शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नागपुरात लॉजिस्टिक पार्कचा विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:32 IST

भौगोलिक स्थितीनुसार नागपुरात मोठा लॉजिस्टिक पार्क बनविण्याची संकल्पना तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली खापरीमध्ये हा पार्क बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. पण सात महिन्यानंतरही लॉजिस्टिक पार्कसाठी जागा निश्चित होऊ शकली नाही.

ठळक मुद्दे जागा निश्चित नाही : सल्लागारांची नियुक्ती व सर्वे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भौगोलिक स्थितीनुसार नागपुरात मोठा लॉजिस्टिक पार्क बनविण्याची संकल्पना तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली खापरीमध्ये हा पार्क बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. पण सात महिन्यानंतरही लॉजिस्टिक पार्कसाठी जागा निश्चित होऊ शकली नाही.‘एनएएचआय’कडे जबाबदारीनितीन गडकरी यांच्या घोषणेनुसार खापरीजवळ जवळपास ३०० एकरमध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क (एमएमएलपी) बनविण्यात येणार आहे. मध्य भारतातील सर्वात मोठ्या पार्कच्या विकासाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएएचआय) देण्यात आली आहे. याकरिता सर्व्हेक्षणाचे काम सुरू आहे. प्रकल्पासाठी नियुक्त कंपनी वायलेंट सोल्युशन वाहतुकीचा अभ्यास करीत आहे. अहवालानंतरच यावर पुढे पाऊल टाकण्यात येणार आहे.हा पार्क जवळपास ३०० एकरमध्ये बनविण्याची योजना आहे. सध्या मिहानजवळील जागा शोधण्यात येत आहे. कॉन्कोरच्या आयसीडीलगतच पार्क बनविण्याचा प्रयत्न आहे. कारण कॉन्कोरचा आयसीडी ४५ एकरमध्ये असून माल वाहतुकीसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडीत आहे. त्यालगत नवीन पार्कच्या विकासामुळे जास्त अडथळे येणार नाही. त्यानंतरही जमीन निश्चित करण्यात आलेली नाही. प्राप्त माहितीनुसार खापरी आणि कॉन्कोरलगत बांधकाम केल्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई जोडणीचा लाभ मिळेल. पार्कसाठी तिन्ही माध्यमे उपयुक्त ठरणार आहे.रेल्वेच्या लाईनचा विस्तारखापरी येथे सर्व सुविधा आहे. ही जागा निश्चित झाल्यास रेल्वेला एक अतिरिक्त रेल्वेलाईन टाकावी लागेल. याशिवाय रेल्वेलाईनसाठी कॉन्कोरने रेल्वेकडे रक्कम जमा केली आहे. या लाईनच्या विस्तारामुळे दोन्ही प्रकल्पाला फायदा मिळेल आणि नागपूर खऱ्या अर्थात लॉजिस्टिक पार्क बनू शकेल.वाहतुकीचा अभ्यासप्राप्त माहितीनुसार, सध्या वाहतूक सर्व्हेक्षणाचे काम सुरू आहे. सध्या आणि भविष्यातील वाहतुकीच्या स्थितीवर दिल्लीची कंपनी माहिती गोळा करीत आहे. गरज कुठल्या वस्तूंची आहे आणि माल कुठे जातो, याचीही चाचपणी घेण्यात येत आहे. सर्व्हेक्षणानंतर लॉजिस्टिक पार्कमध्ये सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. जीएसटीनंतर नागपूरच्या विकासाच्या शक्यता अधिक प्रबळ झाल्या आहेत. खापरी येथे मोठ्या कंपन्या वेअरहाऊस तयार करीत आहेत. अनेक मोठे ब्रॅण्ड आल्या असून काही कंपन्या विकासाच्या संधी शोधत आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर