शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
2
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
3
India ODI Squad vs South Africa : केएल राहुल कॅप्टन; BCCI नं ऋतुराजसाठीही उघडला टीम इंडियाचा दरवाजा
4
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
5
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
6
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
7
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
8
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
9
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
10
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
11
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
12
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
13
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
14
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
15
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
16
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
17
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
18
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
19
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
20
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लाडू-चिवडा, पणत्या घेऊन शेतकरी उतरले आंदोलनात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 20:05 IST

Agitation Nagpur News संविधान चौकात सकाळी ८ वाजताच्या सुमारास पणत्या पेटवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांनी आंदोलनात्मक दिवाळीचा आरंभ केला.

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांना अटक नुकसान भरपाई, मदतीचे पॅकेज, सोयाबीनच्या स्थिर दरासाठी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना किमान हेक्टरी २५ हजार रुपये भरपाई, यासाठी केंद्राने पॅकेज घोषित करावे, सोयाबीनचा भाव किमान प्रति क्विंटल ६ हजार रुपये स्थिर राहण्यासाठी केंद्राने धोरण आखावे, सीसीआयची तालुकानिहाय कापूस खरेदी केंद्रे दिवाळीपूर्वी चालू करावीत, यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चेकरी कूच करीत असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली.

संविधान चौकात सकाळी ८ वाजताच्या सुमारास पणत्या पेटवून आंदोलनकर्त्यांनी आंदोलनात्मक दिवाळीचा आरंभ केला. चिवडा, लाडू, ठेचा-भाकरी व आकाशदिवे घेऊन आंदोलनकर्ते सहभागी झाले होते. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात विदर्भ अध्यक्ष दामोदर इंगोले यांच्यासह विदर्भातील विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. मागण्या आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत रॅली गडकरी यांच्या निवासस्थानाकडे कूच करीत असताना पोलिसांनी अडविले. कार्यकर्ते आग्रही होते. पोलिसांच्या विरोधामुळे वातावरण काही काळ तापले. आंदोलनात राणा चंदन, अमित अढाऊ, ज्ञानेश्वर टाले, श्याम अवथळे, दयाल राऊत, रवी पडोळे, प्रवीण मोहोळ, अंकुश कडू, बालाजी मोरे, अमोल राऊत, पवन देशमुख, शे. रफीक शे. करीम, नितीन राजपूत, प्रदीप शेळके, सय्यद वसीम, राजेश गवई, दत्ता पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अटकेची कारवाई अन्‌ कार्यकर्त्यांचे राष्ट्रगीत

आंदोलकांनी गनिमीकावा वापरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अटकेची सुरुवात करताच ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी अचानक राष्ट्रगीत चालू केले. यामुळे पोलिसांनाही सावधानच्या स्थितीत उभे राहून काही काळ अटकेसाठी थांबावे लागले. मात्र राष्ट्रगीत संपताच आंदोलकांना कसलीही संधी न देता पोलीस व्हॅनमध्ये जबरदस्तीने डांबून ताब्यात घेतले.

ना. नितीन गडकरी यांच्या शब्दाला केंद्रात वजन असल्याने उपराजधानीत हे आंदोलन केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोदी सरकारलाही मते दिली आहेत. त्यामुळे या सरकारने महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करावी. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा केलेला प्रयत्न निंदनीय आहे.

- रविकांत तुपकर, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :agitationआंदोलन