शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

Nagpur: भारत राष्ट्र समिती सर्व निवडणुका लढणार, ज्ञानेश वाकुडकर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 21:28 IST

Nagpur: तेलंगणाचे मुख्यमंत्री के .चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष येत्या काळात महाराष्ट्रातही लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदेसह सर्व निवडणुका लढविणार आहे,

नागपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के .चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष येत्या काळात महाराष्ट्रातही लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदेसह सर्व निवडणुका लढविणार आहे, अशी घोषणा भारत राष्ट्र समितीचे पूर्व विदर्भ समन्वयक ज्ञानेश वाकुडकर यांनी केली.

भारत राष्ट्र समितीची विभागीय नियोजन बैठक रविभवन येथे रविवारी पार पडली. अध्यक्षस्थानी ज्ञानेश वाकुडकर होते. प्रमुख वक्ते म्हणून माजी आमदार दीपक आत्राम, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार वसंत बोंडे, दगडू पडिले, नागपूर जिल्हा समन्वयक रविकांत खोब्रागडे, मनिष नांदे (वर्धा), अजय खानोलकर (गोंदिया), मुरलीधर भर्रे (भंडारा), वमशिकृष्ण अरकिल्ला (चंद्रपूर) आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना वाकुडकर म्हणाले, शेतकऱ्याला कुठलीही जात, पंथ,धर्म, भाषा नसते. आमचा पक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जाईल. शेतकऱ्यांचे कल्याण हाच आमचा मुख्य अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बीआरएसने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला समर्थन दिले आहे. बहुतांश विदर्भवाद्यांनी या पक्षाला समर्तन दिले असल्याचा दावाही वाकुडकर यांनी केला. संचालन डॉ. नीलेश वानखेडे यांनी केले. पक्षाच्या बैठकीला बाबाराव मस्के, सागर बत्तुलवार, नाना चव्हाण, ॲड. संतोष कुळमेथे, नीलकंठ काचेवार, किशोर उपासे, दयाराम सहारे, प्रशांत तागडे, बबनराव धुर्वे, नरेश पवनी, आकाशपुरी मुल्तानी, सतीश मडावी, अतुल कांबळे, ब्रजभूषण बैस, प्रशांत ढोले, अजय दारल, राहुल मुन, चेतन काकडे, आकाश सुखदेवे, नंदू मून, अनिलकुमार नागबौद्ध, गुणवंत सोमकुंवर, नीलेश लोखंडे, पंकज भालेराव, सूरज चिकटे, प्रा. रमेश पिसे आदी उपस्थित होते.

तेलंगणात शेतकरी आत्महत्या नाहीततेलंगणा हे नवे राज्य अस्तित्वात आले असले तरी तेथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीत. तेथील राव सरकारने शेतकरी कल्याणाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत, असे रविकांत खोब्रागडे यांनी सांगितले. माजी आमदार वसंत बोंडे यांनी तेलंगणाची प्रगती पाहून आपण भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश घेतल्याचे सांगितले. 

टॅग्स :nagpurनागपूरElectionनिवडणूक