शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

नागपूर: पैसे नकोत, भोजन द्या ! आदिवासी विद्यार्थ्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 10:40 IST

आदिवासी विभागाने ५ एप्रिल रोजी काढलेल्या शासन निर्णयात वसतिगृहातील भोजन व्यवस्था बंद करून, त्या बदल्यात भोजनाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी या निर्णयाचा विरोध केला असून भोजन व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देआदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयावर धडकला मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकार आदिवासी विद्यार्थ्यांची जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करीत आदिवासी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून रोष व्यक्त केला. आदिवासी विभागाने ५ एप्रिल रोजी काढलेल्या शासन निर्णयात वसतिगृहातील भोजन व्यवस्था बंद करून, त्या बदल्यात भोजनाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी या निर्णयाचा विरोध केला असून भोजन व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी गुरुवारी आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. कार्यालयासमोर ठिय्या देत जेवणाची थाळी वाजवून आपला आवाज सरकार दरबारी पोहचविला.आदिवासी विद्यार्थी संघ व आॅल इंडिया इंडिनिनस स्टुडंट फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सरकारच्या जीआरच्या विरोधात यशवंत स्टेडियम पासून आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी सहभागी झाले होते. शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डीबीटी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. वसतिगृहातील भोजनाची मेस बंद करून विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात येणार आहे. वसतिगृहाची संख्या न वाढविता, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासन थेट शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व निवासाकरिता रक्कम देणार आहे. परंतु आजपर्यंत शासनाने वेळेवर कुठलीही रक्कम पुरविली नसल्याने, शासनाच्या डीबीटी योजनेवर विद्यार्थ्यांचा विश्वास नाही. विद्यार्थ्यांच्या मते शासन डीबीटी योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण व वसतिगृहातून बेदखल करण्याचा प्रयत्न करीत आहे. थेट लाभ ही भूलथाप असून, शासन वसतिगृह बंद करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.शासनाने वसतिगृहात आहे ती व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी आदिवासी अप्पर आयुक्तांकडे केली आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थी