शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: भारत राष्ट्र समिती सर्व निवडणुका लढणार, ज्ञानेश वाकुडकर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 21:28 IST

Nagpur: तेलंगणाचे मुख्यमंत्री के .चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष येत्या काळात महाराष्ट्रातही लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदेसह सर्व निवडणुका लढविणार आहे,

नागपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के .चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष येत्या काळात महाराष्ट्रातही लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदेसह सर्व निवडणुका लढविणार आहे, अशी घोषणा भारत राष्ट्र समितीचे पूर्व विदर्भ समन्वयक ज्ञानेश वाकुडकर यांनी केली.

भारत राष्ट्र समितीची विभागीय नियोजन बैठक रविभवन येथे रविवारी पार पडली. अध्यक्षस्थानी ज्ञानेश वाकुडकर होते. प्रमुख वक्ते म्हणून माजी आमदार दीपक आत्राम, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार वसंत बोंडे, दगडू पडिले, नागपूर जिल्हा समन्वयक रविकांत खोब्रागडे, मनिष नांदे (वर्धा), अजय खानोलकर (गोंदिया), मुरलीधर भर्रे (भंडारा), वमशिकृष्ण अरकिल्ला (चंद्रपूर) आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना वाकुडकर म्हणाले, शेतकऱ्याला कुठलीही जात, पंथ,धर्म, भाषा नसते. आमचा पक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जाईल. शेतकऱ्यांचे कल्याण हाच आमचा मुख्य अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बीआरएसने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला समर्थन दिले आहे. बहुतांश विदर्भवाद्यांनी या पक्षाला समर्तन दिले असल्याचा दावाही वाकुडकर यांनी केला. संचालन डॉ. नीलेश वानखेडे यांनी केले. पक्षाच्या बैठकीला बाबाराव मस्के, सागर बत्तुलवार, नाना चव्हाण, ॲड. संतोष कुळमेथे, नीलकंठ काचेवार, किशोर उपासे, दयाराम सहारे, प्रशांत तागडे, बबनराव धुर्वे, नरेश पवनी, आकाशपुरी मुल्तानी, सतीश मडावी, अतुल कांबळे, ब्रजभूषण बैस, प्रशांत ढोले, अजय दारल, राहुल मुन, चेतन काकडे, आकाश सुखदेवे, नंदू मून, अनिलकुमार नागबौद्ध, गुणवंत सोमकुंवर, नीलेश लोखंडे, पंकज भालेराव, सूरज चिकटे, प्रा. रमेश पिसे आदी उपस्थित होते.

तेलंगणात शेतकरी आत्महत्या नाहीततेलंगणा हे नवे राज्य अस्तित्वात आले असले तरी तेथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीत. तेथील राव सरकारने शेतकरी कल्याणाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत, असे रविकांत खोब्रागडे यांनी सांगितले. माजी आमदार वसंत बोंडे यांनी तेलंगणाची प्रगती पाहून आपण भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश घेतल्याचे सांगितले. 

टॅग्स :nagpurनागपूरElectionनिवडणूक