शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"धावपट्टीचे काम एक महिन्यात पूर्ण करा; अन्यथा कंपनीला ‘टर्मिनेट’ करू", नितीन गडकरी यांनी दिला इशारा

By मोरेश्वर मानापुरे | Updated: December 23, 2024 15:46 IST

Nagpur News: धावपट्टीच्या रिकार्पेटिंग एक महिन्यात पूर्ण करा, अन्यथा कंपनीला टर्मिनेट करू आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू. प्रसंगी अधिकाऱ्यांना नोकरीतून बरखास्त करू आणि रिकार्पेटिंगचे काम दुसऱ्या कंपनीला देण्याचा इशारा गडकरी यांना पत्रकारांशी बोलताना दिला.

नागपूर -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकार्पेटिंग कामाला उशीर होत असल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. धावपट्टीच्या रिकार्पेटिंग एक महिन्यात पूर्ण करा, अन्यथा कंपनीला टर्मिनेट करू आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू. प्रसंगी अधिकाऱ्यांना नोकरीतून बरखास्त करू आणि रिकार्पेटिंगचे काम दुसऱ्या कंपनीला देण्याचा इशारा गडकरी यांना पत्रकारांशी बोलताना दिला.

धावपट्टीच्या रिकार्पेटिंगच्या कामाला उशीर होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नितीन गडकरी यांनी सोमवारी धावपट्टीच्या कामाची पाहणी केली. यावेळी आ. मोहन मते, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य गिरधारी मंत्री, प्रकाश भोयर, दिलीप जाधव, एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालिका स्वाती पांडे, आणि के.जी. गुप्ता कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळी १० ते ६ वेळेत विमानाची ये-जा बंद; तिकिटांचे दर तिपटीने वाढले

गडकरी म्हणाले, डिसेंबर २०२३ मध्ये विमानतळ प्राधिकरणाने धावपट्टीच्या रिकार्पेटिंगची निविदा प्रसिद्ध केली. १ मे २०२४ रोजी के. जी. गुप्ता कंपनीला कामाचे कार्यादेश देण्यात आले. मात्र, अद्याप धावपट्टीचे काम पूर्ण झालेले नाही. यासंदर्भात अनेक तक्रारी गडकरी यांना प्राप्त झाल्या. शिवाय, धावपट्टीच्या कामामुळे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत नागपूर विमातळावरील आवागमन बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विमानांच्या तिकिटांचे दर दुप्पट-तिप्पट प्रमाणात वाढले. याचा नियमित विमान प्रवास करणाऱ्यांना त्रास होत आहे.

कंपनी म्हणते १ मेपर्यंत काम पूर्ण करूकार्यादेश मिळाल्यावर कंपनीने जून ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. १ ऑक्टोबर २०२४ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या दरम्यान काही कारणांनी काम बंद होते. त्यानंतर २४ नोव्हेंबरपासून काम पुन्हा सुरू झाले. पहिल्या लेअरचे काम ८० टक्के, दुसऱ्या आणि तिसऱ्या लेअरचे काम २१ मे २०२५ पर्यंत पूर्ण होईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

पाच महिने सोसावे लागेल तिकिटांची दरवाढगडकरी म्हणाले, नागरिकांना आणखी पाच महिने विमान प्रवासाची भाडेवाढ सोसावी लागेल. हे योग्य नाही. कंपनीने एक महिन्याच्या आत धावपट्टीचे काम पूर्ण करावे. अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. 

हॉटमिक्स प्रकल्प ८ किमी दूर, आठ रोलरने काम करागडकरी म्हणाले, कंपनीने हॉटमिक्स प्रकल्प कामाच्या ठिकाणापासून ८ किमी दूर लावला आहे. त्या ठिकाणाहून प्रकल्पस्थळी मटेरियल आणण्यासाठी बराच वेळ लागतो. परिणामी कामाला उशीर होतो. कंपनीने हॉटमिक्स प्रकल्प जवळच उभारावा. कंपनी तीन रोलरने काम करीत आहे. कंपनीने प्रारंभीपासूनच सात ते आठ रोलरने काम केले असते तर बरेच काम झाले असते. कंपनीच्या इंदुर येथील कंत्राटदारांशी बोलणे झाले असून तातडीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर