शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात अपघाताच्या प्रमाणात ९.५४ टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 01:08 IST

नागपूर शहरात २०१७ मध्ये १२४२ अपघात झाले असून, यात २३१ नागरिकांचा मृत्यू झाला तर १२५६ जखमी झाले. परंतु गेल्या वर्षी अपघातांना घेऊन केलेल्या जनजागृतीमुळे प्रथमच अपघाताची संख्या कमी झाली. अपघाताचे प्रमाण ९.५४ टक्क्यांनी घटले.

ठळक मुद्दे२०१६ मध्ये १३७३ तर २०१७ मध्ये १२४२ अपघात

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात. ते निश्चितच टाळता येतात. असे असतानाही रस्ता वापरणाऱ्या घटकांनी याबाबत गंभीरपणे दखल घेतल्याचे दिसत नाही. नागपूर शहरात २०१७ मध्ये १२४२ अपघात झाले असून, यात २३१ नागरिकांचा मृत्यू झाला तर १२५६ जखमी झाले. परंतु गेल्या वर्षी अपघातांना घेऊन केलेल्या जनजागृतीमुळे प्रथमच अपघाताची संख्या कमी झाली. अपघाताचे प्रमाण ९.५४ टक्क्यांनी घटले.वाढत्या शहरीकरणामुळे मुख्य रस्तेच नाही तर वसाहतीमधील रस्त्यांवरील वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच पार्किंगच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्रमण व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड होत चालली आहे, शिवाय प्रदूषणामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये नागपूर शहरात १३७३ अपघात झाले होते. यात ३०७ मृत्यू तर १५१० नागरिक जखमी झाले. २०१५ च्या तुलनेत अपघाताचा हा आकडा ४.८१ टक्क्यांनी वाढला होता.आठ वर्षांत पहिल्यांदाच प्रमाण घटलेनागपूर शहरात २०१३ मध्ये १०२९, २०१४ मध्ये ११४८ अपघात झाले. अपघाताचे हे प्रमाण ११.५६ टक्क्यांनी वाढले होते. २०१५ मध्ये १३१० अपघात होऊन यात १४.११ टक्क्यांनी वाढ झाली. २०१६ मध्ये १३७३ अपघात होऊन प्रमाण ४.८१ टक्क्यांपर्यंत पोहचले. मात्र २०१७ मध्ये १२४२ अपघात होऊन अपघाताचे प्रमाण ९.५४ टक्क्यांनी कमी झाले. गेल्या आठ वर्षात पहिल्यांदाच अपघाताची संख्या घटली.मृत्यूचे प्रमाण २४.७६रस्ते अपघातात २०१३ मध्ये २४८ तर २०१४ मध्ये २८६ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. हे प्रमाण १५.३२ टक्के एवढे होते. २०१५ मध्ये रस्ता अपघातातील मृत्यूचे हे प्रमाण ८.३९ टक्क्यांनी कमी झाले. त्यावर्षी २६२ नागरिकांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये पुन्हा अपघातातील मृत्यूचे प्रमाण वाढले. ३९७ मृत्यूची नोंद झाली. १७.१८ टक्क्यांनी हे प्रमाण वाढले होते. मात्र २०१७ मध्ये मृत्यूचे प्रमाण २४.७६ टक्क्यांनी घसरले. या वर्षात २३१ मृत्यू झाले.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर