शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नागपुरात लाडू-चिवडा, पणत्या घेऊन शेतकरी उतरले आंदोलनात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 20:05 IST

Agitation Nagpur News संविधान चौकात सकाळी ८ वाजताच्या सुमारास पणत्या पेटवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांनी आंदोलनात्मक दिवाळीचा आरंभ केला.

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांना अटक नुकसान भरपाई, मदतीचे पॅकेज, सोयाबीनच्या स्थिर दरासाठी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना किमान हेक्टरी २५ हजार रुपये भरपाई, यासाठी केंद्राने पॅकेज घोषित करावे, सोयाबीनचा भाव किमान प्रति क्विंटल ६ हजार रुपये स्थिर राहण्यासाठी केंद्राने धोरण आखावे, सीसीआयची तालुकानिहाय कापूस खरेदी केंद्रे दिवाळीपूर्वी चालू करावीत, यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चेकरी कूच करीत असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली.

संविधान चौकात सकाळी ८ वाजताच्या सुमारास पणत्या पेटवून आंदोलनकर्त्यांनी आंदोलनात्मक दिवाळीचा आरंभ केला. चिवडा, लाडू, ठेचा-भाकरी व आकाशदिवे घेऊन आंदोलनकर्ते सहभागी झाले होते. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात विदर्भ अध्यक्ष दामोदर इंगोले यांच्यासह विदर्भातील विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. मागण्या आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत रॅली गडकरी यांच्या निवासस्थानाकडे कूच करीत असताना पोलिसांनी अडविले. कार्यकर्ते आग्रही होते. पोलिसांच्या विरोधामुळे वातावरण काही काळ तापले. आंदोलनात राणा चंदन, अमित अढाऊ, ज्ञानेश्वर टाले, श्याम अवथळे, दयाल राऊत, रवी पडोळे, प्रवीण मोहोळ, अंकुश कडू, बालाजी मोरे, अमोल राऊत, पवन देशमुख, शे. रफीक शे. करीम, नितीन राजपूत, प्रदीप शेळके, सय्यद वसीम, राजेश गवई, दत्ता पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अटकेची कारवाई अन्‌ कार्यकर्त्यांचे राष्ट्रगीत

आंदोलकांनी गनिमीकावा वापरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अटकेची सुरुवात करताच ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी अचानक राष्ट्रगीत चालू केले. यामुळे पोलिसांनाही सावधानच्या स्थितीत उभे राहून काही काळ अटकेसाठी थांबावे लागले. मात्र राष्ट्रगीत संपताच आंदोलकांना कसलीही संधी न देता पोलीस व्हॅनमध्ये जबरदस्तीने डांबून ताब्यात घेतले.

ना. नितीन गडकरी यांच्या शब्दाला केंद्रात वजन असल्याने उपराजधानीत हे आंदोलन केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोदी सरकारलाही मते दिली आहेत. त्यामुळे या सरकारने महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करावी. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा केलेला प्रयत्न निंदनीय आहे.

- रविकांत तुपकर, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :agitationआंदोलन