शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

नागपूर भाजप कार्यकर्त्यांची रेल्वेगाडी चुकली; वेळेबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 12:53 IST

मुंबई येथे भाजपच्या वर्धापन दिनासाठी नागपूरहून निघणाऱ्या रेल्वेगाडीच्या वेळेबाबत संभ्रम झाल्याने ही गाडी केवळ ३० कार्यकर्ते घेऊन नागपुरातून सकाळी रवाना झाली.

ठळक मुद्देमुख्य व अजनी रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांची गर्दीभाजपाच्या प्रसिद्धीपत्रकात १० ची वेळ नमूद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मुंबई येथे भाजपच्या वर्धापन दिनासाठी नागपूरहून निघणाऱ्या रेल्वेगाडीच्या वेळेबाबत संभ्रम झाल्याने ही गाडी केवळ ३० कार्यकर्ते घेऊन नागपुरातून सकाळी रवाना झाली. वेळेबाबत रेल्वे प्रशासनात संभ्रम झाल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भाजपाने मुंबईसाठी आयआरसीटीसी कडे नागपूर-मुंबई अशी गाडी बुक केली होती. तिची नागपूरहून सुटण्याची वेळ सकाळी ७.५० ची निश्चित करण्यात आली होती. मात्र कार्यकर्त्यांना निरोप देताना भाजपने ती वेळ चुकून १० अशी सांगितल्याने ही गाडी सकाळी उत्साहाने स्टेशनवर लवकर आलेल्या थोड्याफार कार्यकर्त्यांना घेऊन रवाना झाली. गाडी निघाल्याने भाजपा कार्यकर्त्यांत गोंधळ उडाला. या गोंधळाला सोडवण्यासाठी मग रेल्वे प्रशासनाने जी गाडी दुपारी १२ वाजता वर्ध्याहून निघणार होती ती वर्ध्याऐवजी नागपूरहून निघत असल्याचे जाहीर केले. भाजपने जाहीर केलेल्या पत्रकात नागपुरातून ५ हजार कार्यकर्ते घेऊन जाणारी गाडी सकाळी १० वाजता अजनी रेल्वे स्थानकावरून निघेल असे नमूद केले आहे.  प्रत्यक्षात मात्र या रेल्वेची वेळ ही   ७.५० अशी होती. रेल्वे प्रशासनाने नियोजित वेळेनुसार ती रेल्वे मुंबईकडे मार्गस्थ केली. यावेळी भाजपचे केवळ ३० कार्यकर्ते स्थानकात हजर होते. 

आयआरसीटीसीने भाजपला ७.५० ची वेळ दिली होती. परंतु समन्वयाअभावी संभ्रम निर्माण झाला आणि कार्यकत्यांना १० ची वेळ समजली. रेल्वेने ठरवून दिलेल्या वेळेनुसार ही गाडी रवाना केली. अ‍ॅडजेस्टमेंट म्हणून वर्ध्याहून जी स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार होती तीसुद्धा नागपूरहून पाठवण्यात येणार होती. ती गाडी आता वर्ध्याला न पाठवता नागपूरहून सोडण्यात आली.कुशकिशोर मिश्रावरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकमध्यरेल्वे नागपूर विभाग. 

टॅग्स :BJPभाजपा