शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

नागपूर: पैसे नकोत, भोजन द्या ! आदिवासी विद्यार्थ्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 10:40 IST

आदिवासी विभागाने ५ एप्रिल रोजी काढलेल्या शासन निर्णयात वसतिगृहातील भोजन व्यवस्था बंद करून, त्या बदल्यात भोजनाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी या निर्णयाचा विरोध केला असून भोजन व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देआदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयावर धडकला मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकार आदिवासी विद्यार्थ्यांची जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करीत आदिवासी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून रोष व्यक्त केला. आदिवासी विभागाने ५ एप्रिल रोजी काढलेल्या शासन निर्णयात वसतिगृहातील भोजन व्यवस्था बंद करून, त्या बदल्यात भोजनाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी या निर्णयाचा विरोध केला असून भोजन व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी गुरुवारी आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. कार्यालयासमोर ठिय्या देत जेवणाची थाळी वाजवून आपला आवाज सरकार दरबारी पोहचविला.आदिवासी विद्यार्थी संघ व आॅल इंडिया इंडिनिनस स्टुडंट फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सरकारच्या जीआरच्या विरोधात यशवंत स्टेडियम पासून आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी सहभागी झाले होते. शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डीबीटी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. वसतिगृहातील भोजनाची मेस बंद करून विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात येणार आहे. वसतिगृहाची संख्या न वाढविता, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासन थेट शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व निवासाकरिता रक्कम देणार आहे. परंतु आजपर्यंत शासनाने वेळेवर कुठलीही रक्कम पुरविली नसल्याने, शासनाच्या डीबीटी योजनेवर विद्यार्थ्यांचा विश्वास नाही. विद्यार्थ्यांच्या मते शासन डीबीटी योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण व वसतिगृहातून बेदखल करण्याचा प्रयत्न करीत आहे. थेट लाभ ही भूलथाप असून, शासन वसतिगृह बंद करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.शासनाने वसतिगृहात आहे ती व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी आदिवासी अप्पर आयुक्तांकडे केली आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थी