शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नागपूर भाजप कार्यकर्त्यांची रेल्वेगाडी चुकली; वेळेबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 12:53 IST

मुंबई येथे भाजपच्या वर्धापन दिनासाठी नागपूरहून निघणाऱ्या रेल्वेगाडीच्या वेळेबाबत संभ्रम झाल्याने ही गाडी केवळ ३० कार्यकर्ते घेऊन नागपुरातून सकाळी रवाना झाली.

ठळक मुद्देमुख्य व अजनी रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांची गर्दीभाजपाच्या प्रसिद्धीपत्रकात १० ची वेळ नमूद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मुंबई येथे भाजपच्या वर्धापन दिनासाठी नागपूरहून निघणाऱ्या रेल्वेगाडीच्या वेळेबाबत संभ्रम झाल्याने ही गाडी केवळ ३० कार्यकर्ते घेऊन नागपुरातून सकाळी रवाना झाली. वेळेबाबत रेल्वे प्रशासनात संभ्रम झाल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भाजपाने मुंबईसाठी आयआरसीटीसी कडे नागपूर-मुंबई अशी गाडी बुक केली होती. तिची नागपूरहून सुटण्याची वेळ सकाळी ७.५० ची निश्चित करण्यात आली होती. मात्र कार्यकर्त्यांना निरोप देताना भाजपने ती वेळ चुकून १० अशी सांगितल्याने ही गाडी सकाळी उत्साहाने स्टेशनवर लवकर आलेल्या थोड्याफार कार्यकर्त्यांना घेऊन रवाना झाली. गाडी निघाल्याने भाजपा कार्यकर्त्यांत गोंधळ उडाला. या गोंधळाला सोडवण्यासाठी मग रेल्वे प्रशासनाने जी गाडी दुपारी १२ वाजता वर्ध्याहून निघणार होती ती वर्ध्याऐवजी नागपूरहून निघत असल्याचे जाहीर केले. भाजपने जाहीर केलेल्या पत्रकात नागपुरातून ५ हजार कार्यकर्ते घेऊन जाणारी गाडी सकाळी १० वाजता अजनी रेल्वे स्थानकावरून निघेल असे नमूद केले आहे.  प्रत्यक्षात मात्र या रेल्वेची वेळ ही   ७.५० अशी होती. रेल्वे प्रशासनाने नियोजित वेळेनुसार ती रेल्वे मुंबईकडे मार्गस्थ केली. यावेळी भाजपचे केवळ ३० कार्यकर्ते स्थानकात हजर होते. 

आयआरसीटीसीने भाजपला ७.५० ची वेळ दिली होती. परंतु समन्वयाअभावी संभ्रम निर्माण झाला आणि कार्यकत्यांना १० ची वेळ समजली. रेल्वेने ठरवून दिलेल्या वेळेनुसार ही गाडी रवाना केली. अ‍ॅडजेस्टमेंट म्हणून वर्ध्याहून जी स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार होती तीसुद्धा नागपूरहून पाठवण्यात येणार होती. ती गाडी आता वर्ध्याला न पाठवता नागपूरहून सोडण्यात आली.कुशकिशोर मिश्रावरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकमध्यरेल्वे नागपूर विभाग. 

टॅग्स :BJPभाजपा