शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

‘व्हायरल’ने उपराजधानी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 11:24 IST

उपराजधानी व्हायरल तापाने फणफणली आहे. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागासह खासगी इस्पितळांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढली आहे.

ठळक मुद्देमेयो, मेडिकलसह खासगीमध्ये वाढले रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वातावरणातील बदलांचा प्रभाव शरीरावर पडू लागला आहे. विशेषत: लहान मुले व वृद्ध व्हायरलचा म्हणजे विषाणूजन्य तापाच्या विळख्यात सापडत आहे. उपराजधानी व्हायरल तापाने फणफणली आहे. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागासह खासगी इस्पितळांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढली आहे.पावसाची उघडझाप, सततचे ढगाळ वातावरणामुळे व्हायरलचा प्रकोप वाढला आहे. तापासोबतच सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी अशा विविध कारणांनी लोक आजारी पडत आहेत. औषधोपचारासाठी दवाखान्यात रुग्णांच्या रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे. यातच डेंग्यूसदृश आजाराच्या संख्येतही वाढ झाल्याने लोकांत भीतीचे वातावरण आहे. मेडिकल आणि मेयो या शासकीय रुग्णालयात या आजाराचे दिवसाकाठी १५-२० रुग्ण येत आहेत. पाऊस लांबल्यास यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. व्हायरलसोबतच डेंग्यू, मलेरिया, कावीळ, अतिसार व विषमज्वराचे रुग्णही दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

श्वासांद्वारे एकाकडून दुसऱ्याकडे जंतू संक्रमिततज्ज्ञाच्या मते, ‘व्हायरल फिव्हर’ म्हणजे संक्रमित ताप. या तापाचे विषाणू घशात सुप्तावस्थेत निष्क्रिय राहतात. थंड वातावरणाशी संपर्क आल्यास किंवा थंड पाणी, आईसक्रिम, कोल्डड्रिंक प्यायल्यास विषाणू सक्रिय होतात आणि रोगप्रतिकारक शक्तीवरच हल्ला चढवितात. हा ताप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे फैलावतो. श्वासांद्वारे एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाकडे जंतू संक्रमित होत असल्याने एकाच घरात ‘व्हायरल फिव्हर’चे एकपेक्षा जास्त रुग्ण दिसून येतात.स्वत:हून औषधे घेणे टाळा‘व्हायरल’ असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. परंतु या सोबतच डेंग्यूसदृश लक्षणे असलेले रुग्णही दिसून येत आहे. यामुळे कुठल्याही तापावर स्वत:हून औषधे घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करा. आराम करा. ‘व्हायरल’ रुग्णांच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्या. स्वच्छता पाळा. ताजे व घरचे अन्नच घ्या.-डॉ. अविनाश गावंडे, बालरोग तज्ज्ञ 

टॅग्स :Healthआरोग्य