शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

नागपुरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 20:37 IST

दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच १ जूनपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात अर्ज क्रमांक -१ आणि दुसऱ्या टप्प्यात अर्ज क्रमांक २ भरायचे होते. आतापर्यंत २० हजार २२२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना शाळेत तर सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी १९ केंद्रे बनविण्यात आली आहेत. यावर्षी नागपूर विभागाचा दहावीचा निकालात १८ टक्क्याची घट झाल्याने अकरावीच्या प्रवेशावर रिक्त जागेचे संक ट ओढवणार आहे. यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडण्याची चिन्हे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ठळक मुद्देदहावीचा निकाल घटल्याने रिक्त जागांचे संकट: आतापर्यंत २० हजारावर नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच १ जूनपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात अर्ज क्रमांक -१ आणि दुसऱ्या टप्प्यात अर्ज क्रमांक २ भरायचे होते. आतापर्यंत २० हजार २२२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना शाळेत तर सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी १९ केंद्रे बनविण्यात आली आहेत. यावर्षी नागपूर विभागाचा दहावीचा निकालात १८ टक्क्याची घट झाल्याने अकरावीच्या प्रवेशावर रिक्त जागेचे संक ट ओढवणार आहे. यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडण्याची चिन्हे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.दोन वर्षांपासून शिक्षण विभागाद्वारे निकालापूर्वीच ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा १ जूनपासून प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र पालक निकालाची वाट बघत राहिले. त्यामुळे गेल्या १० दिवसात २०,२२२ विद्यार्थ्यांनीच अर्ज केले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी नोंदणीच्या प्रक्रियेला उशिरा सुरुवात झाली. गेल्यावर्षी विविध ज्युनि. कॉलेजमध्ये ५४,२३० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया घेण्यात आली होती. परंतु शेवटच्या टप्प्यात १७,६१९ जागा रिक्त राहिल्या होत्या.यंदा बोर्डाचा निकाल घसरल्याने ९० टक्के प्रवेश घेणाऱ्यांची संख्या घटली आहे, तर सीबीएसई व आयसीएसई बोर्डाचे विद्यार्थी जास्त आहेत. त्यामुळे शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये बायोफोकलच्या सीट मेरिटच्या हिशेबाने सीबीएसई विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने त्यांचा दबदबा राहणार आहे.सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे इंटर्नल गुण कमी करणारयावर्षी स्टेट बोर्डाचा निकाल कमी लागला. कारण तोंडी परीक्षेचे गुण बोर्डाने बंद केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरली. मात्र सीबीएसई व आयसीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत गुण दिले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत वाढ झाली. सूत्रांच्या मते, मेरिट सूची तयार करताना सीबीएसई व आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्यात येणार नाही.प्रवेश प्रक्रिया अडलीसूत्रांनी सांगितल्यानुसार, शिक्षण विभागाने सीबीएसई व आयसीएसई बोर्डाला पत्र लिहिले आहे. यात तोंडी व लेखी परीक्षेचे गुण वेगवेगळे देण्यास सांगितले आहे. मात्र शिक्षण विभागाला दोन्ही बोर्डाकडून उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया अडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर