शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नागपुरात पारा घसरला, गारठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 20:52 IST

Winter, mercury dropped and chill increased गेल्या तीन-चार दिवसात विदर्भातील तापमानात अचानक मोठ्या फरकाने घट झाली आहे. बुधवारपासून थंडीची चाहुल लागली आणि रात्रीचा पारा तब्बल ५ डिग्रीने घसरला.

ठळक मुद्देदोन दिवसात नागपूरकरचा पारा ५ डिग्रीने घसरला

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : गेल्या तीन-चार दिवसात विदर्भातील तापमानात अचानक मोठ्या फरकाने घट झाली आहे. बुधवारपासून थंडीची चाहुल लागली आणि रात्रीचा पारा तब्बल ५ डिग्रीने घसरला. तापमान घटल्याने सायंकाळनंतर बाहेर पडताना गारठ्याची तीव्र जाणीव होऊ लागली आहे. शनिवारी किमान तापमानात १ अंशाची वाढ होऊन १३.७ अंशाची नोंद करण्यात आली. मात्र पुढच्या आठवड्यात तापमानात आणखी घट होणार असून ते १० अंशावर जाण्याचा अंदाज हवामान खात्याने नोंदविला आहे. दरम्यान शनिवारी विदर्भात यवतमाळ येथे सर्वात कमी ११.५ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली.

विदर्भात दरवर्षी साधारणत: डिसेंबर महिन्यात थंडीला सुरुवात हाेते. मात्र यावेळी नाेव्हेंबर महिन्यातच थंडीने हुडहुडी भरवली आहे. महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात थंडीचे आगमन झाले. ३ नाेव्हेंबरपर्यंत तापमान सामान्य हाेते, मात्र ४ तारखेला हवामानाने कुस बदलली. ५ राेजी अचानक तापमानात ३.४ डिग्रीची घसरण झाली. नागपुरात बुधवारी व गुरुवारी १२.८ अंश किमान तापमानाची नाेंद झाली. शनिवारी त्यात एक अंशाने थाेडी वाढ झाली पण रात्रीचा गारठा कायम आहे. कमाल तापमान ३२.४ डिग्री नाेंदविण्यात आले. आर्द्रता मात्र ५७ टक्के हाेती. सकाळी उन पडल्यानंतरही ९ वाजतापर्यंत हवेचा गारवा जाणवताे. यावर्षी थंडीचा जोर जास्त राहणार असल्याचे संकेत आहेत.

पुढच्या आठवड्यात तापमानात आणखी घट हाेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने नाेंदविला आहे. अंदाजानुसार ८ नाेव्हेंबरला १.५ डिग्रीची घट हाेऊन १२ अंशावर पाेहचेल. ९ व १० राेजी त्यात पुन्हा घट हाेउन पारा ११ अंशावर पाेहचेल. ११ नाेव्हेंबरला १० अंश पाेहचेल असा अंदाज आहे. दिवाळीचा उत्सवही गुलाबी थंडीत जाणार हे निश्चित.

टॅग्स :weatherहवामानnagpurनागपूर