शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जैविक आपत्ती निवारणाचे ‘नागपूर मॉडेल’ भविष्यासाठी पथदर्शी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 14:00 IST

आपत्ती निवारणाच्या संदर्भात भविष्यात उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आपत्तीसाठी या उपाययोजना ‘नागपूर मॉडेल’ म्हणून निश्चितच पथदर्शी ठरतील यात शंका नाही.

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ‘कोरोना’च्या निमित्ताने सध्या संपूर्ण जग एका महाभयानक संकटाचा मुकाबला करत आहे. या संकटाने भारतातही प्रवेश केला आहे. राज्यातील ज्या शहरांची तुलनेने जगाशी जास्त ‘कनेक्टीव्हीटी’ आहे त्यात नागपूर आणि परिसराचा अग्रक्रमाने समावेश होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या राज्याच्या उपराजधानीची याबाबतची संवेदनशीलता लक्षात घेऊन प्रशासनाने वेळीच उपाययोजना सुरू केल्याने येथील परिस्थिती अद्यापपर्यंत तरी तशी नियंत्रणात आहे. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या नागपूरची ख्याती एक प्रमुख ‘लॉजिस्टीक हब’ अशी असल्याने येथील परिस्थिती तुलनेने जास्त आव्हानात्मक असून ती अधिक प्रभावीपणे हाताळण्याची गरज असते. त्यानुसार सध्या ती अत्यंत चोखपणे हाताळली जात आहे.गेल्या ११ मार्चला नागपूर शहरात पहिला ‘कोरोना’बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर गेल्या २० दिवसात ही संख्या १६ इतकी नियंत्रणात आहे. त्यातही सुरुवातीचे दोन आठवडे अवघे चार बाधित रुग्ण होते. यशस्वी उपचारांमुळे हे चारही बाधित रुग्ण आता बरे होऊन घरी परतले आहेत.नागपूर शहरात संशयित नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला. आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या नागरिकांच्या विलगीकरणासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली. त्यासोबतच देशांतर्गत प्रवास केलेल्या सर्व प्रवाशांचे ‘स्कॅनिंग’ करून त्यांना आता आमदार निवासात स्थापित करण्यात आलेल्या केंद्रात ठेवण्यात आले आहे. सध्या ही क्षमता ४५० व्यक्तींसाठी असून शहरातील ही क्षमता १७ हजार इतकी वाढविण्याचे नियोजन कृतीच्या पातळीवर आहे.शहरात आढळून आलेल्या ‘कोरोना’बाधितांच्या संपर्कातील सर्व नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तात्काळ तपासणी करण्यात आली. जनतेत व्यापक जनजागृती मोहीम राबवितानाच विविध माध्यमांद्वारे नागरिकांना माहिती देण्यासाठी विशेष अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. ‘कोरोना’चा सामूहिक संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मेयो व मेडिकल येथील वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार ‘व्हेंटिलेटर’सह सर्व आवश्यक ती सामग्री खरेदीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात आला. जिल्हा प्रशासनानेही ‘मायक्रो प्लॅनिंग’ करताना अनेक महत्त्वाच्या बाबींवर जाणिवेने काम सुरू केले. महापालिका प्रशासनानेही या साऱ्या उपाययोजनांमध्ये सहयोग देताना एक चांगला आदर्श घालून दिला. महापालिका यंत्रणेने ‘कोरोना’संदर्भात केलेले कार्य स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पथदर्शी ठरावे असे आहे.समाजातील कमकुवत घटकांना प्रशासनातर्फे मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असल्याने नागरिकांनी साठेबाजी करू नये, यासाठीही जनजागृती करण्यात आली. कामगारांसह बेघर नागरिकांसाठी विभागात १२१ निवारागृहे सुरूकरण्यात आली आहेत. तेथे १० हजार ३३९ नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी ‘लॉकडाऊन’सह इतर सर्व उपाययोजनांमध्ये प्रभावी कृती योजना करताना बजावलेली कामगिरी मोठी आहे. ‘सायबर सेल’च्या प्रयत्नांमुळे अफवांना आळा बसला आहे.‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने अत्यंत सजगता आणि संवेदनशीलता दाखवून गेल्या तीन आठवड्यांपासून अतिशय जबाबदारीने व नियोजनाने काम केले आहे. आपत्ती निवारणाच्या संदर्भात भविष्यात उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आपत्तीसाठी या उपाययोजना ‘नागपूर मॉडेल’ म्हणून निश्चितच पथदर्शी ठरतील यात शंका नाही.- हेमराज बागुल, संचालक, माहिती व जनसंपर्क, नागपूर 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस