शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नागपुरात काजू स्वस्त, बदाम, आक्रोड व खारीक महाग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 21:14 IST

गेल्या काही दिवसापासून किमतीत वाढ झाल्यामुळे सुकामेव्याची खरेदी गरीब आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. जीएसटीचा किमतीवर परिणाम झाला आहे. तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी भाव दुपटीवर गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे जीएसटीचा परिणाम : मिठाईऐवजी सुका मेव्याला मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शुभेच्छांसोबत सुदृढ आरोग्यासाठी सुकामेवा (ड्रायफ्रूट) देण्याचा ट्रेंड हिट ठरला आहे. प्रत्येक समारंभ आणि भेटस्वरुपात देण्यासाठी सुकामेव्याची मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसापासून किमतीत वाढ झाल्यामुळे सुकामेव्याची खरेदी गरीब आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. जीएसटीचा किमतीवर परिणाम झाला आहे. तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी भाव दुपटीवर गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.इतवारा किराणा असोसिएशनचे अध्यक्ष भंवरलाल जैन म्हणाले, भारत सरकारने खारीकवर २०० टक्के आयात शुल्क लावल्यामुळे पाकिस्तानातून आवक बंद झाली आहे. याशिवाय देशांतर्गत उत्पादक कमी असल्यामुळे ठोक बाजारात भाव १२० रुपयांवरून २८० रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळमध्ये जास्त भावात विक्री होत असून सध्या भाव कमी होण्याची काहीही शक्यता नाही. याशिवाय बदाम ६६० रुपयांवरून ७१० रुपयांपर्यंत (किलो) वाढ झाली आहे. बदाम कॅलिफोर्निया (अमेरिका) येथून आयात होते. नवीन उत्पादन येण्यास उशीर असल्यामुळे भाव कमी होण्याची शक्यता नाही. अक्रोडच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. चिली आणि कॅलिफोर्निया येथून आवक कमी आहे. गेल्यावर्षीच्या ४०० रुपयांच्या तुलनेत भाव ६५० रुपयांपर्यंत वाढले आहेत.सध्या औषध म्हणून काजूला मागणी वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत भाव कमी आहेत. इतवारी बाजारात ३२० नंबर काजूचे भाव गेल्यावर्षी ७८० रुपयांच्या तुलनेत ६९० रुपये आणि २४० नंबर काजू गेल्यावर्षीच्या ९०० रुपयांच्या तुलनेत ८०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. बाजारात काजूची आवक कोकण, ओरिसा, दक्षिण अफ्रिका आणि बहरीन देशातून होते. यंदा आवक चांगली आहे. किसमीस गेल्यावर्षीच्या २७० रुपयांच्या तुलनेत भाव २२० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. सध्या बदामवर १२ टक्के जीएसटी, खारीक १२ टक्के, काजू ५ टक्के, अक्रोड ५ टक्के, किसमिस ५ टक्के आणि विलायचीवर ५ टक्के जीएसटी आहे.विलायचीत १६०० रुपयांची घसरणठोक बाजारात दीड वर्षांपूर्वी एक हजार रुपये आणि सहा महिन्यांपूर्वी विलायचीचे भाव २ हजार रुपये किलो होते. त्यानंतर भाव निरंतर वाढत ५ हजार रुपयांवर पोहोचले. त्यामुळे विक्रीत प्रचंड घसरण झाली. पण १५ दिवसांपूर्वी भाव १६०० रुपयांनी अचानक कोसळून ३४०० रुपयांपर्यंत खाली आले. आवक केरळ आणि तामिळनाडू येथून होते. या ठिकाणी विलायची बोर्डातर्फे लिलाव करण्यात येतो. खाकसची किंमत ५०० रुपयांवरून एक हजारापर्यंत वाढल्याचे जैन यांनी सांगितले.

टॅग्स :Inflationमहागाईnagpurनागपूर