शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नागपुरात संत्र्यांची आवक वाढली : भाव आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:07 IST

कळमना बाजारात आंबिया संत्र्यांची आवक वाढली असून, भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असून, १२ ते २२ हजार रुपये टन भावात विक्री सुरू आहे. मात्र किरकोळ बाजारात दर्जानुसार २५ ते ५० रुपये डझन भाव आहेत. यावर्षी आवकही योग्य असून, भावही परवडणारे आहेत.

ठळक मुद्दे यंदा आंबिया बार गोड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना बाजारात आंबिया संत्र्यांची आवक वाढली असून, भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असून, १२ ते २२ हजार रुपये टन भावात विक्री सुरू आहे. मात्र किरकोळ बाजारात दर्जानुसार २५ ते ५० रुपये डझन भाव आहेत. यावर्षी आवकही योग्य असून, भावही परवडणारे आहेत.कळमना फळ बाजार अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी सांगितले की, यावर्षी संत्र्यांच्या हंगामात कळमन्यात पाय ठेवायला जागा राहणार नाही, असे पीक येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. पण अनेक वर्षांत पहिल्यांदाच व्यापाऱ्यांनी शेतात जाऊन शेतकऱ्यांकडून संत्रा खरेदी केला. त्यामुळे यावर्षी हव्या त्या प्रमाणात संत्रा कळमन्यात आला नाही. त्याचे कारणही योग्य आहे. यामुळे शेतकऱ्यांना अडत आणि मालभाड्यापासून सुटका मिळाली. यंदाचा आंबिया संत्रा गोड आहे. त्यामुळे ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. दररोज १५० ते २०० टेम्पो (एक टेम्पो दोन टनापर्यंत) संत्र्यांची आवक आहे. पुढे वाढण्याची शक्यता आहे. आवक मुख्यत्वे कळमेश्वर, नरखेड, काटोल, कोंढाळी, कारंजा येथून सुरू आहे. संत्रा कळमन्यातून दक्षिण भारतात विक्रीस जातो.नागपुरी संत्री नागपूर जिल्हा, अमरावती जिल्हा आणि मध्य प्रदेशाच्या छिंदवाडा या भागात जास्त होतो. याशिवाय नागपुरी संत्र्याचे पीक देशाच्या अन्य राज्यांमध्येही घेतले जाते. याचे एकूण क्षेत्रफळ जवळपास चार लाख हेक्टर आहे.डोंगरे म्हणाले, थंडी वाढताच मृगबहाराप्रमाणेच आंबिया बारचा संत्रा गोड होतो. या संत्र्यांची आवक जानेवारीपर्यंत सुरू राहील. संत्र्याच्या तुलनेत मोसंबीची आवक कमीच आहे. थंडीच्या दिवसात मोसंबीच्या रसाला जास्त मागणी असते. त्यामुळे खरेदी वाढली आहे. सध्या ४० ते ५० टेम्पो कळमन्यात येत असून, भाव २२ ते २८ हजार रुपये टन आहेत. किरकोळमध्ये जास्त भावात खरेदी करावी लागत आहे.

टॅग्स :Orange Festivalआॅरेंज फेस्टिव्हलnagpurनागपूर