शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

हिरवळीत नागपूर माघारले : माझी वसुंधरात २८ वा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 23:38 IST

Nagpur back in the green नागपूर शहराचा एके काळी हिरवळीच्या बाबतीत देशातील टॉप १० शहरात समावेश होता. परंतु मागील काही वर्षात शहरातील परिस्थिती बदलली आहे. राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानात नागपूर २८ व्या क्रमांकावर घसरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहराचा एके काळी हिरवळीच्या बाबतीत देशातील टॉप १० शहरात समावेश होता. परंतु मागील काही वर्षात शहरातील परिस्थिती बदलली आहे. राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानात नागपूर २८ व्या क्रमांकावर घसरले आहे. गेल्या काही वर्षात शहरात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे १५०० गुणापैकी फक्त १३० गुण मिळाले आहे.

अभियानात ३९५ शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, ३०४ पंचायत समित्यांनी सहभाग घेतला. ऑक्टोबरमध्ये या अभियानाला सुरुवात झाली. ५ जूनला याचा निकाल जाहीर करण्यात आला. यात ११२७ गुणासह ठाणे पहिल्या क्रमांकावर आहे. नवीन मुंबईला ९७६ तर ग्रेटर मुंबईला ९५० गुण मिळाले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या अभियानाची घोषणा केली होती. पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन मिळावे व उपाययोजना कराव्यात यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. पाणी बचतीसाठी ४००गुण, पृथ्वीसाठी ६००, हवा १००, उर्जा १०० तर संवर्धन यासाठी ३००गुण गृहीत धरण्यात आले होते. वृक्षारोपन, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक, रेन वॉटर हावेंस्टींग या घटकांचाही विचार करण्यात आला. त्यानुसार राज्यातर्फे एकूण गुण घोषित करण्यात आले. वर्गवारीनुसार किती गुण मिळाले. याची माहिती मिळाली नाही. मनपा यात का माघारली अशी विचारणा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असता क्रमांकात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येईल. असे सांगण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूर