोटींच्या आसपास महसूल जमा होणार असल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. तिजोरीचा अंदाज न घेता समितीकडून नवीन कामांना मंजुरी देण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. यामुळे प्रशासनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पैसा नसताना नवीन फाईल मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे.स्थायी समितीत दर महिन्याला कोट्यवधींच्या कामांना मंजुरी दिली जाते. दोन दिवसापूर्वीच्या बैठकीत पुन्हा ८ ते १० कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. तिजोरीत पैसा नसताना मंजुरी देऊन निविदा काढण्याचा अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक आर्थिक स्थिती चांगली असेल तर मंजुरी कधीही घेता येईल. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून मंजुरीचा एक कलमी कार्यक्रम राबविला जात आहे.

आर्थिक स्थितीला स्थायी समितीच जबाबदारउत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता, नगर रचना, बाजार, स्थावर विभाग व जलप्रदाय विभागावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी स्थायी समितीची आहे. विभागांना दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी नियोजन करण्याची जबाबदारी समितीची आहे. मात्र उत्पन्नात वाढ होण्यासाठी ठोस निर्णय न घेता काही विशिष्ट स्वरूपाच्या कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला आहे.याचा वसुलीवर परिणाम झाला आहे. महापालिकेच्या बिकट आर्थिक स्थितीला स्थायी समितीच जबाबदार असल्याचा नगरसेवकांचा आक्षेप आहे.

१२५ कोटी मिळणार असल्याचा दावामहापालिकेने राज्य सरकारकडे ३२५ कोटींच्या विशेष अनुदानाची मागणी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे. पहिल्या टप्प्यात यातील १२५ कोटी तातडीने मिळणार असल्याचा दावा स्थायी समितीकडून केला जात आहे. वास्तविक अशी चर्चा गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे. नवीन कामांना मंजुरी देण्यावर आक्षेप येऊ नये यासाठी ही शक्कल लढविल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका