शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

एनआयटीने १२०० घरांना बजावली नोटीस, कारण काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2022 14:51 IST

एनआयटीने भाडे तत्तावर दिलेल्या जागेवर संबंधित व्यक्तीने लेआऊट टाकून लोकांना जमिनी विकल्या. लोकांनी येथे पक्की घरेही बांधली. हे लेआऊट वाठोडा परिसरात येत असून, २० वर्षानंतर एनआयटीने कारवाईचा बडगा उगारल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप आहे.

ठळक मुद्देलीजवर बनली पक्के घरे, २० वर्षानंतर आली प्रशासनाला जाग; बजावली नोटीसवाठोड्यातील लेआऊटची समस्या

नागपूर : एनआयटीने (Nagpur Improvement Trust) लीजवर दिलेल्या जागेवर संबंधित व्यक्तीने लेआऊट टाकून लोकांना जमिनी विकल्या. त्या जमिनीवर लोकांनी पक्के घरेही बांधली. आता एनआयटीला जाग आली. लोकांनी एनआयटीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचे नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला. हे लेआऊट वाठोडा परिसरात येत असून, २० वर्षानंतर एनआयटीने कारवाईचा बडगा उगारल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप आहे.

मौजा वाठोडा परिसरातील खसरा क्रमांक १५७ येथे धरती माँ लोककल्याण सोसायटी व मानव शक्ती गृहनिर्माण सहकारी संस्थेने २००० साली १२०० प्लॉट लोकांना विकले. लोकांनी येथे पक्की घरेही बांधली. एनआयटी, महापालिका, महावितरणने येथील लोकांना रस्ते, पाणी, वीज, टॅक्सची सुविधा उपलब्ध करून दिली. लोकांनी लेआऊट धारकांकडे वारंवार रजिस्ट्री करण्याची मागणी केली. परंतु लेआऊट मालक शेख मेहमूद व रमेश कांबळी हे सातत्याने लोकांना टाळत आले. लोकांनी स्थानिक नगरसेवक व आमदारांकडेही वारंवार निवेदन दिले. परंतु लोकांना न्याय मिळाला नाही.

त्यानंतर अचानक १३ जानेवारी २०२२ रोजी एनआयटीचे अधिकारी व पोलीस जेसीबी घेऊन आले. त्यांनी खसरा क्रमांक १५७ मधील काही घरांचे कम्पाऊंड व घरेही तोडली. कुणालाही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आल्याने लोकांनी त्यांचा विरोध केला. त्यामुळे अधिकारी परत निघून गेले. पण दुसऱ्याच दिवशी अधिकारी नोटीस घेऊन आले. लोकांची नावे विचारून नोटीस देण्याचा प्रयत्न करू लागले. लोकांनी त्यालाही विरोध केल्याने ते निघून गेले. परंतु ज्यांना नोटीस मिळाली, ते लोक घर तोडण्याच्या भीतीने धास्तीत आले आहे. कामावर न जाता वस्तीमध्ये ते ठिय्या देऊन आहे. यासंदर्भात वस्तीतील नागरिकांनी या अवैध कारवाईच्या विरोधात वाठोडा पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

- वीस वर्षांपासून रेकॉर्डच नाही

तहसील कार्यालयाने तलाठ्यामार्फत जागेची नोंद ठेवणे गरजेचे आहे. लोकांनी तहसील कार्यालयातून माहिती घेतली असता, तलाठ्याने २० वर्षांपासून येथे घर असल्याचा रेकॉर्डच नोंदविले नाही. या प्रकरणात सोसायटी मालक व जे अधिकारी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लोकांनी केली आहे.

- ही जमीन अजूनही एनआयटीने लीजवर दिली आहे. लीजचा कालावधी २०२९ पर्यंत आहे. लोकांनी येथे पक्के घरे बांधली आहे. अशात अचानक घर तोडण्याची नोटीस आल्याने लोकांमध्ये संताप आहे. त्यामुळे एनआयटीने प्रशासकीय प्रक्रिया करून लोकांना त्यांच्या मालकीचे पट्टे द्यावे.

प्रा. सचिन काळबांडे, आंदोलक

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यासHomeसुंदर गृहनियोजनNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका