शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

नागपुरात काजू स्वस्त, बदाम, आक्रोड व खारीक महाग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 21:14 IST

गेल्या काही दिवसापासून किमतीत वाढ झाल्यामुळे सुकामेव्याची खरेदी गरीब आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. जीएसटीचा किमतीवर परिणाम झाला आहे. तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी भाव दुपटीवर गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे जीएसटीचा परिणाम : मिठाईऐवजी सुका मेव्याला मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शुभेच्छांसोबत सुदृढ आरोग्यासाठी सुकामेवा (ड्रायफ्रूट) देण्याचा ट्रेंड हिट ठरला आहे. प्रत्येक समारंभ आणि भेटस्वरुपात देण्यासाठी सुकामेव्याची मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसापासून किमतीत वाढ झाल्यामुळे सुकामेव्याची खरेदी गरीब आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. जीएसटीचा किमतीवर परिणाम झाला आहे. तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी भाव दुपटीवर गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.इतवारा किराणा असोसिएशनचे अध्यक्ष भंवरलाल जैन म्हणाले, भारत सरकारने खारीकवर २०० टक्के आयात शुल्क लावल्यामुळे पाकिस्तानातून आवक बंद झाली आहे. याशिवाय देशांतर्गत उत्पादक कमी असल्यामुळे ठोक बाजारात भाव १२० रुपयांवरून २८० रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळमध्ये जास्त भावात विक्री होत असून सध्या भाव कमी होण्याची काहीही शक्यता नाही. याशिवाय बदाम ६६० रुपयांवरून ७१० रुपयांपर्यंत (किलो) वाढ झाली आहे. बदाम कॅलिफोर्निया (अमेरिका) येथून आयात होते. नवीन उत्पादन येण्यास उशीर असल्यामुळे भाव कमी होण्याची शक्यता नाही. अक्रोडच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. चिली आणि कॅलिफोर्निया येथून आवक कमी आहे. गेल्यावर्षीच्या ४०० रुपयांच्या तुलनेत भाव ६५० रुपयांपर्यंत वाढले आहेत.सध्या औषध म्हणून काजूला मागणी वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत भाव कमी आहेत. इतवारी बाजारात ३२० नंबर काजूचे भाव गेल्यावर्षी ७८० रुपयांच्या तुलनेत ६९० रुपये आणि २४० नंबर काजू गेल्यावर्षीच्या ९०० रुपयांच्या तुलनेत ८०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. बाजारात काजूची आवक कोकण, ओरिसा, दक्षिण अफ्रिका आणि बहरीन देशातून होते. यंदा आवक चांगली आहे. किसमीस गेल्यावर्षीच्या २७० रुपयांच्या तुलनेत भाव २२० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. सध्या बदामवर १२ टक्के जीएसटी, खारीक १२ टक्के, काजू ५ टक्के, अक्रोड ५ टक्के, किसमिस ५ टक्के आणि विलायचीवर ५ टक्के जीएसटी आहे.विलायचीत १६०० रुपयांची घसरणठोक बाजारात दीड वर्षांपूर्वी एक हजार रुपये आणि सहा महिन्यांपूर्वी विलायचीचे भाव २ हजार रुपये किलो होते. त्यानंतर भाव निरंतर वाढत ५ हजार रुपयांवर पोहोचले. त्यामुळे विक्रीत प्रचंड घसरण झाली. पण १५ दिवसांपूर्वी भाव १६०० रुपयांनी अचानक कोसळून ३४०० रुपयांपर्यंत खाली आले. आवक केरळ आणि तामिळनाडू येथून होते. या ठिकाणी विलायची बोर्डातर्फे लिलाव करण्यात येतो. खाकसची किंमत ५०० रुपयांवरून एक हजारापर्यंत वाढल्याचे जैन यांनी सांगितले.

टॅग्स :Inflationमहागाईnagpurनागपूर