शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Nagpur: महागड्या कार पूर्णत: ‘डॅमेज’, बहुतांश कारची इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खराब

By मोरेश्वर मानापुरे | Updated: October 22, 2023 21:39 IST

Nagpur: नागपुरात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आणि कार व घरातील महागड्या इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब झाल्या.

- मोरेश्वर मानापुरेनागपूर  - नागपुरात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आणि कार व घरातील महागड्या इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब झाल्या. घटनेला रविवार, २२ ऑक्टोबरला एक महिना झाला असून पुराचा फटका बसलेल्या लोकांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खराब झाल्यामुळे काही महागड्या इर्म्पोरटेड कार पूर्णपणे डॅमेज झाल्या आहेत. सर्वाधिक फटका ईव्ही आणि पेट्रोल कारला बसला.

अंबाझरी परिसर, वर्मा ले-आऊट, कॉर्पोरेशन कॉलनी, समता कॉलनी, रामदासपेठ, धंतोली, गणेशपेठ परिसर आणि अन्य वस्त्यांमध्ये फ्लॅटच्या बेसमेंटमधील पार्किंगमध्ये ठेवलेल्या कार पुराच्या पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या. पुराचे पाणी वाहून जाण्याचा रस्ता प्रशासनाची चुकी आणि अतिक्रमणामुळे अरूंद असल्याने लोकांच्या घरात पहिल्या माळ्यापर्यंत पाणी शिरले होते. मोटर्स लावून पुराचे पाणी बाहेर काढल्यानंतर कार त्या त्या कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्या. त्यादिवशी पुरात बुडालेल्या कारचा आकडा आसपास १ हजार होता.

इंजिनमधील पाणी बाहेर निघाल्यानंतर काही कार सुरू झाल्या, तर जवळपास ६०० कार कंपन्याच्या सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी आल्या. इन्शुरन्स कंपन्यांचे क्लेम सेंटलमेंटचे काम १५ दिवस सुरू होते. कारची स्थिती पाहून क्लेम मिळालेल्या कारची दुरुस्ती सर्व्हिस सेंटरमध्ये झाली आहे. तर काही कारच्या दुरुस्तीचे काम अजूनही सुरू आहे.

नांगिया कार्सचे (एमजी) संचालक अक्षित नांगिया म्हणाले, आमच्याकडे पुरात बुडालेल्या ३२ कार सर्व्हिसिंगसाठी आल्या. त्यापैकी २ कार पूर्णपणे खराब झाल्या असून दुरुस्ती शक्य नाही. बहुतांश पेट्रोल आणि ईव्ही कारमधील इर्म्पोरटेड इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खराब झाली आहेत. नियमित काम सांभाळून इन्शुरन्स क्लेमच्या आधारे दुरुस्ती करण्यात येत आहे.

आदित्य कार्सचे संचालक डॉ. पी.के. जैन म्हणाले, पुरात बुडालेल्या काही महागड्या कारचे इंजिन पूर्णपणे खराब झाले आहेत. अशा कारच्या दुरुस्तीसाठी जास्त खर्च येतो. इन्शुरन्स कंपन्यांनी अशा कार ‘टोटल लॉस’ म्हणून निकाली काढल्या आहेत. इंजिनमध्ये पाणी शिरलेल्या कारची दुरुस्ती जास्त असते. शिवाय खर्चही जास्त येतो. जैन म्हणाले, पुरामुळे अंबाझरी परिसरातील काही लोकांच्या घरातील कार, दुचाकी, टीव्ही, फ्रिज, कपडे आणि अनेक महत्त्वाच्या वस्तू पूर्णपणे खराब झाल्या आहेत. प्रशासनाने पुरापासून धडा घेऊन सक्षम उपाययोजन कराव्यात.

टॅग्स :nagpurनागपूरfloodपूर