शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

नागपुरात ६३ तर अकोल्यात ४३ दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांनी गाठला ३०० चा आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 08:59 IST

विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोल्यात गतीने रुग्ण वाढताना दिसून येत आहे. धक्कादायक म्हणजे, नागपूरला ३०० ची रुग्ण संख्या गाठायला ६३ दिवसांचा कालावधी लागला, तर अकोल्यात केवळ ४३ दिवसात ही संख्या गाठली.

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोल्यात गतीने रुग्ण वाढताना दिसून येत आहे. धक्कादायक म्हणजे, नागपूरला ३००ची रुग्ण संख्या गाठायला ६३ दिवसांचा कालावधी लागला, तर अकोल्यात केवळ ४३ दिवसात ही संख्या गाठली. गुरुवारी नागपुरात आठ तर अकोल्यात १६ रुग्णांची नोंद झाली आहे. शिवाय, येथे एक दिवसाआड रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोविड रुग्णसंख्येत अकोला नागपूरला मागे तर टाकणार नाही ना, अशी चिंता उपस्थित केली जात आहे. शासनाने या जिल्ह्यात व्यापक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.नागपुरात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद ११ मार्च रोजी झाली. या महिन्यात केवळ १६ रुग्णांची नोंद झाली. एप्रिल महिन्याच्या १४ तारखेपर्यंत रुग्णांची संख्या वाढून ५० झाली. २४ एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या १०० झाली. २ मे रोजी रुग्णांची संख्या १५० वर पोहचली. ७ मे रोजी २६७ तर १२ मे रोजी नागपूरने ३०० रुग्णांची संख्या ओलांडली. ही संख्या गाठायला ६३ दिवस लागले.अकोल्यात पहिल्या रुग्णाची नोंद ७ एप्रिललाअकोल्यात पहिल्या रुग्णाची नोंद ७ एप्रिल रोजी झाली. सुरुवातीला रुग्ण वाढण्याची गती फारच संथ होती. या महिन्यात ५० च्या आत रुग्ण होते. परंतु मे महिन्याला सुरुवात होताच झपाट्याने रुग्ण वाढायला लागले. ८ मे रोजी जिल्ह्यात रुग्णांची संखा १३७ होती. १० मे रोजी १५४ वर रुग्णसंख्या गेली. चार दिवसांत ५० रुग्णांची भर पडून १४ मे रोजी २०७ वर पोहचली. १७ मे रोजी २५७ तर २० मे रोजी रुग्णांची संख्या ३०८ झाली. रुग्णांचा हा टप्पा गाठायला ४३ दिवस लागले.नागपुरात सात तर अकोल्यात २१ मृत्यूनागपूरच्या तुलनेत अकोल्यात तीन पटीने मृत्यू झाले आहेत. नागपुरात पहिला मृत्यू ४ एप्रिल, दुसरा २१ एप्रिल, तिसरा २८ एप्रिल, चौथा ६ मे, पाचवा १६ मे, सहावा १७ मे तर सातवा १८ मे रोजी मृत्यूची नोंद झाली तर अकोल्यात पहिला मृत्यू १ मे रोजी होता. नंतर २ मे एक, ३ मे दोन, ६ मे चार, ८ मे एक, १० मे एक, ११ मे एक, १३ मे एक, १५ मे दोन, १७ मे एक, १९ मे दोन तर आज २० मे रोजी पुन्हा एक असे एकूण २० मृत्यू व एका रुग्णाची आत्महत्या अशी २१ मृतांची नोंद आहे. विशेष म्हणजे, नागपुरात गंभीर स्वरूपात रुग्णालयात येऊन मृत्यू झालेल्यांची संख्या पाच आहे. एका रुग्णाचा मृत्यू उपचाराच्या सात दिवसानंतर झाला. तर एका रुग्णाचा घरीच मृत्यू झाल्यानंतर त्याचे नमुने पॉझिटिव्ह आले. तर अकोल्यात ९ रुग्णांचे मृत्यू आयसोलेशन वॉर्डात उपचार घेताना झाले आहेत.नागपुरात ७८ टक्के तर अकोल्यात ५८ टक्के कोरोनामुक्तनागपुरात गुरुवार दुपारपर्यंत ३९५ रुग्ण व ३१० कोरोनामुक्त तर अकोल्यात ३२४ रुग्ण व १९१ कोरोनामुक्तांची नोंद होती. टक्केवारीनुसार नागपुरात ७८.४८ टक्के तर अकोल्यात ५८.९५ टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस