शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

जैविक आपत्ती निवारणाचे ‘नागपूर मॉडेल’ भविष्यासाठी पथदर्शी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 14:00 IST

आपत्ती निवारणाच्या संदर्भात भविष्यात उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आपत्तीसाठी या उपाययोजना ‘नागपूर मॉडेल’ म्हणून निश्चितच पथदर्शी ठरतील यात शंका नाही.

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ‘कोरोना’च्या निमित्ताने सध्या संपूर्ण जग एका महाभयानक संकटाचा मुकाबला करत आहे. या संकटाने भारतातही प्रवेश केला आहे. राज्यातील ज्या शहरांची तुलनेने जगाशी जास्त ‘कनेक्टीव्हीटी’ आहे त्यात नागपूर आणि परिसराचा अग्रक्रमाने समावेश होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या राज्याच्या उपराजधानीची याबाबतची संवेदनशीलता लक्षात घेऊन प्रशासनाने वेळीच उपाययोजना सुरू केल्याने येथील परिस्थिती अद्यापपर्यंत तरी तशी नियंत्रणात आहे. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या नागपूरची ख्याती एक प्रमुख ‘लॉजिस्टीक हब’ अशी असल्याने येथील परिस्थिती तुलनेने जास्त आव्हानात्मक असून ती अधिक प्रभावीपणे हाताळण्याची गरज असते. त्यानुसार सध्या ती अत्यंत चोखपणे हाताळली जात आहे.गेल्या ११ मार्चला नागपूर शहरात पहिला ‘कोरोना’बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर गेल्या २० दिवसात ही संख्या १६ इतकी नियंत्रणात आहे. त्यातही सुरुवातीचे दोन आठवडे अवघे चार बाधित रुग्ण होते. यशस्वी उपचारांमुळे हे चारही बाधित रुग्ण आता बरे होऊन घरी परतले आहेत.नागपूर शहरात संशयित नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला. आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या नागरिकांच्या विलगीकरणासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली. त्यासोबतच देशांतर्गत प्रवास केलेल्या सर्व प्रवाशांचे ‘स्कॅनिंग’ करून त्यांना आता आमदार निवासात स्थापित करण्यात आलेल्या केंद्रात ठेवण्यात आले आहे. सध्या ही क्षमता ४५० व्यक्तींसाठी असून शहरातील ही क्षमता १७ हजार इतकी वाढविण्याचे नियोजन कृतीच्या पातळीवर आहे.शहरात आढळून आलेल्या ‘कोरोना’बाधितांच्या संपर्कातील सर्व नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तात्काळ तपासणी करण्यात आली. जनतेत व्यापक जनजागृती मोहीम राबवितानाच विविध माध्यमांद्वारे नागरिकांना माहिती देण्यासाठी विशेष अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. ‘कोरोना’चा सामूहिक संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मेयो व मेडिकल येथील वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार ‘व्हेंटिलेटर’सह सर्व आवश्यक ती सामग्री खरेदीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात आला. जिल्हा प्रशासनानेही ‘मायक्रो प्लॅनिंग’ करताना अनेक महत्त्वाच्या बाबींवर जाणिवेने काम सुरू केले. महापालिका प्रशासनानेही या साऱ्या उपाययोजनांमध्ये सहयोग देताना एक चांगला आदर्श घालून दिला. महापालिका यंत्रणेने ‘कोरोना’संदर्भात केलेले कार्य स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पथदर्शी ठरावे असे आहे.समाजातील कमकुवत घटकांना प्रशासनातर्फे मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असल्याने नागरिकांनी साठेबाजी करू नये, यासाठीही जनजागृती करण्यात आली. कामगारांसह बेघर नागरिकांसाठी विभागात १२१ निवारागृहे सुरूकरण्यात आली आहेत. तेथे १० हजार ३३९ नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी ‘लॉकडाऊन’सह इतर सर्व उपाययोजनांमध्ये प्रभावी कृती योजना करताना बजावलेली कामगिरी मोठी आहे. ‘सायबर सेल’च्या प्रयत्नांमुळे अफवांना आळा बसला आहे.‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने अत्यंत सजगता आणि संवेदनशीलता दाखवून गेल्या तीन आठवड्यांपासून अतिशय जबाबदारीने व नियोजनाने काम केले आहे. आपत्ती निवारणाच्या संदर्भात भविष्यात उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आपत्तीसाठी या उपाययोजना ‘नागपूर मॉडेल’ म्हणून निश्चितच पथदर्शी ठरतील यात शंका नाही.- हेमराज बागुल, संचालक, माहिती व जनसंपर्क, नागपूर 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस