शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

नागपूर कामगार विमा रुग्णालय : बंद पॅथालॉजी तंत्रज्ञानाच्या वेतनावर खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:41 IST

एकीकडे कामगार विमा रुग्णालयात ५० टक्क्यांपेक्षा जास्त मनुष्यबळ नाही. याचा फटका रुग्णांना बसत आहे, तर दुसरीकडे तंत्रज्ञ असताना आवश्यक यंत्रसामुग्री व त्याला लागणारे रसायन उपलब्ध नाही. परिणामी, पॅथालॉजी विभाग बंद पडला आहे. मात्र येथील पाच तंत्रज्ञांच्या वेतनावर दर महिन्याला लाखो रुपयांचा खर्च होत आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या रुग्णालयाचा कारभाराचा बोजवारा उडाला आहे.

ठळक मुद्देयंत्रसामुग्री व रसायनच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे कामगार विमा रुग्णालयात ५० टक्क्यांपेक्षा जास्त मनुष्यबळ नाही. याचा फटका रुग्णांना बसत आहे, तर दुसरीकडे तंत्रज्ञ असताना आवश्यक यंत्रसामुग्री व त्याला लागणारे रसायन उपलब्ध नाही. परिणामी, पॅथालॉजी विभाग बंद पडला आहे. मात्र येथील पाच तंत्रज्ञांच्या वेतनावर दर महिन्याला लाखो रुपयांचा खर्च होत आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या रुग्णालयाचा कारभाराचा बोजवारा उडाला आहे.कामगार विमा रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून औषधांचा तुटवडा आहे. केवळ आकस्मिक औषधे खरेदी करून कसेतरी रुग्णालय चालविले जात आहे. नवी पद भरती होत नसल्याने कार्यरत डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडला आहे. अद्ययावत यंत्रसामुग्री नसल्याने रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात पाठविले जात आहे. यातही संबंधित रुग्णालयाचे देयके प्रलंबित ठेवली जात असल्याने खासगी रुग्णालये सेवा देणे बंद करीत आहे. उपचारासाठी वेतनामधून पैसा कपात होऊनही उपचार मिळत नसल्याचा रुग्णांचा आरोप आहे.प्राप्त माहितीनुसार, रुग्णालयाच्या पॅथालॉजी विभागात तंत्रज्ञाची पदे शासनाकडून भरण्यात न आल्यामुळे मागील १० वर्षांपासून या विभागाची ‘आऊटसोर्सिंग’ सुरू आहे. ‘रेनबो ब्लड बँक’ या खासगी पॅथालॉजीला रुग्णालयाच्या रुग्णाचे नमुने पाठविले जात आहे. वर्षभरापूर्वी रुग्णालयाच्या पॅथालॉजी विभागात शासनाने दोन तंत्रज्ञ व तीन सहायक तंत्रज्ञ अशी पाच तंत्रज्ञांची भरती केली. परंतु, अत्याधुनिक यंत्रसामुग्री व रक्त तपासणीचे रसायन उपलब्धच करून दिले नाही. यामुळे या तंत्रज्ञांच्या हाताला कामेच नाही. यांच्या वेतनांवर लाखो रुपयांचा खर्च होत आहे. खासगी पॅथालॉजीचा कर्मचारी रुग्णालयात येऊन रुग्णांचे रक्ताचे नमुने घेऊन जातात. मग, तंत्रज्ञाची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पैशाची उधळपट्टी कधी थांबणार?एका तंत्रज्ञाचे साधारण ४० हजार रुपये वेतन, तर सहायक तंत्रज्ञाचे २५ ते ३० हजार वेतन आहे. रुग्णांना कवडीचाही फायदा होत नसताना शासनाकडून दर महिन्याला पाच तंत्रज्ञांच्या वेतनावर मात्र लाखो रुपये खर्च होत आहे. ही कामगारांच्या पैशांची उधळपट्टी असल्याचे रुग्णाचे म्हणणे आहे.काही तपासण्या केल्या जातातसामान्य तपासण्या रुग्णालयाच्या पॅथालॉजी विभागात तंत्रज्ञकडून केल्या जातात. यात ‘रेडी किट’ची मदत घेतली जाते. उर्वरित ‘आऊटसोर्सिंग’द्वारे केल्या जातात. रुग्णालयाकडून लवकरच कंत्राटी पद्धतीवर पॅथालॉजिस्ट घेण्यात येणार आहे.डॉ. मीना देशमुखवैद्यकीय अधीक्षक, कामगार विमा रुग्णालय

टॅग्स :hospitalहॉस्पिटलEmployeeकर्मचारी