शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

नागपूर जिल्ह्यात शालेय पोषण आहाराचे तांदूळ पोहचूनही विद्यार्थी उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 10:11 IST

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना तांदळाचा पुरवठा करण्यात येतो. परंतु या तांदळाची विद्यार्थ्यांसाठी खिचडीच तयार होत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देपोषण आहारच्या पथकाकडून चौकशी ४०० किलो तांदूळ आढळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना तांदळाचा पुरवठा करण्यात येतो. परंतु या तांदळाची विद्यार्थ्यांसाठी खिचडीच तयार होत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिघोरी परिसरातील सर्वश्रीनगरातील सर्वश्री उच्च प्राथमिक शाळेत गेल्या सहा महिन्यापासून विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला गेला नाही. तक्रारीच्या अनुषंगाने शालेय पोषण आहार विभागाने तपासणी केली असता, शाळेत ४०० किलो अतिरिक्त तांदूळ आढळला आहे.प्रजासत्ताक शिक्षक, कर्मचारी संघाच्यावतीने सर्वश्री उच्च प्राथमिक शाळेत गेल्या सहा महिन्यापासून खिचडी बनली नसल्याची तक्रार जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. संघटनेच्या तक्रारीनुसार शालेय पोषण आहाराच्या बिलामध्ये अनियमितता झाली आहे. यासंदर्भात माहितीच्या अधिकारात माहितीही मागितली होती. परंतु कार्यालयाकडून माहिती उपलब्ध करून दिली नसली तरी, पोषण आहार अधीक्षकांनी या तक्रारीच्या अनुषंगाने शाळेची चौकशी केली. गुरुवारी करण्यात आलेल्या चौकशीत शाळेमध्ये ४०० किलो तांदूळ अतिरिक्त आढळला.गेल्या सहा महिन्यापासून शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी दिल्या जात नाही, त्यामुळे हा तांदूळ जातो कुठे हा प्रश्न अधिकाऱ्यांपुढे आहे. यापूर्वी शहरातील एका शाळेत पोषण आहाराचा तांदूळ जमिनीत पुरण्यात आल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना सहा-सहा महिने पोषण आहार मिळत नसेल, याची साधी दखलही शिक्षण विभागाकडून घेतली जात नसेल, तर हा प्रकार अतिशय गंभीर आहे.यासंदर्भात प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी माहिती घेतो असे सांगितले, परंतु त्यांच्याकडून माहिती देण्यात आली नाही.

खिचडी शिजलीच नाही, तर बिल मंजूर कसे ?संघटनेचा आरोप आहे की, सहा महिन्यापासून खिचडी शिजलीच नाही तरीही पोषण आहाराचे बिल पदावर नसलेल्या व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या करून मंजूर करण्यात आले आहे.

कारवाई नक्कीच होणारशाळेत चौकशीदरम्यान ४०० किलो तांदूळ अतिरिक्त आढळला आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहार का दिला जात नाही, याची विस्तृत चौकशी होणार आहे. शाळेच्या सचिवाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना उपाशी ठेवणाऱ्यांवर नक्कीच दंडात्मक कारवाई होईल.- उकेश चव्हाण, सभापती, शिक्षण समिती

टॅग्स :foodअन्नStudentविद्यार्थी