शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाघांनी रोखला नागपूर-काटोल महामार्ग; साडेबारा किमीचे काम थांबले

By आनंद डेकाटे | Updated: November 18, 2022 11:15 IST

मंजुरीसाठी केंद्रीय वाईल्ड लाईफकडे प्रस्ताव सादर

नागपूर :नागपूर-काटोल या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. वर्ष झाले, परंतु पूर्व विदर्भातील प्रस्तावित 'टायगर कॉरिडॉर'मधून हा महामार्ग जात असल्याची बाब उपस्थित झाल्याने वन विभागाचे क्लिअरन्स मिळविणे आवश्यक झाले आहे. परिणामी साडेबारा किमी रस्त्याचे काम बंद पडले आहे. त्यामुळे हे काम कधी पूर्ण होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागपूर - काटोल हा महामार्ग ४८.२ किमीचा महामार्ग आहे. एकूण ५९० कोटी रुपयाच्या या प्रकल्पाच्या कामाला २९ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरुवात झाली. स्टेप वन व स्टेप २ या दोन्हीचे क्लिअरन्स घेण्यात आले. रस्त्याचे काम सुरू असतानाच या महामार्गाअंतर्गत पूर्व विदर्भातील वन्य जीवांच्या भ्रमणाचा मार्ग 'टायगर 'कॉरिडॉर' प्रस्तावित असल्याची बाब पुढे आली. त्यामुळे वन विभागाने यावर आक्षेप घेतला. त्यानंतर बोर व्याघ्र प्रकल्पातील काही गावेसुद्धा या चौपदरीकरणाच्या कामात येत असल्याची बाब उपस्थित करण्यात आली. असे एकूण साडेबारा किमीच्या मार्गासंदर्भात वाईल्ड लाईफची मंजुरी घेतली आहे. त्या अंतर्गत २.८७ कोटी रुपये भरण्यात आले. त्यानंतर आता हा प्रस्ताव केंद्रीय वाईल्ड लाईफकडे प्रस्तावित आहे. परिणामी एकूण साडेबारा किमीचे काम बंद पडले आहे. 

उर्वरित ३६ किमी महामार्गाचे काम सुरू आहे. २४ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. एक वर्ष झाले आहे. वर्षभरात १२ टक्केच काम झाले आहे. यातच 'टायगर कॉरिडॉरचा विषय आला. त्यामुळे या महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न आहे.

मुख्य वैशिष्ट्य

  • ४८.२ किमी नागपूर- काटोल चार पदरी रस्त्याची लांबी
  • ५९० कोटी एकूण खर्च
  • ११ कि.मी. चा नवीन बायपास
  • १७२ हेक्टरचे भूमी अधिग्रहण जवळपास पूर्ण

 

महामार्गातून टायगर कॉरिडॉर प्रस्तावित असल्याने साडेबारा किमीचे काम बंद आहे. या संदर्भात राज्य वाईल्ड लाईफची मंजुरी मिळाली आहे. सध्या केंद्रीय वाईल्ड लाईफकडे प्रस्ताव आहे. उर्वरित महामार्गाचे काम सुरू आहे.

- विलास पी. ब्राह्मणकर, महाव्यवस्थापक (तांत्रिक) परियोजन निदेशक, राष्ट्रीय महामार्ग 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकnagpurनागपूर