शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

नागपूर जिल्ह्यात शालेय पोषण आहाराचे तांदूळ पोहचूनही विद्यार्थी उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 10:11 IST

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना तांदळाचा पुरवठा करण्यात येतो. परंतु या तांदळाची विद्यार्थ्यांसाठी खिचडीच तयार होत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देपोषण आहारच्या पथकाकडून चौकशी ४०० किलो तांदूळ आढळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना तांदळाचा पुरवठा करण्यात येतो. परंतु या तांदळाची विद्यार्थ्यांसाठी खिचडीच तयार होत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिघोरी परिसरातील सर्वश्रीनगरातील सर्वश्री उच्च प्राथमिक शाळेत गेल्या सहा महिन्यापासून विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला गेला नाही. तक्रारीच्या अनुषंगाने शालेय पोषण आहार विभागाने तपासणी केली असता, शाळेत ४०० किलो अतिरिक्त तांदूळ आढळला आहे.प्रजासत्ताक शिक्षक, कर्मचारी संघाच्यावतीने सर्वश्री उच्च प्राथमिक शाळेत गेल्या सहा महिन्यापासून खिचडी बनली नसल्याची तक्रार जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. संघटनेच्या तक्रारीनुसार शालेय पोषण आहाराच्या बिलामध्ये अनियमितता झाली आहे. यासंदर्भात माहितीच्या अधिकारात माहितीही मागितली होती. परंतु कार्यालयाकडून माहिती उपलब्ध करून दिली नसली तरी, पोषण आहार अधीक्षकांनी या तक्रारीच्या अनुषंगाने शाळेची चौकशी केली. गुरुवारी करण्यात आलेल्या चौकशीत शाळेमध्ये ४०० किलो तांदूळ अतिरिक्त आढळला.गेल्या सहा महिन्यापासून शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी दिल्या जात नाही, त्यामुळे हा तांदूळ जातो कुठे हा प्रश्न अधिकाऱ्यांपुढे आहे. यापूर्वी शहरातील एका शाळेत पोषण आहाराचा तांदूळ जमिनीत पुरण्यात आल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना सहा-सहा महिने पोषण आहार मिळत नसेल, याची साधी दखलही शिक्षण विभागाकडून घेतली जात नसेल, तर हा प्रकार अतिशय गंभीर आहे.यासंदर्भात प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी माहिती घेतो असे सांगितले, परंतु त्यांच्याकडून माहिती देण्यात आली नाही.

खिचडी शिजलीच नाही, तर बिल मंजूर कसे ?संघटनेचा आरोप आहे की, सहा महिन्यापासून खिचडी शिजलीच नाही तरीही पोषण आहाराचे बिल पदावर नसलेल्या व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या करून मंजूर करण्यात आले आहे.

कारवाई नक्कीच होणारशाळेत चौकशीदरम्यान ४०० किलो तांदूळ अतिरिक्त आढळला आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहार का दिला जात नाही, याची विस्तृत चौकशी होणार आहे. शाळेच्या सचिवाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना उपाशी ठेवणाऱ्यांवर नक्कीच दंडात्मक कारवाई होईल.- उकेश चव्हाण, सभापती, शिक्षण समिती

टॅग्स :foodअन्नStudentविद्यार्थी