शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळ; पुन्हा करावे लागणार धावपट्टीचे ‘रि-कार्पेटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 08:48 IST

सन २०१४ पूर्वी धावपट्टीची स्थिती खराब झाली होती. त्याच्याशी जुळलेल्या तक्रारी येत होत्या. दबाव वाढल्यानंतर धावपट्टीच्या रि-कॉर्पेटिंगचे काम सुरू करण्यात आले. जून २०२० जाताच धावपट्टीवर थर टाकण्याच्या कामाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत.

ठळक मुद्देसहा वर्षांपूर्वी धावपट्टीवर दिला होता थर

वसीम कुरैशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर नव्याने थर (रि-कार्पेटिंग) द्यावा लागणार आहे. सहा वर्षांपूर्वी धावपट्टीवर थर दिला होता. पण आता कालावधी संपल्याने हे काम पुन्हा करावे लागणार आहे. लॉकडाऊनमुळे धावपट्टीवर विमानांची ये-जा कमी असल्याने आता धावपट्टीवर थर दिल्याविना काम चालणार आहे.उल्लेखनीय असे की, जुलै २०१३ मध्ये धावपट्टीच्या रि-कार्पेटिंगचे काम सुरू झाले होते. जून २०१४ मध्ये काम पूर्ण झाले. या कामासाठी मिहान इंडिया लिमिटेडने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला (एएआय) २७.५ कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. एएआयने या कामाचे कंत्राट नागपुरातील गुरुबक्शानी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले होते. कंत्राटदार कंपनीचे डीपीएल (डिफेक्ट लायबिलिटी पीरियड) तीन वर्षांचे होते. अर्थात या तीन वर्षांत धावपट्टी खराब झाल्यास दुरुस्ती या कंपनीला करावी लागणार होती. जून २०१७ नंतर कंपनीने दुरुस्तीचे काम केले नाही.गेल्या दोन वर्षांपासून नागपुरातून काही विमान कंपन्यांनी संचालन बंद केले आहे आणि उपलब्ध विमान कंपन्यांची विमाने मर्यादित संख्येत आहेत. लॉकडाऊननंतर उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. सध्या काही विमाने सुरू झाली आहेत. पण त्यामुळे विमानतळाला महसूल मिळेल एवढी विमानांची संख्या नाही. अशा स्थितीत मोठ्या गुंतवणुकीतून धावपट्टीवर थर टाकण्याचे काम विमानतळ व्यवस्थापनाला आव्हानात्मक ठरणार आहे.सन २०१४ पूर्वी धावपट्टीची स्थिती खराब झाली होती. त्याच्याशी जुळलेल्या तक्रारी येत होत्या. दबाव वाढल्यानंतर धावपट्टीच्या रि-कॉर्पेटिंगचे काम सुरू करण्यात आले. जून २०२० जाताच धावपट्टीवर थर टाकण्याच्या कामाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. कंत्राटदार कंपनीच्या देखरेखीची जबाबदारी तीन वर्षांपूर्वीच संपली आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुढील एक वा दोन वर्षे धावपट्टीच्या रि-कार्पेटिंगचे काम सुरू होण्याची शक्यता कमीच असल्याचे सूत्रांनी सांगितले.आवश्यकता भासल्यास योग्य निर्णय घेणारसध्या धावपट्टीचा थर उत्तम स्थितीत आहे. आवश्यकता भासल्यास धावपट्टीचे रि-कार्पेटिंग करण्याच्या दिशेने योग्य पावले उचलण्यात येईल.आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल. 

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर