शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात संत्र्यांची आवक वाढली : भाव आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:07 IST

कळमना बाजारात आंबिया संत्र्यांची आवक वाढली असून, भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असून, १२ ते २२ हजार रुपये टन भावात विक्री सुरू आहे. मात्र किरकोळ बाजारात दर्जानुसार २५ ते ५० रुपये डझन भाव आहेत. यावर्षी आवकही योग्य असून, भावही परवडणारे आहेत.

ठळक मुद्दे यंदा आंबिया बार गोड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना बाजारात आंबिया संत्र्यांची आवक वाढली असून, भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असून, १२ ते २२ हजार रुपये टन भावात विक्री सुरू आहे. मात्र किरकोळ बाजारात दर्जानुसार २५ ते ५० रुपये डझन भाव आहेत. यावर्षी आवकही योग्य असून, भावही परवडणारे आहेत.कळमना फळ बाजार अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी सांगितले की, यावर्षी संत्र्यांच्या हंगामात कळमन्यात पाय ठेवायला जागा राहणार नाही, असे पीक येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. पण अनेक वर्षांत पहिल्यांदाच व्यापाऱ्यांनी शेतात जाऊन शेतकऱ्यांकडून संत्रा खरेदी केला. त्यामुळे यावर्षी हव्या त्या प्रमाणात संत्रा कळमन्यात आला नाही. त्याचे कारणही योग्य आहे. यामुळे शेतकऱ्यांना अडत आणि मालभाड्यापासून सुटका मिळाली. यंदाचा आंबिया संत्रा गोड आहे. त्यामुळे ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. दररोज १५० ते २०० टेम्पो (एक टेम्पो दोन टनापर्यंत) संत्र्यांची आवक आहे. पुढे वाढण्याची शक्यता आहे. आवक मुख्यत्वे कळमेश्वर, नरखेड, काटोल, कोंढाळी, कारंजा येथून सुरू आहे. संत्रा कळमन्यातून दक्षिण भारतात विक्रीस जातो.नागपुरी संत्री नागपूर जिल्हा, अमरावती जिल्हा आणि मध्य प्रदेशाच्या छिंदवाडा या भागात जास्त होतो. याशिवाय नागपुरी संत्र्याचे पीक देशाच्या अन्य राज्यांमध्येही घेतले जाते. याचे एकूण क्षेत्रफळ जवळपास चार लाख हेक्टर आहे.डोंगरे म्हणाले, थंडी वाढताच मृगबहाराप्रमाणेच आंबिया बारचा संत्रा गोड होतो. या संत्र्यांची आवक जानेवारीपर्यंत सुरू राहील. संत्र्याच्या तुलनेत मोसंबीची आवक कमीच आहे. थंडीच्या दिवसात मोसंबीच्या रसाला जास्त मागणी असते. त्यामुळे खरेदी वाढली आहे. सध्या ४० ते ५० टेम्पो कळमन्यात येत असून, भाव २२ ते २८ हजार रुपये टन आहेत. किरकोळमध्ये जास्त भावात खरेदी करावी लागत आहे.

टॅग्स :Orange Festivalआॅरेंज फेस्टिव्हलnagpurनागपूर