शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"धावपट्टीचे काम एक महिन्यात पूर्ण करा; अन्यथा कंपनीला ‘टर्मिनेट’ करू", नितीन गडकरी यांनी दिला इशारा

By मोरेश्वर मानापुरे | Updated: December 23, 2024 15:46 IST

Nagpur News: धावपट्टीच्या रिकार्पेटिंग एक महिन्यात पूर्ण करा, अन्यथा कंपनीला टर्मिनेट करू आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू. प्रसंगी अधिकाऱ्यांना नोकरीतून बरखास्त करू आणि रिकार्पेटिंगचे काम दुसऱ्या कंपनीला देण्याचा इशारा गडकरी यांना पत्रकारांशी बोलताना दिला.

नागपूर -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकार्पेटिंग कामाला उशीर होत असल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. धावपट्टीच्या रिकार्पेटिंग एक महिन्यात पूर्ण करा, अन्यथा कंपनीला टर्मिनेट करू आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू. प्रसंगी अधिकाऱ्यांना नोकरीतून बरखास्त करू आणि रिकार्पेटिंगचे काम दुसऱ्या कंपनीला देण्याचा इशारा गडकरी यांना पत्रकारांशी बोलताना दिला.

धावपट्टीच्या रिकार्पेटिंगच्या कामाला उशीर होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नितीन गडकरी यांनी सोमवारी धावपट्टीच्या कामाची पाहणी केली. यावेळी आ. मोहन मते, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य गिरधारी मंत्री, प्रकाश भोयर, दिलीप जाधव, एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालिका स्वाती पांडे, आणि के.जी. गुप्ता कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळी १० ते ६ वेळेत विमानाची ये-जा बंद; तिकिटांचे दर तिपटीने वाढले

गडकरी म्हणाले, डिसेंबर २०२३ मध्ये विमानतळ प्राधिकरणाने धावपट्टीच्या रिकार्पेटिंगची निविदा प्रसिद्ध केली. १ मे २०२४ रोजी के. जी. गुप्ता कंपनीला कामाचे कार्यादेश देण्यात आले. मात्र, अद्याप धावपट्टीचे काम पूर्ण झालेले नाही. यासंदर्भात अनेक तक्रारी गडकरी यांना प्राप्त झाल्या. शिवाय, धावपट्टीच्या कामामुळे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत नागपूर विमातळावरील आवागमन बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विमानांच्या तिकिटांचे दर दुप्पट-तिप्पट प्रमाणात वाढले. याचा नियमित विमान प्रवास करणाऱ्यांना त्रास होत आहे.

कंपनी म्हणते १ मेपर्यंत काम पूर्ण करूकार्यादेश मिळाल्यावर कंपनीने जून ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. १ ऑक्टोबर २०२४ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या दरम्यान काही कारणांनी काम बंद होते. त्यानंतर २४ नोव्हेंबरपासून काम पुन्हा सुरू झाले. पहिल्या लेअरचे काम ८० टक्के, दुसऱ्या आणि तिसऱ्या लेअरचे काम २१ मे २०२५ पर्यंत पूर्ण होईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

पाच महिने सोसावे लागेल तिकिटांची दरवाढगडकरी म्हणाले, नागरिकांना आणखी पाच महिने विमान प्रवासाची भाडेवाढ सोसावी लागेल. हे योग्य नाही. कंपनीने एक महिन्याच्या आत धावपट्टीचे काम पूर्ण करावे. अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. 

हॉटमिक्स प्रकल्प ८ किमी दूर, आठ रोलरने काम करागडकरी म्हणाले, कंपनीने हॉटमिक्स प्रकल्प कामाच्या ठिकाणापासून ८ किमी दूर लावला आहे. त्या ठिकाणाहून प्रकल्पस्थळी मटेरियल आणण्यासाठी बराच वेळ लागतो. परिणामी कामाला उशीर होतो. कंपनीने हॉटमिक्स प्रकल्प जवळच उभारावा. कंपनी तीन रोलरने काम करीत आहे. कंपनीने प्रारंभीपासूनच सात ते आठ रोलरने काम केले असते तर बरेच काम झाले असते. कंपनीच्या इंदुर येथील कंत्राटदारांशी बोलणे झाले असून तातडीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर