शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘दयासागर’ ने केले उन्हाळ्यात वृक्षांचे संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 18:53 IST

रस्त्यांच्या विकासामुळे आणि मोठमोठ्या इमारतींमुळे शहरातील रस्त्यांवर मोजकेच वृक्ष शिल्लक आहे. पावसाळ्यापूर्वी सुटलेल्या वादळवाऱ्यामुळे मोठ्या संख्येने वृक्ष कोसळतात, कारण उन्हाळ्यात वृक्षांची निगा राखली जात नाही. शहरातील रस्त्यावरचे वृक्ष जगविण्यासाठी नागपुरातील ‘दयासागर’ उन्हाळ्यात वृक्षांचे संवर्धन करीत आहे. दरवर्षी दक्षिण नागपूर व परिसरातील रस्त्यावरील वृक्षांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी देऊन त्यांना जगविण्याचा प्रयत्न दयासागर करीत आहे.

ठळक मुद्देरस्त्यावरील वृक्षांना पाणी देऊन जगविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्यांच्या विकासामुळे आणि मोठमोठ्या इमारतींमुळे शहरातील रस्त्यांवर मोजकेच वृक्ष शिल्लक आहे. पावसाळ्यापूर्वी सुटलेल्या वादळवाऱ्यामुळे मोठ्या संख्येने वृक्ष कोसळतात, कारण उन्हाळ्यात वृक्षांची निगा राखली जात नाही. शहरातील रस्त्यावरचे वृक्ष जगविण्यासाठी नागपुरातील ‘दयासागर’ उन्हाळ्यात वृक्षांचे संवर्धन करीत आहे. दरवर्षी दक्षिण नागपूर व परिसरातील रस्त्यावरील वृक्षांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी देऊन त्यांना जगविण्याचा प्रयत्न दयासागर करीत आहे.दयासागर वेलफेअर असोसिएशन ही एक समाजिक संस्था आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम संस्थेकडून राबविण्यात येते. महापालिका व विविध संस्थांच्या माध्यमातून रस्त्याच्या कडेला वृक्ष लावण्यात आली आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांकडे कुणीही लक्ष देत नाही. पाणी न मिळाल्यामुळे अनेक वृक्ष मरूनही जातात. दयासागर वेलफेअर असोसिएशन गेल्या ७ वर्षापासून दक्षिण नागपुरात रस्त्यावर लागलेल्या वृक्षांना पाणी देण्याचे काम करीत आहे. असोसिएशनचे सदस्य सकाळी ७ वाजता आॅटोमध्ये पाणी भरून रस्त्यावरील वृक्षांना देतात. उन्हाळाभर नियमित त्यांचे हे कार्य सुरू होते. त्यांच्या या कार्यामुळे अनेक वृक्ष जगले. दयासागरच्या या कार्यात अजय पांडे, अवनिकांत वर्मा, सॅम्युअल मसीह, सिराज शेख, मनोज गावंडे, यांचेही सहकार्य लाभले. संस्था पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविते. मित्र, नातेवाईकांच्या जन्मदिनाला, आप्तेष्टांच्या स्मृतिदिनाला एक वृक्ष लावण्याचे आवाहन करते. असोसिएशनतर्फे शहरातील वंजारीनगर टी. बी. वार्ड, अजनी, इंदिरा कॉलनी, बनर्जी ले-आउट, भगवाननगर, रामेश्वरी, हावरापेठ, चंद्रनगर, महात्मा फुले उद्यान सुयोगनगर, नरेंद्रनगर, पार्वतीनगर यासह हिंगणा परिसरात वृक्ष लागवडीपासून वृक्षाचे संवधन केले आहे. २५ वर्षापूर्वी धंतोलीतून येत असताना कचºयाच्या ढिगाºयात आंब्याचे छोटेसे झाड उमलले होते. तेथून ते झाड उचलून मी चंद्रमणीनगरातील डगलस होस्टेल अनाथाश्रमात लावले. आज त्या वृक्षांची फळे परिसरातील लोक खात आहे. तेव्हापासूनच वृक्षांप्रती प्रेम निर्माण झाले. ते आजही सुरूच आहे. याच भावनेतून आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात रस्त्याच्या काठावरील वृक्षांना पाणी देतो, वृक्षाच्या सभोवतालचा परिसर साफ करून, वृक्षाच्या बुंध्याला आळा करतो. वृक्ष जगावे हाच त्या मागचा प्रयत्न असतो.मनीष चांदेकर, पदाधिकारी, दयासागर वेलफेअर असोसिएशन 

टॅग्स :environmentपर्यावरणnagpurनागपूर