शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नागपूर झाले ‘रॉकेलमुक्त’, सरकारी धोरणामुळे केरोसीचा कोटा गेला परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 21:49 IST

वाढत्या प्रदूषणाच्या स्तराला आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने निरनिराळ्या योजना सादर केल्या आहेत. त्याच अनुषंगाने, २०३० पर्यंत संपूर्ण भारत पेट्रोल-डिझेल-केरोसीन मुक्त करण्याचा निर्धार विद्यमान सरकारने केला आहे. मात्र, नागपूरच्या काही अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे नागपूर ऑगस्टपासूनच ‘रॉकेलमुक्त’ झाल्याची स्थिती निर्माण झाली असून, विक्रेत्यांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देविक्रेते संकटात, पर्यायी व्यवसाय उपलब्ध करवून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढत्या प्रदूषणाच्या स्तराला आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने निरनिराळ्या योजना सादर केल्या आहेत. त्याच अनुषंगाने, २०३० पर्यंत संपूर्ण भारत पेट्रोल-डिझेल-केरोसीन मुक्त करण्याचा निर्धार विद्यमान सरकारने केला आहे. मात्र, नागपूरच्या काही अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे नागपूर ऑगस्टपासूनच ‘रॉकेलमुक्त’ झाल्याची स्थिती निर्माण झाली असून, विक्रेत्यांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे.या संबंधी धोरणाबाबत केरोसीन विक्रेत्या संघटना एल्गार पुकारण्याच्या तयारीत असून, सरकारने केरोसीनची विक्री पूर्णत: बंद करण्याचा निर्णय जाहीर करावा आणि केरोसीन विक्रेत्यांची उपासमार टाळण्यासाठी, त्यांना नवा पर्यायी व्यवसाय अगर १९६६ पासून असलेल्या केरोसीन विक्रीच्या परवान्यांना दुसऱ्या व्यवसायासाठी परिवर्तित करवून देण्याची मागणी विदर्भ रास्त भाव दुकानदार / केरोसीन विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे. यासोबतच, केरळ व तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर केरोसीन विक्रेत्यांना मासिक मानधन देण्याची प्रक्रिया अमलात आणली तर विक्रेत्यांवर निर्माण झालेले संकट निस्तरता येईल, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सरकारने उज्ज्वला योजना अमलात आणली आणि त्याअनुषंगाने, केरोसीन विक्रीवर मर्यादा आणली. केंद्राच्याच या योजनेंतर्गत प्रत्येक रेशनकार्डधारक नागरिकला चार लिटर रॉकेल महिन्याचे देण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्रात या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नसल्याचेही दिसून येते. त्यामुळेच, २०१५ पूर्वी प्रत्येक परवानाधारक विक्रेत्याला मिळणारा कमाल दहा हजार लिटर विक्रीचा कोटा आता चारशे ते एक हजार लिटरपर्यंत घसरला आहे. यातून मिळणारी कमाई प्रति दिनी चारशे ते आठशे रुपये इतकी असल्याने, सर्व खर्च वजा जाता मासिक कमाई शिल्लक राहत नाही. यामुळे, अनेक विक्रेत्यांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले असून, यात संबंधित मंत्र्यांनी हस्तक्षेप करावा आणि विक्रेत्यांना दरमहा मानधन देण्यासोबतच, पर्यायी रोजगार आणि प्रत्येक महिन्याला प्रति कार्डधारकाला चार लिटर केरोसीन देण्याची मागणी पूर्ण करण्याचे आवाहन संजय पाटील व नितीन कुकडे यांनी केले आहे.मुदत वाढवून घेण्याला झाला उशीर!केरोसीनचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या निश्चित तारखेनंतर परवानाधारक विक्रेत्यांना केरोसीन देणे बंद करतात. खापरी व बोरखेडी येथील डेपोमधून संबंधित कंपनीने केरोसीनची उचलच केली नाही. यात काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. महिन्याच्या २५ तारखेपर्यंत संबंधित कंपनीला केरोसीनची उचल करता येते. २५ जुलैनंतर लगेचच शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाकडे मुदतवाढीचे पत्र देणे अपेक्षित होते. मात्र, हे पत्र उशिराने देण्यात आल्याने मुदतवाढ मिळाली नाही आणि आलेला केरोसीनचा कोटा परत केल्याचा आरोप केरोसीन विक्रेता संघटनेने केला आहे. त्यामुळे, पुढचे दोन महिने तरी नागपूरकरांना केरोसीन उपलब्ध होणार असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :nagpurनागपूर