शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

नागपुरात ‘दयासागर’ ने केले उन्हाळ्यात वृक्षांचे संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 18:53 IST

रस्त्यांच्या विकासामुळे आणि मोठमोठ्या इमारतींमुळे शहरातील रस्त्यांवर मोजकेच वृक्ष शिल्लक आहे. पावसाळ्यापूर्वी सुटलेल्या वादळवाऱ्यामुळे मोठ्या संख्येने वृक्ष कोसळतात, कारण उन्हाळ्यात वृक्षांची निगा राखली जात नाही. शहरातील रस्त्यावरचे वृक्ष जगविण्यासाठी नागपुरातील ‘दयासागर’ उन्हाळ्यात वृक्षांचे संवर्धन करीत आहे. दरवर्षी दक्षिण नागपूर व परिसरातील रस्त्यावरील वृक्षांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी देऊन त्यांना जगविण्याचा प्रयत्न दयासागर करीत आहे.

ठळक मुद्देरस्त्यावरील वृक्षांना पाणी देऊन जगविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्यांच्या विकासामुळे आणि मोठमोठ्या इमारतींमुळे शहरातील रस्त्यांवर मोजकेच वृक्ष शिल्लक आहे. पावसाळ्यापूर्वी सुटलेल्या वादळवाऱ्यामुळे मोठ्या संख्येने वृक्ष कोसळतात, कारण उन्हाळ्यात वृक्षांची निगा राखली जात नाही. शहरातील रस्त्यावरचे वृक्ष जगविण्यासाठी नागपुरातील ‘दयासागर’ उन्हाळ्यात वृक्षांचे संवर्धन करीत आहे. दरवर्षी दक्षिण नागपूर व परिसरातील रस्त्यावरील वृक्षांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी देऊन त्यांना जगविण्याचा प्रयत्न दयासागर करीत आहे.दयासागर वेलफेअर असोसिएशन ही एक समाजिक संस्था आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम संस्थेकडून राबविण्यात येते. महापालिका व विविध संस्थांच्या माध्यमातून रस्त्याच्या कडेला वृक्ष लावण्यात आली आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांकडे कुणीही लक्ष देत नाही. पाणी न मिळाल्यामुळे अनेक वृक्ष मरूनही जातात. दयासागर वेलफेअर असोसिएशन गेल्या ७ वर्षापासून दक्षिण नागपुरात रस्त्यावर लागलेल्या वृक्षांना पाणी देण्याचे काम करीत आहे. असोसिएशनचे सदस्य सकाळी ७ वाजता आॅटोमध्ये पाणी भरून रस्त्यावरील वृक्षांना देतात. उन्हाळाभर नियमित त्यांचे हे कार्य सुरू होते. त्यांच्या या कार्यामुळे अनेक वृक्ष जगले. दयासागरच्या या कार्यात अजय पांडे, अवनिकांत वर्मा, सॅम्युअल मसीह, सिराज शेख, मनोज गावंडे, यांचेही सहकार्य लाभले. संस्था पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविते. मित्र, नातेवाईकांच्या जन्मदिनाला, आप्तेष्टांच्या स्मृतिदिनाला एक वृक्ष लावण्याचे आवाहन करते. असोसिएशनतर्फे शहरातील वंजारीनगर टी. बी. वार्ड, अजनी, इंदिरा कॉलनी, बनर्जी ले-आउट, भगवाननगर, रामेश्वरी, हावरापेठ, चंद्रनगर, महात्मा फुले उद्यान सुयोगनगर, नरेंद्रनगर, पार्वतीनगर यासह हिंगणा परिसरात वृक्ष लागवडीपासून वृक्षाचे संवधन केले आहे. २५ वर्षापूर्वी धंतोलीतून येत असताना कचºयाच्या ढिगाºयात आंब्याचे छोटेसे झाड उमलले होते. तेथून ते झाड उचलून मी चंद्रमणीनगरातील डगलस होस्टेल अनाथाश्रमात लावले. आज त्या वृक्षांची फळे परिसरातील लोक खात आहे. तेव्हापासूनच वृक्षांप्रती प्रेम निर्माण झाले. ते आजही सुरूच आहे. याच भावनेतून आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात रस्त्याच्या काठावरील वृक्षांना पाणी देतो, वृक्षाच्या सभोवतालचा परिसर साफ करून, वृक्षाच्या बुंध्याला आळा करतो. वृक्ष जगावे हाच त्या मागचा प्रयत्न असतो.मनीष चांदेकर, पदाधिकारी, दयासागर वेलफेअर असोसिएशन 

टॅग्स :environmentपर्यावरणnagpurनागपूर