शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

एनआयटीने १२०० घरांना बजावली नोटीस, कारण काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2022 14:51 IST

एनआयटीने भाडे तत्तावर दिलेल्या जागेवर संबंधित व्यक्तीने लेआऊट टाकून लोकांना जमिनी विकल्या. लोकांनी येथे पक्की घरेही बांधली. हे लेआऊट वाठोडा परिसरात येत असून, २० वर्षानंतर एनआयटीने कारवाईचा बडगा उगारल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप आहे.

ठळक मुद्देलीजवर बनली पक्के घरे, २० वर्षानंतर आली प्रशासनाला जाग; बजावली नोटीसवाठोड्यातील लेआऊटची समस्या

नागपूर : एनआयटीने (Nagpur Improvement Trust) लीजवर दिलेल्या जागेवर संबंधित व्यक्तीने लेआऊट टाकून लोकांना जमिनी विकल्या. त्या जमिनीवर लोकांनी पक्के घरेही बांधली. आता एनआयटीला जाग आली. लोकांनी एनआयटीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचे नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला. हे लेआऊट वाठोडा परिसरात येत असून, २० वर्षानंतर एनआयटीने कारवाईचा बडगा उगारल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप आहे.

मौजा वाठोडा परिसरातील खसरा क्रमांक १५७ येथे धरती माँ लोककल्याण सोसायटी व मानव शक्ती गृहनिर्माण सहकारी संस्थेने २००० साली १२०० प्लॉट लोकांना विकले. लोकांनी येथे पक्की घरेही बांधली. एनआयटी, महापालिका, महावितरणने येथील लोकांना रस्ते, पाणी, वीज, टॅक्सची सुविधा उपलब्ध करून दिली. लोकांनी लेआऊट धारकांकडे वारंवार रजिस्ट्री करण्याची मागणी केली. परंतु लेआऊट मालक शेख मेहमूद व रमेश कांबळी हे सातत्याने लोकांना टाळत आले. लोकांनी स्थानिक नगरसेवक व आमदारांकडेही वारंवार निवेदन दिले. परंतु लोकांना न्याय मिळाला नाही.

त्यानंतर अचानक १३ जानेवारी २०२२ रोजी एनआयटीचे अधिकारी व पोलीस जेसीबी घेऊन आले. त्यांनी खसरा क्रमांक १५७ मधील काही घरांचे कम्पाऊंड व घरेही तोडली. कुणालाही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आल्याने लोकांनी त्यांचा विरोध केला. त्यामुळे अधिकारी परत निघून गेले. पण दुसऱ्याच दिवशी अधिकारी नोटीस घेऊन आले. लोकांची नावे विचारून नोटीस देण्याचा प्रयत्न करू लागले. लोकांनी त्यालाही विरोध केल्याने ते निघून गेले. परंतु ज्यांना नोटीस मिळाली, ते लोक घर तोडण्याच्या भीतीने धास्तीत आले आहे. कामावर न जाता वस्तीमध्ये ते ठिय्या देऊन आहे. यासंदर्भात वस्तीतील नागरिकांनी या अवैध कारवाईच्या विरोधात वाठोडा पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

- वीस वर्षांपासून रेकॉर्डच नाही

तहसील कार्यालयाने तलाठ्यामार्फत जागेची नोंद ठेवणे गरजेचे आहे. लोकांनी तहसील कार्यालयातून माहिती घेतली असता, तलाठ्याने २० वर्षांपासून येथे घर असल्याचा रेकॉर्डच नोंदविले नाही. या प्रकरणात सोसायटी मालक व जे अधिकारी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लोकांनी केली आहे.

- ही जमीन अजूनही एनआयटीने लीजवर दिली आहे. लीजचा कालावधी २०२९ पर्यंत आहे. लोकांनी येथे पक्के घरे बांधली आहे. अशात अचानक घर तोडण्याची नोटीस आल्याने लोकांमध्ये संताप आहे. त्यामुळे एनआयटीने प्रशासकीय प्रक्रिया करून लोकांना त्यांच्या मालकीचे पट्टे द्यावे.

प्रा. सचिन काळबांडे, आंदोलक

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यासHomeसुंदर गृहनियोजनNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका