शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्र डागले, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

 नागपुरात अपघाताच्या प्रमाणात ९.५४ टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 01:08 IST

नागपूर शहरात २०१७ मध्ये १२४२ अपघात झाले असून, यात २३१ नागरिकांचा मृत्यू झाला तर १२५६ जखमी झाले. परंतु गेल्या वर्षी अपघातांना घेऊन केलेल्या जनजागृतीमुळे प्रथमच अपघाताची संख्या कमी झाली. अपघाताचे प्रमाण ९.५४ टक्क्यांनी घटले.

ठळक मुद्दे२०१६ मध्ये १३७३ तर २०१७ मध्ये १२४२ अपघात

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात. ते निश्चितच टाळता येतात. असे असतानाही रस्ता वापरणाऱ्या घटकांनी याबाबत गंभीरपणे दखल घेतल्याचे दिसत नाही. नागपूर शहरात २०१७ मध्ये १२४२ अपघात झाले असून, यात २३१ नागरिकांचा मृत्यू झाला तर १२५६ जखमी झाले. परंतु गेल्या वर्षी अपघातांना घेऊन केलेल्या जनजागृतीमुळे प्रथमच अपघाताची संख्या कमी झाली. अपघाताचे प्रमाण ९.५४ टक्क्यांनी घटले.वाढत्या शहरीकरणामुळे मुख्य रस्तेच नाही तर वसाहतीमधील रस्त्यांवरील वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच पार्किंगच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्रमण व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड होत चालली आहे, शिवाय प्रदूषणामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये नागपूर शहरात १३७३ अपघात झाले होते. यात ३०७ मृत्यू तर १५१० नागरिक जखमी झाले. २०१५ च्या तुलनेत अपघाताचा हा आकडा ४.८१ टक्क्यांनी वाढला होता.आठ वर्षांत पहिल्यांदाच प्रमाण घटलेनागपूर शहरात २०१३ मध्ये १०२९, २०१४ मध्ये ११४८ अपघात झाले. अपघाताचे हे प्रमाण ११.५६ टक्क्यांनी वाढले होते. २०१५ मध्ये १३१० अपघात होऊन यात १४.११ टक्क्यांनी वाढ झाली. २०१६ मध्ये १३७३ अपघात होऊन प्रमाण ४.८१ टक्क्यांपर्यंत पोहचले. मात्र २०१७ मध्ये १२४२ अपघात होऊन अपघाताचे प्रमाण ९.५४ टक्क्यांनी कमी झाले. गेल्या आठ वर्षात पहिल्यांदाच अपघाताची संख्या घटली.मृत्यूचे प्रमाण २४.७६रस्ते अपघातात २०१३ मध्ये २४८ तर २०१४ मध्ये २८६ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. हे प्रमाण १५.३२ टक्के एवढे होते. २०१५ मध्ये रस्ता अपघातातील मृत्यूचे हे प्रमाण ८.३९ टक्क्यांनी कमी झाले. त्यावर्षी २६२ नागरिकांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये पुन्हा अपघातातील मृत्यूचे प्रमाण वाढले. ३९७ मृत्यूची नोंद झाली. १७.१८ टक्क्यांनी हे प्रमाण वाढले होते. मात्र २०१७ मध्ये मृत्यूचे प्रमाण २४.७६ टक्क्यांनी घसरले. या वर्षात २३१ मृत्यू झाले.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर