शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Nagpur: उद्योजकांना वीज सबसिडीची प्रतीक्षा, मार्चनंतर योजना बंद होणार

By मोरेश्वर मानापुरे | Updated: January 24, 2024 20:25 IST

Nagpur: विदर्भ आणि मराठवाडा येथील उद्योगांचा विकास आणि प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगांना वार्षिक १,२०० कोटी रुपयांची वीज सबसिडी दिली होती. परंतु, काही मोठ्या उद्योगांच्या गैरवापरामुळे ही सबसिडी ६०० कोटींपर्यंत कमी केली.

- मोरेश्वर मानापुरे नागपूर - विदर्भ आणि मराठवाडा येथील उद्योगांचा विकास आणि प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगांना वार्षिक १,२०० कोटी रुपयांची वीज सबसिडी दिली होती. परंतु, काही मोठ्या उद्योगांच्या गैरवापरामुळे ही सबसिडी ६०० कोटींपर्यंत कमी केली. आता ही योजना यावर्षी मार्चला संपणार आहे. मागणीनंतरही सरकारने योजनेकडे कानाडोळा केल्याचे चित्र असून उद्योजकांना वीज सबसिडीची प्रतीक्षा आहे.

आधी मिळायची प्रति युनिट १ ते १.२५ रुपया सबसिडी!योजना सुरू झाली तेव्हा विदर्भ आणि मराठवाडा भागातील उद्योगांना प्रति युनिट १ ते १.२५ रुपयांचा लाभ मिळायचा. त्याचा उद्योगांना फायदा झाला होता. शिवाय या भागात नवीन उद्योग सुरू झाले होते. परंतु २०२२ नंतर सबसिडी ५० ते ६० पैशांपर्यंत कमी झाली आणि योजनेत काही नियम व अटी टाकण्यात आल्या. त्या उद्योजकांसाठी समस्या ठरल्या. वीज महाग मिळू लागली. त्यामुळे या भागात गुंतवणूक कमी झाली. कमी वीजदरामुळे काही उद्योजकांनी उद्योग लगतच्या राज्यात स्थलांतरित केले.

सबसिडी निधी वाढविण्याची मागणीसबसिडी निधी वाढविण्याची मागणी उद्योजकांनी सरकारकडे वारंवार केली. पण त्याकडे सपशेल कानाडोळा केल्याचे चित्र आहे. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्यावतीने (व्हीआयए) हा प्रश्न वारंवार सरकार दरबारी मांडण्यात आला. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात चारदा निवेदने देण्यात आली. सबसिडी कमी करण्यात आल्याने उद्योजकांचा उत्पादन खर्च वाढला. उद्योग अजूनही ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या स्थितीत आहे. विशेषत: स्टील आणि सिमेंट उद्योगांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि तेलंगाना या राज्यात कमी गुंतवणुकीत उत्पादन होत आहे. त्यामुळे या उत्पादनांना जास्त मागणी आहे.

मार्चअखेर योजना संपणारदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना अभ्यासानंतर ही योजना सुरू करण्यात आली होती. ८ ते १० मोठ्या उद्योजकांनी गैरफायदा घेतल्यानंतर सरकारने निधी कमी केला. काही उद्योजकांमुळे संपूर्ण उद्योग क्षेत्राला योजनेचा फटका बसला. विशेषत: लहान आणि जास्त विजेची खपत असलेल्या कंपन्या संकटात आल्या. ही योजना यावर्षी मार्चला संपत आहे. या तारखेनंतर काय होणार, हे स्पष्ट नाही. सरकारने आतापासून यावर चर्चा करावी आणि पुढील पाच वर्षे ही योजना वाढवावी. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा भागातील उद्योगांना संजीवनी मिळेल आणि उद्योजकांमधील संभ्रम दूर होईल.

योजना पुढेही सुरू ठेवावी, सबसिडी निधी वाढवावावीज सबसिडी योजना मार्चअखेर संपणार आहे. ही योजना पुढेही सुरू ठेवून सबसिडी वाढविण्यासाठी असोसिएशनने दोनदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदने दिली आहेत. त्यांनी या योजनेबाबत बजेटमध्ये तरतूद करण्याचे आश्वासन दिले आहे. पुढील आठवड्यात पुन्हा उपमुख्यमंत्र्याची भेट घेणार आहोत. योजनेमुळे विदर्भातील उद्योगांचा नक्कीच विकास होईल.- नितीन लोणकर ( अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन)

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर