शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नागपूर विमानतळ; पुन्हा करावे लागणार धावपट्टीचे ‘रि-कार्पेटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 08:48 IST

सन २०१४ पूर्वी धावपट्टीची स्थिती खराब झाली होती. त्याच्याशी जुळलेल्या तक्रारी येत होत्या. दबाव वाढल्यानंतर धावपट्टीच्या रि-कॉर्पेटिंगचे काम सुरू करण्यात आले. जून २०२० जाताच धावपट्टीवर थर टाकण्याच्या कामाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत.

ठळक मुद्देसहा वर्षांपूर्वी धावपट्टीवर दिला होता थर

वसीम कुरैशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर नव्याने थर (रि-कार्पेटिंग) द्यावा लागणार आहे. सहा वर्षांपूर्वी धावपट्टीवर थर दिला होता. पण आता कालावधी संपल्याने हे काम पुन्हा करावे लागणार आहे. लॉकडाऊनमुळे धावपट्टीवर विमानांची ये-जा कमी असल्याने आता धावपट्टीवर थर दिल्याविना काम चालणार आहे.उल्लेखनीय असे की, जुलै २०१३ मध्ये धावपट्टीच्या रि-कार्पेटिंगचे काम सुरू झाले होते. जून २०१४ मध्ये काम पूर्ण झाले. या कामासाठी मिहान इंडिया लिमिटेडने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला (एएआय) २७.५ कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. एएआयने या कामाचे कंत्राट नागपुरातील गुरुबक्शानी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले होते. कंत्राटदार कंपनीचे डीपीएल (डिफेक्ट लायबिलिटी पीरियड) तीन वर्षांचे होते. अर्थात या तीन वर्षांत धावपट्टी खराब झाल्यास दुरुस्ती या कंपनीला करावी लागणार होती. जून २०१७ नंतर कंपनीने दुरुस्तीचे काम केले नाही.गेल्या दोन वर्षांपासून नागपुरातून काही विमान कंपन्यांनी संचालन बंद केले आहे आणि उपलब्ध विमान कंपन्यांची विमाने मर्यादित संख्येत आहेत. लॉकडाऊननंतर उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. सध्या काही विमाने सुरू झाली आहेत. पण त्यामुळे विमानतळाला महसूल मिळेल एवढी विमानांची संख्या नाही. अशा स्थितीत मोठ्या गुंतवणुकीतून धावपट्टीवर थर टाकण्याचे काम विमानतळ व्यवस्थापनाला आव्हानात्मक ठरणार आहे.सन २०१४ पूर्वी धावपट्टीची स्थिती खराब झाली होती. त्याच्याशी जुळलेल्या तक्रारी येत होत्या. दबाव वाढल्यानंतर धावपट्टीच्या रि-कॉर्पेटिंगचे काम सुरू करण्यात आले. जून २०२० जाताच धावपट्टीवर थर टाकण्याच्या कामाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. कंत्राटदार कंपनीच्या देखरेखीची जबाबदारी तीन वर्षांपूर्वीच संपली आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुढील एक वा दोन वर्षे धावपट्टीच्या रि-कार्पेटिंगचे काम सुरू होण्याची शक्यता कमीच असल्याचे सूत्रांनी सांगितले.आवश्यकता भासल्यास योग्य निर्णय घेणारसध्या धावपट्टीचा थर उत्तम स्थितीत आहे. आवश्यकता भासल्यास धावपट्टीचे रि-कार्पेटिंग करण्याच्या दिशेने योग्य पावले उचलण्यात येईल.आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल. 

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर