शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Nagpur: सीईओंची मंजुरी न घेता थेट मंत्रालयातून बदली आदेश, स्थायी समितीने ठेवले नियमावर बोट

By गणेश हुड | Updated: June 27, 2024 19:27 IST

Nagpur News: नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण  विभागात हयात नसलेल्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून नियुक्ती आदेशाचे प्रकरण गाजत असतानाच या विभागातून वर्षभरापूर्वी बदली झालेल्या एका तृतीयश्रेणी कर्मचाऱ्याने पुन्हा याच विभागात आपली बदली करण्यासाठी थेट मंत्रालयातून आदेश आणला.

- गणेश हूडनागपूर - जिल्हा परिषदेच्या शिक्षण  विभागात हयात नसलेल्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून नियुक्ती आदेशाचे प्रकरण गाजत असतानाच या विभागातून वर्षभरापूर्वी बदली झालेल्या एका तृतीयश्रेणी कर्मचाऱ्याने पुन्हा याच विभागात आपली बदली करण्यासाठी थेट मंत्रालयातून आदेश आणला. परंतु जि.प. सेवा अधिनियमाचे हे उल्लघन असल्याने मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत हा आदेश मान्य न करता शासनाकडे पुनर्विचारासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय शासनाशी असा पत्रव्यवहार करता येत नाही. सीईओ मार्फत असा पत्रव्यवहार करणे बंधनकारक आहे. असे असतानाही वर्षभरापूर्वी शिक्षण विभागातून हिंगणा पंचायत समितीत बदली झालेले कर्मचारी राहुल देशमुख यांनी थेट मंत्रालयातून आदेश आणला. यासाठी त्यांनी शिक्षण विभागात कार्यरत राजेंद्र राचेलवार यांना आपसी बदलीसाठी राजी केले.  स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. सेवा नियमाचे उल्लघन केल्याने संबंधित कर्मचाऱ्यांचा बदली आदेश लागू न करता तो शासनाकडे पुर्विचारासाठी पाठवून संबंधित कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाईचे निर्देश देण्यात आले.

तीन वेळा थेट मंत्रालयातून आदेश एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली झाल्यानंतर दहा वर्षे पुन्हा त्याच विभागात नियुक्ती मिळत नाही. परंतु यापूर्वीही तीन वेळा मंत्रालयातून आदेश काढून बदली रद्द करण्यात आल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावर शासन आदेश लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शिक्षण विभागात पुन्हा परत येण्याचे स्वप्न तूर्त भंगले आहे.

टॅग्स :Transferबदलीnagpurनागपूर