शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

नागपुरात ‘दयासागर’ ने केले उन्हाळ्यात वृक्षांचे संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 18:53 IST

रस्त्यांच्या विकासामुळे आणि मोठमोठ्या इमारतींमुळे शहरातील रस्त्यांवर मोजकेच वृक्ष शिल्लक आहे. पावसाळ्यापूर्वी सुटलेल्या वादळवाऱ्यामुळे मोठ्या संख्येने वृक्ष कोसळतात, कारण उन्हाळ्यात वृक्षांची निगा राखली जात नाही. शहरातील रस्त्यावरचे वृक्ष जगविण्यासाठी नागपुरातील ‘दयासागर’ उन्हाळ्यात वृक्षांचे संवर्धन करीत आहे. दरवर्षी दक्षिण नागपूर व परिसरातील रस्त्यावरील वृक्षांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी देऊन त्यांना जगविण्याचा प्रयत्न दयासागर करीत आहे.

ठळक मुद्देरस्त्यावरील वृक्षांना पाणी देऊन जगविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्यांच्या विकासामुळे आणि मोठमोठ्या इमारतींमुळे शहरातील रस्त्यांवर मोजकेच वृक्ष शिल्लक आहे. पावसाळ्यापूर्वी सुटलेल्या वादळवाऱ्यामुळे मोठ्या संख्येने वृक्ष कोसळतात, कारण उन्हाळ्यात वृक्षांची निगा राखली जात नाही. शहरातील रस्त्यावरचे वृक्ष जगविण्यासाठी नागपुरातील ‘दयासागर’ उन्हाळ्यात वृक्षांचे संवर्धन करीत आहे. दरवर्षी दक्षिण नागपूर व परिसरातील रस्त्यावरील वृक्षांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी देऊन त्यांना जगविण्याचा प्रयत्न दयासागर करीत आहे.दयासागर वेलफेअर असोसिएशन ही एक समाजिक संस्था आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम संस्थेकडून राबविण्यात येते. महापालिका व विविध संस्थांच्या माध्यमातून रस्त्याच्या कडेला वृक्ष लावण्यात आली आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांकडे कुणीही लक्ष देत नाही. पाणी न मिळाल्यामुळे अनेक वृक्ष मरूनही जातात. दयासागर वेलफेअर असोसिएशन गेल्या ७ वर्षापासून दक्षिण नागपुरात रस्त्यावर लागलेल्या वृक्षांना पाणी देण्याचे काम करीत आहे. असोसिएशनचे सदस्य सकाळी ७ वाजता आॅटोमध्ये पाणी भरून रस्त्यावरील वृक्षांना देतात. उन्हाळाभर नियमित त्यांचे हे कार्य सुरू होते. त्यांच्या या कार्यामुळे अनेक वृक्ष जगले. दयासागरच्या या कार्यात अजय पांडे, अवनिकांत वर्मा, सॅम्युअल मसीह, सिराज शेख, मनोज गावंडे, यांचेही सहकार्य लाभले. संस्था पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविते. मित्र, नातेवाईकांच्या जन्मदिनाला, आप्तेष्टांच्या स्मृतिदिनाला एक वृक्ष लावण्याचे आवाहन करते. असोसिएशनतर्फे शहरातील वंजारीनगर टी. बी. वार्ड, अजनी, इंदिरा कॉलनी, बनर्जी ले-आउट, भगवाननगर, रामेश्वरी, हावरापेठ, चंद्रनगर, महात्मा फुले उद्यान सुयोगनगर, नरेंद्रनगर, पार्वतीनगर यासह हिंगणा परिसरात वृक्ष लागवडीपासून वृक्षाचे संवधन केले आहे. २५ वर्षापूर्वी धंतोलीतून येत असताना कचºयाच्या ढिगाºयात आंब्याचे छोटेसे झाड उमलले होते. तेथून ते झाड उचलून मी चंद्रमणीनगरातील डगलस होस्टेल अनाथाश्रमात लावले. आज त्या वृक्षांची फळे परिसरातील लोक खात आहे. तेव्हापासूनच वृक्षांप्रती प्रेम निर्माण झाले. ते आजही सुरूच आहे. याच भावनेतून आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात रस्त्याच्या काठावरील वृक्षांना पाणी देतो, वृक्षाच्या सभोवतालचा परिसर साफ करून, वृक्षाच्या बुंध्याला आळा करतो. वृक्ष जगावे हाच त्या मागचा प्रयत्न असतो.मनीष चांदेकर, पदाधिकारी, दयासागर वेलफेअर असोसिएशन 

टॅग्स :environmentपर्यावरणnagpurनागपूर