शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

 नागपुरातील  बिल्डरला १० लाख रु. जमा करण्यासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 22:39 IST

उपराजधानीत काही दिवसांपूर्वी उच्चदाब वीजवाहिन्यांमुळे सुगतनगर येथील ११ वर्षीय धर या जुळ्या भावंडाचा जीव गेला. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान आर्मर्स बिल्डर्स संचालक आनंद खोब्रागडे यांनी एक अर्ज दाखल करून १० लाख रुपये जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मंजूर करीत त्यांना ३० मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

ठळक मुद्देहायकोर्ट : हायटेन्शन लाईन मृत्यू प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: उपराजधानीत काही दिवसांपूर्वी उच्चदाब वीजवाहिन्यांमुळे सुगतनगर येथील ११ वर्षीय धर या जुळ्या भावंडाचा जीव गेला. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान आर्मर्स बिल्डर्स संचालक आनंद खोब्रागडे यांनी एक अर्ज दाखल करून १० लाख रुपये जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मंजूर करीत त्यांना ३० मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.न्यायालयाने उच्चदाब वीज वाहिन्यांमुळे जीव गमवावा लागलेल्या धर या जुळ्या भावंडाच्या कुटुंबीयाला १० लाख रु पयांची नुकसान भरपाई देण्याचे तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या मानधनाच्या खर्चासाठी १० लाख असे एकूण २० लाख रु पये जमा करण्याचे आदेश यापूर्वी बिल्डर आनंद खोब्रागडे यांना दिले होते. त्यानुसार खोब्रागडे यांनी धर कुटुंबीयाला १० लाख रु पयांची नुकसान भरपाई दिली होती. मात्र, चौकशी समितीच्या मानधनाच्या खर्चासाठी द्यावयाचे १० लाख रु पये हायकोर्ट प्रबंधकाकडे जमा केले नव्हते.याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान बिल्डर खोब्रागडे यांनी न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला. पैशाची चणचण असल्यामुळे चौकशी समितीच्या मानधनाचा खर्च जमा करण्यासाठी विलंब होत असून ही रक्कम जमा करण्यासाठी महिन्याभराची मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती या अर्जात करण्यात आली आहे. न्यायालयाने बिल्डरचे म्हणणे ऐकून घेत त्यांना १० मेपर्यंत मुदतवाढ दिली. याप्रकरणी न्यायालय मित्र म्हणून अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर