शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Nagpur: महागड्या कार पूर्णत: ‘डॅमेज’, बहुतांश कारची इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खराब

By मोरेश्वर मानापुरे | Updated: October 22, 2023 21:39 IST

Nagpur: नागपुरात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आणि कार व घरातील महागड्या इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब झाल्या.

- मोरेश्वर मानापुरेनागपूर  - नागपुरात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आणि कार व घरातील महागड्या इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब झाल्या. घटनेला रविवार, २२ ऑक्टोबरला एक महिना झाला असून पुराचा फटका बसलेल्या लोकांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खराब झाल्यामुळे काही महागड्या इर्म्पोरटेड कार पूर्णपणे डॅमेज झाल्या आहेत. सर्वाधिक फटका ईव्ही आणि पेट्रोल कारला बसला.

अंबाझरी परिसर, वर्मा ले-आऊट, कॉर्पोरेशन कॉलनी, समता कॉलनी, रामदासपेठ, धंतोली, गणेशपेठ परिसर आणि अन्य वस्त्यांमध्ये फ्लॅटच्या बेसमेंटमधील पार्किंगमध्ये ठेवलेल्या कार पुराच्या पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या. पुराचे पाणी वाहून जाण्याचा रस्ता प्रशासनाची चुकी आणि अतिक्रमणामुळे अरूंद असल्याने लोकांच्या घरात पहिल्या माळ्यापर्यंत पाणी शिरले होते. मोटर्स लावून पुराचे पाणी बाहेर काढल्यानंतर कार त्या त्या कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्या. त्यादिवशी पुरात बुडालेल्या कारचा आकडा आसपास १ हजार होता.

इंजिनमधील पाणी बाहेर निघाल्यानंतर काही कार सुरू झाल्या, तर जवळपास ६०० कार कंपन्याच्या सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी आल्या. इन्शुरन्स कंपन्यांचे क्लेम सेंटलमेंटचे काम १५ दिवस सुरू होते. कारची स्थिती पाहून क्लेम मिळालेल्या कारची दुरुस्ती सर्व्हिस सेंटरमध्ये झाली आहे. तर काही कारच्या दुरुस्तीचे काम अजूनही सुरू आहे.

नांगिया कार्सचे (एमजी) संचालक अक्षित नांगिया म्हणाले, आमच्याकडे पुरात बुडालेल्या ३२ कार सर्व्हिसिंगसाठी आल्या. त्यापैकी २ कार पूर्णपणे खराब झाल्या असून दुरुस्ती शक्य नाही. बहुतांश पेट्रोल आणि ईव्ही कारमधील इर्म्पोरटेड इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खराब झाली आहेत. नियमित काम सांभाळून इन्शुरन्स क्लेमच्या आधारे दुरुस्ती करण्यात येत आहे.

आदित्य कार्सचे संचालक डॉ. पी.के. जैन म्हणाले, पुरात बुडालेल्या काही महागड्या कारचे इंजिन पूर्णपणे खराब झाले आहेत. अशा कारच्या दुरुस्तीसाठी जास्त खर्च येतो. इन्शुरन्स कंपन्यांनी अशा कार ‘टोटल लॉस’ म्हणून निकाली काढल्या आहेत. इंजिनमध्ये पाणी शिरलेल्या कारची दुरुस्ती जास्त असते. शिवाय खर्चही जास्त येतो. जैन म्हणाले, पुरामुळे अंबाझरी परिसरातील काही लोकांच्या घरातील कार, दुचाकी, टीव्ही, फ्रिज, कपडे आणि अनेक महत्त्वाच्या वस्तू पूर्णपणे खराब झाल्या आहेत. प्रशासनाने पुरापासून धडा घेऊन सक्षम उपाययोजन कराव्यात.

टॅग्स :nagpurनागपूरfloodपूर