शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात संतप्त नागरिकांनी केला शांतिनगर पोलीस ठाण्याचा घेराव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:24 IST

शांतिनगर येथे प्रवीण ऊर्फ शशी गायधने याची मारहाण करून हत्या करणारा गुन्हेगार आणि त्याच्या कुटुंबीयांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करीत बुधवारी रात्री संतप्त नागरिकांनी शांतिनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला.

ठळक मुद्देशशी गायधने हत्याकांड प्रकरण 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शांतिनगर येथे प्रवीण ऊर्फ शशी गायधने याची मारहाण करून हत्या करणारा गुन्हेगार आणि त्याच्या कुटुंबीयांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करीत बुधवारी रात्री संतप्त नागरिकांनी शांतिनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला.गेल्या १७ फेब्रुवारी रोजी रात्री शांतिनगर येथील नालंदा चौकात गुन्हेगार ओमप्रकाश ऊर्फ भुऱ्या नागपुरे याने त्याचे वडील लीलाधर आमि भाऊ कुंदनच्या मदतीने शशीची हत्या केली होती. या घटनेपासून परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. भुऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने नागरिक दुखावलेले होते. ते पहिल्या दिवसापासूनच आरोपीला पोलिसांचे संरक्षण असल्याचा आरोप करीत आहेत. शांतिनगर येथील नागरिकांना आरोपी पोलीस कोठडीत आहे तरीही त्याला घरून जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच त्याच्याशी फार सक्तीनेही वागले जात नसल्याचे म्हणणे आहे. याची माहिती होताच शांतिनगर येथील नागरिक बुधवारी रात्री ठाण्यावर धडकले. त्यांनी ठाण्याला घेराव घालून ठाणेदार एम.डी. शेख यांना निवेदन सादर केले. नागरिकांचे म्हणणे आहे की, पोलीस आरोपींशी फार नरमाईने वागत आहे. आरोपींना परिसरातील दबंग लोकांचे संरक्षण प्राप्त आहे.शशीच्या हत्येनंतर शांतिनगर परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. नागरिक प्रचंड संतापले आहेत. मंगळवारी निरीक्षक एम.डी. शेख यांची बदलीही करण्यात आली. यानंतरही नागरिकांमध्ये पोलिसांविरुद्ध असंतोष कायम आहे. शशी कुटुंबातील एकुलता एक होता. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबात वृद्ध आई, पत्नी आणि दोन वर्षाचा मुलगा आहे.

टॅग्स :agitationआंदोलनPolice Stationपोलीस ठाणे