शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

नागपूर पालकमंत्र्यांच्या जनसंवादातून सुटले प्रश्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:45 IST

जनसंवाद या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन सामान्य जनतेला येणाऱ्या अडचणी तसेच प्रशासनासंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केलेल्या संवाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांचा प्रतिसाद : शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनसंवाद या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन सामान्य जनतेला येणाऱ्या अडचणी तसेच प्रशासनासंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केलेल्या संवाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मौदा तालुक्यातील झुल्लर, माथनी, पावडदौना, मारोडी तसेच चिरवा आदी गावांना भेट देऊन ग्रामस्थांची थेट संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर, टेकचंद सावरकर, नरेश मोटघरे आदी उपस्थित होते.ग्रामीण भागात पावसाळा सूरु होण्यापूर्वी आवश्यक उपाय योजना आवश्यक असून खरीप पेरणीसाठी बियाणे, खते तसेच आवश्यक शेती अवजारांची उपलब्धता करून देण्याच्या सूचना करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेला थेट लाभ मिळावा. यासाठी अधिकाºयांनी पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या तक्रारी व अडचणी समजून घेतल्या. प्राप्त झालेल्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करून ग्रामस्थांना जनसंवाद कार्यक्रमात दिलासा दिला. या तक्रारीमध्ये पांदण रस्त्याचे बांधकाम, आरोग्यविषयक बाबी, महसूल, कृषी, जिल्हा परिषद, महिला व बाल विकास, पंचायत समिती आदी विभागाशी संबंधित तक्रारी व सूचनांचा समावेश होता.

टॅग्स :ministerमंत्रीnagpurनागपूर