शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळ; पुन्हा करावे लागणार धावपट्टीचे ‘रि-कार्पेटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 08:48 IST

सन २०१४ पूर्वी धावपट्टीची स्थिती खराब झाली होती. त्याच्याशी जुळलेल्या तक्रारी येत होत्या. दबाव वाढल्यानंतर धावपट्टीच्या रि-कॉर्पेटिंगचे काम सुरू करण्यात आले. जून २०२० जाताच धावपट्टीवर थर टाकण्याच्या कामाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत.

ठळक मुद्देसहा वर्षांपूर्वी धावपट्टीवर दिला होता थर

वसीम कुरैशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर नव्याने थर (रि-कार्पेटिंग) द्यावा लागणार आहे. सहा वर्षांपूर्वी धावपट्टीवर थर दिला होता. पण आता कालावधी संपल्याने हे काम पुन्हा करावे लागणार आहे. लॉकडाऊनमुळे धावपट्टीवर विमानांची ये-जा कमी असल्याने आता धावपट्टीवर थर दिल्याविना काम चालणार आहे.उल्लेखनीय असे की, जुलै २०१३ मध्ये धावपट्टीच्या रि-कार्पेटिंगचे काम सुरू झाले होते. जून २०१४ मध्ये काम पूर्ण झाले. या कामासाठी मिहान इंडिया लिमिटेडने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला (एएआय) २७.५ कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. एएआयने या कामाचे कंत्राट नागपुरातील गुरुबक्शानी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले होते. कंत्राटदार कंपनीचे डीपीएल (डिफेक्ट लायबिलिटी पीरियड) तीन वर्षांचे होते. अर्थात या तीन वर्षांत धावपट्टी खराब झाल्यास दुरुस्ती या कंपनीला करावी लागणार होती. जून २०१७ नंतर कंपनीने दुरुस्तीचे काम केले नाही.गेल्या दोन वर्षांपासून नागपुरातून काही विमान कंपन्यांनी संचालन बंद केले आहे आणि उपलब्ध विमान कंपन्यांची विमाने मर्यादित संख्येत आहेत. लॉकडाऊननंतर उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. सध्या काही विमाने सुरू झाली आहेत. पण त्यामुळे विमानतळाला महसूल मिळेल एवढी विमानांची संख्या नाही. अशा स्थितीत मोठ्या गुंतवणुकीतून धावपट्टीवर थर टाकण्याचे काम विमानतळ व्यवस्थापनाला आव्हानात्मक ठरणार आहे.सन २०१४ पूर्वी धावपट्टीची स्थिती खराब झाली होती. त्याच्याशी जुळलेल्या तक्रारी येत होत्या. दबाव वाढल्यानंतर धावपट्टीच्या रि-कॉर्पेटिंगचे काम सुरू करण्यात आले. जून २०२० जाताच धावपट्टीवर थर टाकण्याच्या कामाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. कंत्राटदार कंपनीच्या देखरेखीची जबाबदारी तीन वर्षांपूर्वीच संपली आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुढील एक वा दोन वर्षे धावपट्टीच्या रि-कार्पेटिंगचे काम सुरू होण्याची शक्यता कमीच असल्याचे सूत्रांनी सांगितले.आवश्यकता भासल्यास योग्य निर्णय घेणारसध्या धावपट्टीचा थर उत्तम स्थितीत आहे. आवश्यकता भासल्यास धावपट्टीचे रि-कार्पेटिंग करण्याच्या दिशेने योग्य पावले उचलण्यात येईल.आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल. 

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर