शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

नागपुरात भरती झाल्यानंतर २४ तासामध्ये मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 11:38 IST

नागपूर शहरात दररोज एक हजाराच्या आसपास कोविड रुग्ण आढळून येत असून ३० ते ४० लोकांचा मृत्यू होत आहे.

ठळक मुद्दे४८ तासात मृत्यूचे प्रमाण ३८ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील आठ-दहा दिवसापासून नागपूर शहरात दररोज एक हजाराच्या आसपास कोविड रुग्ण आढळून येत असून ३० ते ४० लोकांचा मृत्यू होत आहे. लक्षणे आढळून आल्यानंतर लगेच उपचार न घेता त्रास वाढल्यानंतर उपचारासाठी रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. यामुळे दाखल झाल्यानंतर २४ तासात मरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. ४८५ मृत्यूपैकी ३०० रुग्णांचा मृत्यू उपचारासाठी दाखल झाल्यानंतर २४ तासात झाला तर ४८ तासात मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ३८ टक्के आहे. वेळीच उपचार केले असते तर ही संख्या कमी राहिली असती, अशी माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना दिली.११ मार्च ते ३१ मे दरम्यान नागपूर शहरात रिकव्हरी रेट अधिक होता. परंतु जूनपासून परिस्थिती बदलली. ऑगस्ट महिन्यात परिस्थिती गंभीर बनली. याला नागरिकांची बेजबाबदार वागणूक प्रामुख्याने कारणीभूत आहे. लॉकडाउन कुणालाच नको आहे. दुसरीकडे नियमही पाळले जात नाही. बाजारात फिजिकल डिस्टन्स पाळले जात नाही. मास्कचा वापर होत नाही. तंबाखू व खर्रा खणाऱ्यांचे प्रमाण ८० टक्के आहे. त्यांच्या थुंकण्यातून संसर्ग वाढण्याचा अधिक धोका आहे. यासाठी नागरिकांनी अंतर्मुख होण्याची गरज असल्याचे मत तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले.

काय म्हणाले तुकाराम मुंढे- २२ दिवसात ६२ हजार रुग्णांची तपासणी- ११ मार्च ते २२ऑगस्ट दरम्यान एक लाखाहून अधिक रुग्णांची तपासणी- नागपूर शहरात ३४ ठिकाणी कोविड ठिकाणी टेस्टिंग सेंटर- मृतांमध्ये ८५ टक्के जुने आजार असलेल्यांचा समावेश- ६० टक्के रुग्ण आजार गंभीर झाल्यानंतर उपचारासाठी दाखल होतात- ताप, सर्दी व खोकला असल्यास डॉक्टरकडे तपासणी करून घ्या.-प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखून वर्तणूक सुधारावी.-अ‍ॅप डाऊनलोड करून मनपा प्रशासनाची मदत घ्या.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस