शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

नागपुरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 20:37 IST

दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच १ जूनपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात अर्ज क्रमांक -१ आणि दुसऱ्या टप्प्यात अर्ज क्रमांक २ भरायचे होते. आतापर्यंत २० हजार २२२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना शाळेत तर सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी १९ केंद्रे बनविण्यात आली आहेत. यावर्षी नागपूर विभागाचा दहावीचा निकालात १८ टक्क्याची घट झाल्याने अकरावीच्या प्रवेशावर रिक्त जागेचे संक ट ओढवणार आहे. यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडण्याची चिन्हे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ठळक मुद्देदहावीचा निकाल घटल्याने रिक्त जागांचे संकट: आतापर्यंत २० हजारावर नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच १ जूनपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात अर्ज क्रमांक -१ आणि दुसऱ्या टप्प्यात अर्ज क्रमांक २ भरायचे होते. आतापर्यंत २० हजार २२२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना शाळेत तर सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी १९ केंद्रे बनविण्यात आली आहेत. यावर्षी नागपूर विभागाचा दहावीचा निकालात १८ टक्क्याची घट झाल्याने अकरावीच्या प्रवेशावर रिक्त जागेचे संक ट ओढवणार आहे. यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडण्याची चिन्हे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.दोन वर्षांपासून शिक्षण विभागाद्वारे निकालापूर्वीच ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा १ जूनपासून प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र पालक निकालाची वाट बघत राहिले. त्यामुळे गेल्या १० दिवसात २०,२२२ विद्यार्थ्यांनीच अर्ज केले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी नोंदणीच्या प्रक्रियेला उशिरा सुरुवात झाली. गेल्यावर्षी विविध ज्युनि. कॉलेजमध्ये ५४,२३० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया घेण्यात आली होती. परंतु शेवटच्या टप्प्यात १७,६१९ जागा रिक्त राहिल्या होत्या.यंदा बोर्डाचा निकाल घसरल्याने ९० टक्के प्रवेश घेणाऱ्यांची संख्या घटली आहे, तर सीबीएसई व आयसीएसई बोर्डाचे विद्यार्थी जास्त आहेत. त्यामुळे शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये बायोफोकलच्या सीट मेरिटच्या हिशेबाने सीबीएसई विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने त्यांचा दबदबा राहणार आहे.सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे इंटर्नल गुण कमी करणारयावर्षी स्टेट बोर्डाचा निकाल कमी लागला. कारण तोंडी परीक्षेचे गुण बोर्डाने बंद केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरली. मात्र सीबीएसई व आयसीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत गुण दिले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत वाढ झाली. सूत्रांच्या मते, मेरिट सूची तयार करताना सीबीएसई व आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्यात येणार नाही.प्रवेश प्रक्रिया अडलीसूत्रांनी सांगितल्यानुसार, शिक्षण विभागाने सीबीएसई व आयसीएसई बोर्डाला पत्र लिहिले आहे. यात तोंडी व लेखी परीक्षेचे गुण वेगवेगळे देण्यास सांगितले आहे. मात्र शिक्षण विभागाला दोन्ही बोर्डाकडून उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया अडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर