शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

नागपुरात आठवड्याभरात पारा जाणार ४७ वर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 22:09 IST

२३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असल्याने एकीकडे राजकीय वातावरण तापायला लागले आहे. तर दुसरीकडे सूर्याचा प्रकोप वाढत असून पुढील आठवडा नागपूरकरांची परीक्षा पाहणारा ठरू शकतो. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे ‘हीट वेव्ह’ची तीव्रता वाढणार असून २१ मेनंतर तापमानाचा पारा ४७ अंशांहून अधिक जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देराजकीय वातावरणासह शहरदेखील तापणार : ‘हीट वेव्ह’पासून राहा सावध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असल्याने एकीकडे राजकीय वातावरण तापायला लागले आहे. तर दुसरीकडे सूर्याचा प्रकोप वाढत असून पुढील आठवडा नागपूरकरांची परीक्षा पाहणारा ठरू शकतो. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे ‘हीट वेव्ह’ची तीव्रता वाढणार असून २१ मेनंतर तापमानाचा पारा ४७ अंशांहून अधिक जाण्याची शक्यता आहे.मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरात पारा वाढलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून आकाशात तुरळक ढगदेखील दिसून येत असून त्यामुळे उकाडा जास्त प्रमाणात जाणवून येतो आहे. गुरुवारी शहरातील कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २८.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. मात्र आता तापमान वाढण्याची शक्यता असून २० मे रोजी ४६ अंश तर २१ मे नंतर ४७ अंशापर्यंत पारा जाण्याची शक्यता आहे. नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. शिवाय गरम वाऱ्यांमुळे गरमीचा प्रकोप जास्त प्रमाणात जाणविण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.सकाळी ८ पासूनच उकाडाशहरात सकाळी ८ वाजल्यापासून गरमी दिसून येत आहे. दिवसाच्या सुरुवातीपासूनच उकाडा जाणवून येत आहे. दिवसभर रस्त्यांवर वाहने चालविणे अतिशय कठीण काम झाले आहे. विशेषत: दुचाकीस्वारांसाठी तर गाडी चालविणे दिव्यच आहे.किमान तापमानदेखील वाढणारडॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या हवामान सेवा केंद्राच्या अंदाजाप्रमाणे १९ मेपर्यंत शहरातील किमान तापमान ३० अंश सेल्सिअसहून अधिक राहू शकते. शिवाय २१ मे नंतर कमाल तापमान ४७ अंश सेल्सिअसहून अधिक जाऊ शकते. शिवाय तुरळक ढग असल्याने उकाडा जास्त प्रमाणात जाणवू शकतो.

टॅग्स :Temperatureतापमानnagpurनागपूर