शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

Nagpur: भारत राष्ट्र समिती सर्व निवडणुका लढणार, ज्ञानेश वाकुडकर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 21:28 IST

Nagpur: तेलंगणाचे मुख्यमंत्री के .चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष येत्या काळात महाराष्ट्रातही लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदेसह सर्व निवडणुका लढविणार आहे,

नागपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के .चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष येत्या काळात महाराष्ट्रातही लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदेसह सर्व निवडणुका लढविणार आहे, अशी घोषणा भारत राष्ट्र समितीचे पूर्व विदर्भ समन्वयक ज्ञानेश वाकुडकर यांनी केली.

भारत राष्ट्र समितीची विभागीय नियोजन बैठक रविभवन येथे रविवारी पार पडली. अध्यक्षस्थानी ज्ञानेश वाकुडकर होते. प्रमुख वक्ते म्हणून माजी आमदार दीपक आत्राम, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार वसंत बोंडे, दगडू पडिले, नागपूर जिल्हा समन्वयक रविकांत खोब्रागडे, मनिष नांदे (वर्धा), अजय खानोलकर (गोंदिया), मुरलीधर भर्रे (भंडारा), वमशिकृष्ण अरकिल्ला (चंद्रपूर) आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना वाकुडकर म्हणाले, शेतकऱ्याला कुठलीही जात, पंथ,धर्म, भाषा नसते. आमचा पक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जाईल. शेतकऱ्यांचे कल्याण हाच आमचा मुख्य अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बीआरएसने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला समर्थन दिले आहे. बहुतांश विदर्भवाद्यांनी या पक्षाला समर्तन दिले असल्याचा दावाही वाकुडकर यांनी केला. संचालन डॉ. नीलेश वानखेडे यांनी केले. पक्षाच्या बैठकीला बाबाराव मस्के, सागर बत्तुलवार, नाना चव्हाण, ॲड. संतोष कुळमेथे, नीलकंठ काचेवार, किशोर उपासे, दयाराम सहारे, प्रशांत तागडे, बबनराव धुर्वे, नरेश पवनी, आकाशपुरी मुल्तानी, सतीश मडावी, अतुल कांबळे, ब्रजभूषण बैस, प्रशांत ढोले, अजय दारल, राहुल मुन, चेतन काकडे, आकाश सुखदेवे, नंदू मून, अनिलकुमार नागबौद्ध, गुणवंत सोमकुंवर, नीलेश लोखंडे, पंकज भालेराव, सूरज चिकटे, प्रा. रमेश पिसे आदी उपस्थित होते.

तेलंगणात शेतकरी आत्महत्या नाहीततेलंगणा हे नवे राज्य अस्तित्वात आले असले तरी तेथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीत. तेथील राव सरकारने शेतकरी कल्याणाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत, असे रविकांत खोब्रागडे यांनी सांगितले. माजी आमदार वसंत बोंडे यांनी तेलंगणाची प्रगती पाहून आपण भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश घेतल्याचे सांगितले. 

टॅग्स :nagpurनागपूरElectionनिवडणूक