शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

नागपूर भाजप कार्यकर्त्यांची रेल्वेगाडी चुकली; वेळेबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 12:53 IST

मुंबई येथे भाजपच्या वर्धापन दिनासाठी नागपूरहून निघणाऱ्या रेल्वेगाडीच्या वेळेबाबत संभ्रम झाल्याने ही गाडी केवळ ३० कार्यकर्ते घेऊन नागपुरातून सकाळी रवाना झाली.

ठळक मुद्देमुख्य व अजनी रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांची गर्दीभाजपाच्या प्रसिद्धीपत्रकात १० ची वेळ नमूद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मुंबई येथे भाजपच्या वर्धापन दिनासाठी नागपूरहून निघणाऱ्या रेल्वेगाडीच्या वेळेबाबत संभ्रम झाल्याने ही गाडी केवळ ३० कार्यकर्ते घेऊन नागपुरातून सकाळी रवाना झाली. वेळेबाबत रेल्वे प्रशासनात संभ्रम झाल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भाजपाने मुंबईसाठी आयआरसीटीसी कडे नागपूर-मुंबई अशी गाडी बुक केली होती. तिची नागपूरहून सुटण्याची वेळ सकाळी ७.५० ची निश्चित करण्यात आली होती. मात्र कार्यकर्त्यांना निरोप देताना भाजपने ती वेळ चुकून १० अशी सांगितल्याने ही गाडी सकाळी उत्साहाने स्टेशनवर लवकर आलेल्या थोड्याफार कार्यकर्त्यांना घेऊन रवाना झाली. गाडी निघाल्याने भाजपा कार्यकर्त्यांत गोंधळ उडाला. या गोंधळाला सोडवण्यासाठी मग रेल्वे प्रशासनाने जी गाडी दुपारी १२ वाजता वर्ध्याहून निघणार होती ती वर्ध्याऐवजी नागपूरहून निघत असल्याचे जाहीर केले. भाजपने जाहीर केलेल्या पत्रकात नागपुरातून ५ हजार कार्यकर्ते घेऊन जाणारी गाडी सकाळी १० वाजता अजनी रेल्वे स्थानकावरून निघेल असे नमूद केले आहे.  प्रत्यक्षात मात्र या रेल्वेची वेळ ही   ७.५० अशी होती. रेल्वे प्रशासनाने नियोजित वेळेनुसार ती रेल्वे मुंबईकडे मार्गस्थ केली. यावेळी भाजपचे केवळ ३० कार्यकर्ते स्थानकात हजर होते. 

आयआरसीटीसीने भाजपला ७.५० ची वेळ दिली होती. परंतु समन्वयाअभावी संभ्रम निर्माण झाला आणि कार्यकत्यांना १० ची वेळ समजली. रेल्वेने ठरवून दिलेल्या वेळेनुसार ही गाडी रवाना केली. अ‍ॅडजेस्टमेंट म्हणून वर्ध्याहून जी स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार होती तीसुद्धा नागपूरहून पाठवण्यात येणार होती. ती गाडी आता वर्ध्याला न पाठवता नागपूरहून सोडण्यात आली.कुशकिशोर मिश्रावरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकमध्यरेल्वे नागपूर विभाग. 

टॅग्स :BJPभाजपा