शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

नागपूर-अमरावती महामार्गावर धावत्या कंटेनरमधील साहित्य पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 11:42 IST

नागपूर-अमरावती महामार्गावर कोंढाळीनजिक चोरट्यांनी गुरुवारी दुपारी धावत्या कंटेनरवर चढून त्यातील साहित्य लंपास केले.

ठळक मुद्देअडीच लाखांचा ऐवज लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूर-अमरावती महामार्गावर कोंढाळीनजिक चोरट्यांनी गुरुवारी दुपारी धावत्या कंटेनरवर चढून त्यातील साहित्य लंपास केले. चालक चंद्रपाल माधवसिंग ठाकूर (३७, रा. चौसिंगी, ता. बहाव, जिल्हा आग्रा) व क्लिनर रोहित राममुरत पासवान (१८, रा. आलेमहू, ता. फुलपूर जिल्हा अलाहाबाद) हे वडधामना येथील टीसीआय एक्स्प्रेस येथून कापड, बनारसी साड्या, विद्युत उपकरणे यासह अन्य साहित्याचे पार्सल जीजे-०१/ईटी-२७४५ क्रमांकाच्या कंटेनरमध्ये घेऊन गांधीनगरकडे निघाले होते. कोंढाळी परिसरात या कंटेनरमधील साहित्य लंपास केले जात असल्याची माहिती ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकचालकाने कंटेनरचालकास दिली. त्यामुळे चालकाने खुर्सापार मदत केंद्राजवळ कंटेनर थांबवून तपासणी केली असता, त्यातील पार्सल चोरीला गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. परिणामी, त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायंकाळपर्यंत या कंटेनरमधील पार्सल खाली काढून त्यांची मोजणी केली. त्यात २ लाख ६३ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास ठाणेदार पुरुषोत्तम अहेरकर करीत आहेत.घटनास्थळाबाबत संभ्रमचोरट्यांनी धावत्या कंटेनरमधून साहित्य चोरून नेले. ही बाब कंटेनरचालकास कोंढाळी परिसरात निदर्शनास आली. चोरट्यांनी साहित्य नेमके कोणत्या शिवारातून पळविले, याबाबत चालकासही माहीत नाही. त्यामुळे घटनास्थळाबाबत पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यात चोरांनी कंटेनरमधील नेमके कोणते पार्सल चोरून नेले आणि त्यांची किंमत किती, हेही स्पष्ट झाले नाही. नागपूर-अमरावती महामार्ग २४ तास वर्दळीचा असताना ही घटना घडली. त्यामुळे या घटनेबाबत नवल व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा