शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

नागपूर महापालिका सापडली बिकट आर्थिक संकटात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 13:58 IST

राज्य सरकारकडून अपेक्षित जीएसटी अनुदान मिळत नाही.आस्थापना खर्च व कर्जाच्या व्याजाचा हप्ता दर महिन्याला द्यावा लागत आहे. उत्पन्न व खर्चाचे नियोजन कोलमडल्याने नागपूर महापालिकेपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्पात अंदाज २२७२ कोटींचा सात महिन्यात ९४१ कोटी जमाविकास कामांना निधी नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेला मालमत्ता विभाग उत्पन्नात माघारला आहे. नगररचना विभागाचीही अशीच स्थिती आहे. त्यातच राज्य सरकारकडून अपेक्षित जीएसटी अनुदान मिळत नाही. जलप्रदाय विभागाचेही उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे आस्थापना खर्च व कर्जाच्या व्याजाचा हप्ता दर महिन्याला द्यावा लागत आहे. उत्पन्न व खर्चाचे नियोजन कोलमडल्याने महापालिकेपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.महापालिकेचा २०१७-१८ या वर्षाचा अर्थसंकल्प २२७१.९७ कोटींचा सादर करण्यात आला होता. महापालिकेला शासनाकडून जीएसटी अनुदान स्वरुपात वर्षाला १०६३.५६ म्हणजेच दर महिन्याला ८८.६३ कोटींचे अनुदान गृहीत धरण्यात आले होेते. महापालिका प्रशासनानेही राज्य सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविला होता. परंतु प्रत्यक्षात दर महिन्याला जीएसटी अनुदान स्वरुपात ५१.५६ कोटी मिळत आहे. वर्षाला ही रक्कम ६१८.७२ कोटी इतकीच होते. अपेक्षित अनुदानाच्या ४४४.८४ कोटी कमी मिळणार आहे. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत ९४१. २८ कोटींचा महसूल जमा झाला. पुढील साडेचार महिन्यात २२७१.९७ कोटींचा आकडा गाठण्याची शक्यता नाही.एलबीटी बंद झाल्याने मालमत्ता कर हाच महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. त्यात घरांच्या सर्वेचा घोळ निर्माण झाला आहे. डिसेंबरपूर्वी शहरातील घरांचा सर्वे होण्याची शक्यता नाही.करण्यात आलेल्या सर्वेवर नगरसेवक व नागरिकांनी  आक्षेप नोंदविले आहेत. याचा परिणाम मालमत्ता कराच्या वसुलीवर होणार आहे. नगररचना विभागाचीही अशीच परिस्थिती आहे. शासनाकडून मागणीनुसार अनुदान मिळण्याची शक्यता नाही.उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे नाहीजुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आला. स्थानिक संस्था कर (एलबीटी) संपुष्टात आला आहे. अर्थसंकल्पात १०६५ कोटींचे जीएसटी अनुदान गृहीत धरण्यात आले होेते. मात्र ६१८.७२ कोटीचे अनुदान मिळणार आहे. उत्पन्नवाढीसाठी थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्यात आली. यात दंडाची रक्कम माफ केल्यानंतरही मालमत्ता व पाणीपट्टीची १० टक्केच थकबाकी वसूल झाली.

टॅग्स :nagpurनागपूर