शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

रुग्णांच्या जीवावर उठले नागपूरचे विमा रुग्णालय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 23:10 IST

कोरोना विषाणूची लागण वाढत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच वातावरणात बदल झाल्याने व्हायरलचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येत आहे. असे असताना कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा रुग्णालयात औषधांचा तुटवडा पडला आहे.

ठळक मुद्दे३० टक्केच औषधींचा साठा : सोनोग्राफीसह इतर यंत्रसामग्रीचाही अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूची लागण वाढत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच वातावरणात बदल झाल्याने व्हायरलचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येत आहे. असे असताना कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा रुग्णालयात औषधांचा तुटवडा पडला आहे. केवळ ३० टक्केच औषधांचा साठा असल्याने बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्यांना बाहेरून औषधी विकत घेण्याची वेळ आली आहे. साध्या तापाचेही औषधे मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. सध्याच्या स्थितीत दहा दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा असल्याने रुग्णांच्या जीवावर हे रुग्णालय उठल्याचे बोलले जात आहे.देशात दोन कोटी कामगार विमा योजनेचे सदस्य आहेत. महाराष्ट्रात ४१ लाख कामगार योजनेचे सदस्य आहेत, तर विदर्भात तीन लाख ३० हजार सदस्य आहेत. राज्याचा विचार केल्यास या कामगार रुग्णालयावर आश्रित एक कोटी ४२ लाख त्यांचे कुटुंब आहे. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कामगार रुग्णालयाची आहे. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज ६००वर रुग्ण येतात. परंतु यातील बहुसंख्य रुग्णांना औषधे नसल्याचे लिहून देऊन बाहेरुन औषधे खरेदी करण्यास सांगितले जात आहे. यावरून औषध वितरक आणि रुग्णांमध्ये भांडणे होत आहेत, तर अनेक कामगारांकडे औषध विकत घेण्याइतपत पैसे राहत नसल्याने ते उपचारापासून वंचित राहत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यातच रुग्णालयात सोनोग्राफीपासून ते आवश्यक यंत्रसामग्रीचा अभाव आहे. मात्र शासन याकडे लक्ष देत नसल्याने न्याय कुठे मागावा, असा प्रश्न कामगारांना पडला आहे.हाफकिन कंपनीकडून अपुरा पुरवठाराष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे (इंटक) राष्ट्रीय सचिव मुकुंद मुळे यांनी सांगितले, राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांपासून हाफकिन कंपनीकडे औषध पुरवठ्याची जबाबदार दिली आहे. परंतु अद्यापही या कंपनीकडून औषधी पुरवठा सुरळीत झालेला नाही. कामगार रुग्णालयाला विविध ४०० प्रकारांची औषधी लागतात. परंतु आतापर्यंत कधीच त्याचा पूर्णपणे पुरवठा झाला नाही. सध्यातर रुग्णालयात सुमारे ३० टक्केच औषधांचा साठा असल्याने याचा फटका रुग्णांवरील उपचारांना बसत आहे.उपचारासाठी कामगारांच्या वेतनातून कापले जातात २१०० रुपयेकामगारांच्या वेतनातून कपात होणाऱ्या निधीतून विमा योजना चालते. केंद्र सरकारचे कर्मचारी विमा महामंडळाला एकदम सहा महिन्यांची रक्कम कामगार राज्य विमा सोसायटीला देते. प्रत्येक कामगारामागे २१०० सोसायटीला दिली जाते. यातूनच रुग्णालयाशी संबंधित अधिकारी, डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे वेतन होते. परंतु ज्यांच्याकडून पैसा मिळतो त्यांच्याच जीवावर ही सोसायटी उठली आहे, असेही मुळे यांचे म्हणणे आहे.कामगारांना औषधांचा खर्च परडवणारा नाहीकामगारांना आधीच वेतन फार कमी असते. अनेकांना नियमानुसार वेतनही मिळत नाही. तुटपुंज्या वेतनावर कसातरी आपला संसाराचा गाडा चालवितात. त्याच अपुऱ्या वेतनातून उपचारासाठी पैसे कापले जात असल्याने कामगार रुग्णालयातून दर्जेदार उपचार मिळेल, ही अपेक्षा असते. परंतु गेल्या काही वर्षात कामगार रुग्णालयालाच उपचाराची गरज असल्याचे चित्र आहे. सध्या औषधांचा तुटवडा पडल्याने कामगारांना औषधी घेऊन येण्यास सांगितले जात आहे. यामुळे अनेक रुग्ण औषधांविना राहण्याची शक्यता आहे.मुकुंद मुळेराष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे (इंटक).

टॅग्स :hospitalहॉस्पिटलEmployeeकर्मचारी