शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपुरात दिवसा कडक ऊन, रात्री गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 01:14 IST

Temprature उन्हाचा तडाखा हळूहळू वाढायला लागला आहे. नेहमीप्रमाणे विदर्भाला याची अधिकच झळ बसत असल्याचे दिसते. सर्व जिल्ह्यात तापमानात काहीअंशी चढ-उतार हाेत असले तरी पारा सामान्यापेक्षा ३ ते ५ अंशाने अधिकच आहे.

ठळक मुद्देचंद्रपूरचा ताप वाढला, पारा ३९.६ वर : नागपूर ३७.८ वर

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : उन्हाचा तडाखा हळूहळू वाढायला लागला आहे. नेहमीप्रमाणे विदर्भाला याची अधिकच झळ बसत असल्याचे दिसते. सर्व जिल्ह्यात तापमानात काहीअंशी चढ-उतार हाेत असले तरी पारा सामान्यापेक्षा ३ ते ५ अंशाने अधिकच आहे. घराबाहेर पडणाऱ्यांना दिवसा कडक उन्हाचे चटके बसत आहेत, पण रात्री मात्र हलक्या थंडीची जाणीव हाेत आहे.

दरम्यान, विदर्भातील काही जिल्ह्यात गुरुवारपेक्षा शुक्रवारी तापमानात वाढ तर, काहीमध्ये घट नाेंदविण्यात आली. चंद्रपूरमध्ये ०.४ अंशाची वाढ हाेत पारा ३९.६ अंशाच्या उच्चांकावर पाेहचला आहे. येथील तापमान पाच दिवसात ४० अंशापर्यंत पाेहचण्याची शक्यता हवामान विभागाने नाेंदविली आहे. जिल्ह्यातील ब्रह्मपुरीमध्ये मात्र आज एका अंशाची घट झाली व तापमान ३८.८ वर खाली आले. नागपूरमध्ये ०.१ अंशाची वाढ हाेऊन पारा ३७.८ वर पाेहचला. अकाेल्याचे तापमान ३९.१ अंशावर कायम आहे. यवतमाळमध्ये कमाल तापमानात कालपेक्षा ३.७ अंशाची सर्वाधिक वाढ नाेंदविण्यात आली व तापमान ३८.७ अंशावर पाेहचले. वाशिममध्ये १.४ अंशाची घट हाेत पारा ३६ अंशावर खाली आला. वर्धा ०.७ अंशाने वाढत ३८.२ अंशाची नाेंद करण्यात आली. इतर जिल्ह्यामध्ये अमरावती ३७.८, बुलडाणा ३७.२, गडचिराेली ३६.४, गाेंदिया ३५.२ अंशाची नाेंद करण्यात आली.

नागपूरमध्ये दिवसा उन्हाने चिडचिड हाेत असली तरी रात्री मात्र गारव्याची जाणीव हाेते. शहरात १७.४ किमान तापमान नाेंदविण्यात आले, जे मार्चच्या पहिल्या आठवड्यात सारखे आहे. त्यापेक्षा गाेंदिया व गडचिराेलीमध्ये कमी म्हणजे १५.६ व १६.४ अंश किमान तापमान नाेंदविण्यात आले. हिवाळ्यात गाेंदियामध्येच सर्वात कमी तापमानाची नाेंद करण्यात आली हाेती. दरम्यान, वाढते तापमान लक्षात घेता शेतातील पिकांची मळणी करून धान्य सुरक्षित ठिकाणी साठविण्याचे आवाहन हवामान विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.

टॅग्स :weatherहवामानnagpurनागपूर