शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

नागपुरात ६३ तर अकोल्यात ४३ दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांनी गाठला ३०० चा आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 08:59 IST

विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोल्यात गतीने रुग्ण वाढताना दिसून येत आहे. धक्कादायक म्हणजे, नागपूरला ३०० ची रुग्ण संख्या गाठायला ६३ दिवसांचा कालावधी लागला, तर अकोल्यात केवळ ४३ दिवसात ही संख्या गाठली.

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोल्यात गतीने रुग्ण वाढताना दिसून येत आहे. धक्कादायक म्हणजे, नागपूरला ३००ची रुग्ण संख्या गाठायला ६३ दिवसांचा कालावधी लागला, तर अकोल्यात केवळ ४३ दिवसात ही संख्या गाठली. गुरुवारी नागपुरात आठ तर अकोल्यात १६ रुग्णांची नोंद झाली आहे. शिवाय, येथे एक दिवसाआड रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोविड रुग्णसंख्येत अकोला नागपूरला मागे तर टाकणार नाही ना, अशी चिंता उपस्थित केली जात आहे. शासनाने या जिल्ह्यात व्यापक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.नागपुरात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद ११ मार्च रोजी झाली. या महिन्यात केवळ १६ रुग्णांची नोंद झाली. एप्रिल महिन्याच्या १४ तारखेपर्यंत रुग्णांची संख्या वाढून ५० झाली. २४ एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या १०० झाली. २ मे रोजी रुग्णांची संख्या १५० वर पोहचली. ७ मे रोजी २६७ तर १२ मे रोजी नागपूरने ३०० रुग्णांची संख्या ओलांडली. ही संख्या गाठायला ६३ दिवस लागले.अकोल्यात पहिल्या रुग्णाची नोंद ७ एप्रिललाअकोल्यात पहिल्या रुग्णाची नोंद ७ एप्रिल रोजी झाली. सुरुवातीला रुग्ण वाढण्याची गती फारच संथ होती. या महिन्यात ५० च्या आत रुग्ण होते. परंतु मे महिन्याला सुरुवात होताच झपाट्याने रुग्ण वाढायला लागले. ८ मे रोजी जिल्ह्यात रुग्णांची संखा १३७ होती. १० मे रोजी १५४ वर रुग्णसंख्या गेली. चार दिवसांत ५० रुग्णांची भर पडून १४ मे रोजी २०७ वर पोहचली. १७ मे रोजी २५७ तर २० मे रोजी रुग्णांची संख्या ३०८ झाली. रुग्णांचा हा टप्पा गाठायला ४३ दिवस लागले.नागपुरात सात तर अकोल्यात २१ मृत्यूनागपूरच्या तुलनेत अकोल्यात तीन पटीने मृत्यू झाले आहेत. नागपुरात पहिला मृत्यू ४ एप्रिल, दुसरा २१ एप्रिल, तिसरा २८ एप्रिल, चौथा ६ मे, पाचवा १६ मे, सहावा १७ मे तर सातवा १८ मे रोजी मृत्यूची नोंद झाली तर अकोल्यात पहिला मृत्यू १ मे रोजी होता. नंतर २ मे एक, ३ मे दोन, ६ मे चार, ८ मे एक, १० मे एक, ११ मे एक, १३ मे एक, १५ मे दोन, १७ मे एक, १९ मे दोन तर आज २० मे रोजी पुन्हा एक असे एकूण २० मृत्यू व एका रुग्णाची आत्महत्या अशी २१ मृतांची नोंद आहे. विशेष म्हणजे, नागपुरात गंभीर स्वरूपात रुग्णालयात येऊन मृत्यू झालेल्यांची संख्या पाच आहे. एका रुग्णाचा मृत्यू उपचाराच्या सात दिवसानंतर झाला. तर एका रुग्णाचा घरीच मृत्यू झाल्यानंतर त्याचे नमुने पॉझिटिव्ह आले. तर अकोल्यात ९ रुग्णांचे मृत्यू आयसोलेशन वॉर्डात उपचार घेताना झाले आहेत.नागपुरात ७८ टक्के तर अकोल्यात ५८ टक्के कोरोनामुक्तनागपुरात गुरुवार दुपारपर्यंत ३९५ रुग्ण व ३१० कोरोनामुक्त तर अकोल्यात ३२४ रुग्ण व १९१ कोरोनामुक्तांची नोंद होती. टक्केवारीनुसार नागपुरात ७८.४८ टक्के तर अकोल्यात ५८.९५ टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस